शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
2
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
3
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
4
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
5
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
6
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
7
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
8
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
9
जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
10
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
11
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
13
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक
14
१ लाखाचे झाले १५ लाख! 'या' मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल, आता NSE वर एंट्री घेणार
15
Viral Video: कॅनडात ‘शंकर भगवान की जय’चा नारा; भारतीय विद्यार्थ्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल
16
पाकने डोकं लावायचा प्रयत्न केला, पण भारताने खोड मोडली! युएईमार्गे भारतात येणारे ३९ कंटेनर जप्त
17
मास्क लावून नको त्या खासगी क्षणाचे करायचे 'लाईव्ह स्ट्रिमिंग'; जोडप्याला पोलिसांनी केली अटक
18
भाजपाच्या महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष निवडीला वेग येणार, किरेन रिजिजूंवर सोपवली मोठी जबाबदारी, केली निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती
19
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
20
एकाच दिवसात या शेअरमध्ये ६२० रुपयांची तेजी, ब्रोकरेजनं दिलं ₹२१,४०९ चं टार्गेट; तुमच्याकडे आहे का?

तळसंदेतील श्री महाविष्णू मंदिर दुर्लक्षित

By admin | Updated: May 24, 2016 00:54 IST

‘अ’ वर्ग स्थळात समावेश करा : तलावातील हजारो वर्षांचे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर

दिलीप चरणे -- नवे पारगाव --तळसंदे (ता. हातकणंगले) येथील विष्णू जलाशय गावाचं वैभव समजलं जातं. या भव्य तलावामुळे गावाला तळसंदे हे नाव मिळाले आहे. या तलावाच्या मध्यभागी निर्माण करण्यात आलेल्या श्री शेषशाही महाविष्णू मंदिराची पूर्णत: पडझड होत आली आहे. याकडे भाविक, भक्तांसह ग्रामस्थ व स्थानिक नेत्यांचे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने पुराणातील हे हेमाडपंथी मंदिर नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. वाठार-बोरपाडळे राज्य मार्गावर तळसंदे येथील चावरे फाट्याच्या विरुद्ध दक्षिण बाजूच्या रोडवर दोन फर्लांग अंतरावर भव्य असा गावाचा तलाव आहे. या तलावाच्या मध्यभागी श्री महाविष्णू यांची शेषशाही रूपातील मूर्ती आहे. या मूर्तीच्या पायाशी भारत कन्या व कन्याकुमारी (शक्ती, आदिशक्ती) अशा दोन मूर्ती आहेत. पराशरासह अन्य अनेक ऋषिमुनींनी येथे तपश्चर्या केली आहे. मंदिराचे बांधकामच हेमाडपंथी आहे. यावरून हे मंदिर पुरातन मंदिरात मोडते. एवढा पुरावादेखील पुष्कळ आहे. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या या मंदिरात जाण्यासाठी दगडी शिळेचा पूल होता. तो काळाच्या ओघात पडला आहे. त्याचे एक-दोन टप्पे शिल्लक आहेत. मंदिराची उत्तर व दक्षिण बाजूची पूर्ण भिंत कोसळली आहे. आतील एका बाजूचा थरच कसाबसा अजून तग धरून आहे. मूर्तीचा कालावधी लक्षात घेतला, तर कित्येक वर्षांची ही मूर्ती जीर्ण होत चालली आहे. उन्हाळ्यात तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्यावर भाविकांना येथे जाता येते. एरवी पाणी असल्याने काही भक्त पोहत जाऊन सेवा पार पाडतात. गावातील लोक या तलावातील पाण्याचा वापर खर्चासाठी, अंघोळ व जनावरे धुण्यासाठी करतात. तळसंदे येथील श्री महाविष्णू मंदिराचा पर्यटनस्थळ म्हणूनदेखील विकास करता येण्यासारखा आहे. तलावात नौका विहाराची सुविधा निर्माण केली तर उत्तम निसर्ग पार्कमुळे गावच्या विकासासाठी उत्त्पन्नाचे साधन होईल. मूर्तीचे संवर्धन करणे, मंदिराची पहिल्या टप्प्यात दुरुस्ती करणे, नवीन घडीव दगडाचे मंदिर पूर्वी असणाऱ्या मंदिराप्रमाणेच बांधणे, भाविकांना कायमस्वरूपी जाता यावे यासाठी पूल बांधणे, अशी अनेक कामे तातडीने हाती घेण्याची गरज आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराचे संवर्धन होण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. या देवस्थान स्थळाचा ‘अ’ वर्ग स्थळात समावेश करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. या पुराणातील प्रसिद्ध व अध्यात्मात मोठे महत्त्व असलेल्या महाविष्णू मंदिराकडे भाविक ग्रामस्थांनी सरळ दुर्लक्षच आजवर केल्याचे मंदिराच्या अवस्थेवरून जाणवते. जिल्ह्यात श्री महाविष्णूची मंदिरे फार कमी आहेत. अशातच शेषशाही मंदिरांची संख्या दुर्मीळ आहे. पुरातत्त्व विभागाकडे ग्रामस्थांनी पाठपुरावा करून मंदिराच्या निर्मितीबाबत माहिती मिळते का? तसेच करवीर, काशी किंवा पराशर व अन्य ऋषींच्या ग्रंथांत याचा संदर्भ सापडतो का? याचीदेखील खात्री करून घ्यायला पाहिजे.