शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

‘चिल्लर पार्टी’तर्फे जंगलात पाण्यासाठी श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:30 IST

पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचे पुनरुज्जीवन

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ करून ते खुले करण्यासाठी चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी तीन दिवस शाहूवाडी तालुक्यातील आंबा येथील जंगलात श्रमदान केले. या मोहिमेचे उद्घाटन प्रा. एस. आर. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमोद माळी यांनी सर्वांचे स्वागत केले. माणूस आणि निसर्ग, प्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत स्वच्छ करून ते खुले करण्याचे काम आंबा येथील वसुरक्षक सोशल फोर्स करत आहे. गेली तीन वर्षे या संस्थेने हा उपक्रम सुरू ठेवला आहे. आंबा येथे सुरू असलेल्या या उपक्रमात कोल्हापुरातील चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीच्या सदस्यांनी सक्रिय सहभाग घेत तीन दिवसीय श्रमदान केले. निसर्गातील हस्तक्षेपामुळे माणूस अनेक संकटे स्वत:वर ओढावून घेत आहे. प्रचंड प्रमाणात वाढलेला उष्मा हा या हस्तक्षेपाचाच एक भाग आहे. उष्म्यामुळे सगळीकडचा पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. यातच माती, पालापाचोळा आणि मानवी हस्तक्षेप यामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत मुजले जात आहेत. त्यामुळे पाण्यासाठी जंगलातील प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत. शिवारात त्यांना चारा आणि पाणी दोन्ही मिळते, त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होते आणि निसर्ग आणि माणसातील संघर्ष सुरू होतो, असे मत प्रा. पाटील यांनी व्यक्त केले. या शिबिरात जलस्रोत खुले करण्याबरोबरच प्राण्यांसाठी चिखलाची लोळण तयार करण्याचेही काम केले. चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळीचे मिलिंद यादव, देविका बकरे, नसीम यादव, शिवप्रभा लाड, आरती कोपार्डेकर, जयसिंग चव्हाण यांनी भाग घेतला.