शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘चिल्लर पार्टी’तर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:30 IST

पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ करून ते खुले करण्यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी तीन दिवस शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील जंगलात श्रमदान केले. या मोहिमेचे उद्घाटन प्रा. एस. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमोद माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. माणूस आणि निसर्ग, प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ करून ते खुले करण्याचे काम आंबा येथील वसुरक्षक सोशल फोर्स करत आहे. गेली तीन वर्षे या संस्थेने हा उपक्रम सुरू ठेवला आहे. आंबा येथे सुरू असलेल्या या उपक्रमात कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत तीन दिवसीय श्रमदान केले. निसर्गातील हस्तक्षेपामुळे माणूस अनेक संकटे स्वत:वर ओढावून घेत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेला उष्मा हा या हस्तक्षेपाचाच एक भाग आहे. उष्म्यामुळे सगळीकडचा पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यातच माती, पालापाचोळा आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत मुजले जात आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. शिवारात त्यांना चारा आणि पाणी दोन्ही मिळते, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते आणि निसर्ग आणि माणसातील संघर्ष सुरू होतो, असे मत प्रा. पाटील यांनी व्यक्त केले. या शिबिरात जलस्रोत खुले करण्याबरोबरच प्राण्यांसाठी चिखलाची लोळण तयार करण्याचेही काम केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद यादव, देविका बकरे, नसीम यादव, शिवप्रभा लाड, आरती कोपार्डेकर, जयसिंग चव्हाण यांनी भाग घेतला.