शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

तळसंदेतील श्री महाविष्णू मंदिर दुर्लक्षित

By admin | Updated: May 24, 2016 00:54 IST

‘अ’ वर्ग स्थळात समावेश करा : तलावातील हजारो वर्षांचे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर

दिलीप चरणे -- नवे पारगाव --तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विष्णू जलाशय गावाचं वैभव समजलं जातं. या भव्य तलावामुळे गावाला तळसंदे हे नाव मिळाले आहे. या तलावाच्या मध्यभागी निर्माण करण्यात आलेल्या श्री शेषशाही महाविष्णू मंदिराची पूर्णत: पडझड होत आली आहे. याकडे भाविक, भक्तांसह ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने पुराणातील हे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. वाठार-बोरपाडळे राज्य मार्गावर तळसंदे येथील चावरे फाट्याच्या विरुद्ध दक्षिण बाजूच्या रोडवर दोन फर्लांग अंतरावर भव्य असा गावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी श्री महाविष्णू यांची शेषशाही रूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाशी भारत कन्या व कन्याकुमारी (शक्ती, आदिशक्ती) अशा दोन मूर्ती आहेत. पराशरासह अन्य अनेक ऋषिमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे. मंदिराचे बांधकामच हेमाडपंथी आहे. यावरून हे मंदिर पुरातन मंदिरात मोडते. एवढा पुरावादेखील पुष्कळ आहे. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी दगडी शिळेचा पूल होता. तो काळाच्या ओघात पडला आहे. त्याचे एक-दोन टप्पे शिल्लक आहेत. मंदिराची उत्तर व दक्षिण बाजूची पूर्ण भिंत कोसळली आहे. आतील एका बाजूचा थरच कसाबसा अजून तग धरून आहे. मूर्तीचा कालावधी लक्षात घेतला, तर कित्येक वर्षांची ही मूर्ती जीर्ण होत चालली आहे. उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना येथे जाता येते. एरवी पाणी असल्याने काही भक्त पोहत जाऊन सेवा पार पाडतात. गावातील लोक या तलावातील पाण्याचा वापर खर्चासाठी, अंघोळ व जनावरे धुण्यासाठी करतात. तळसंदे येथील श्री महाविष्णू मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणूनदेखील विकास करता येण्यासारखा आहे. तलावात नौका विहाराची सुविधा निर्माण केली तर उत्तम निसर्ग पार्कमुळे गावच्या विकासासाठी उत्त्पन्नाचे साधन होईल. मूर्तीचे संवर्धन करणे, मंदिराची पहिल्या टप्प्यात दुरुस्ती करणे, नवीन घडीव दगडाचे मंदिर पूर्वी असणाऱ्या मंदिराप्रमाणेच बांधणे, भाविकांना कायमस्वरूपी जाता यावे यासाठी पूल बांधणे, अशी अनेक कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे संवर्धन होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या देवस्थान स्थळाचा ‘अ’ वर्ग स्थळात समावेश करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. या पुराणातील प्रसिद्ध व अध्यात्मात मोठे महत्त्व असलेल्या महाविष्णू मंदिराकडे भाविक ग्रामस्थांनी सरळ दुर्लक्षच आजवर केल्याचे मंदिराच्या अवस्थेवरून जाणवते. जिल्ह्यात श्री महाविष्णूची मंदिरे फार कमी आहेत. अशातच शेषशाही मंदिरांची संख्या दुर्मीळ आहे. पुरातत्त्व विभागाकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा करून मंदिराच्या निर्मितीबाबत माहिती मिळते का? तसेच करवीर, काशी किंवा पराशर व अन्य ऋषींच्या ग्रंथांत याचा संदर्भ सापडतो का? याचीदेखील खात्री करून घ्यायला पाहिजे.