शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा

By admin | Updated: December 23, 2015 01:17 IST

जादा दराची अपेक्षा : पहिल्याच टप्प्यात चार किलोच्या पेटीला २४० ते ४२५ रुपयांपर्यंत दर

दत्ता पाटील- तासगाव  तालुक्यात यंदाच्या द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा झाला आहे. मणेराजुरी, डोंगरसोनी, आरवडेसह काही गावात द्राक्षांची काढणी सुरू झाली आहे. पहिल्याच टप्प्यात चार किलोच्या पेटीला सरासरी २४० रुपयांपासून ४२५ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. अद्याप देशभरात थंडीचा प्रभाव असल्यामुळे समाधानकारक दर नाही. मात्र आणखी काही दिवसांत दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.तासगाव तालुक्यात द्राक्षबागेचे सरासरी सात हजार हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात डिसेंबर महिन्यापासून होते. त्यानंतर चार महिन्यांपर्यंत द्राक्षाचा हंगाम सुरू राहतो. तालुक्यात चार दिवसांपासून काही प्रमाणात द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. आॅक्टोबरपूर्वी पीक छाटणी घेतलेल्या शेतकऱ्यांच्या द्राक्षांची विक्री सुरू झाली आहे. मुंबईसह तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये द्राक्षांची निर्यात होत असून, पूर्ण क्षमतेने हंगाम सुरू झाल्यानंतर देशभरात द्राक्षाची निर्यात सुरू होणार आहे. तालुक्यातील मणेराजुरी, डोंगरसोनी, आरवडे, सावर्डे या गावांत द्राक्षाची काढणी सुरू आहे. द्राक्षाचा हंगाम सुरू झाला असला तरी, सरासरीच्या तुलनेत अपेक्षित दर मिळाला नसल्याचे चित्र आहे. देशभरात अद्यापही थंडी जाणवत असल्यामुळे त्याचा परिणाम दरावर झाल्याचे मत द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केले. सध्याच्या दरात आणखी वाढ अपेक्षित असून, येत्या काही दिवसांत द्राक्षाला चांगला दर मिळेल, अशीही अपेक्षा द्राक्ष बागायतदारांना आहे.पाणी टंचाईचे सावट तासगाव तालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात झाली असली तरी, बागायतदारांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. द्राक्षांची काढणी होईपर्यंत पाणी कमी पडून चालत नाही. मणेराजुरीसह बहुतांश गावांतील शेतकऱ्यांना उपसा सिंंचन योजना ठप्प असल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी टँकरच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे. द्राक्षाचा हंगाम हातात आला असला तरी, पाणी टंचाईमुळे द्राक्ष बागायतदार चिंंतातूर असल्याचे चित्र आहे.चार दिवसांपासून द्राक्ष काढणीस सुरुवात केली आहे. दहा एकर द्राक्षबागेचे एकूण क्षेत्र आहे. त्यापैकी ‘ब्लॅक ज्योती सिडलेस’ या जातीच्या द्राक्षांची काढणी सुरू आहे. ४२५ रुपयांनी द्राक्षांची विक्री केली आहे. हा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. मात्र लवकरच दर वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा उर्वरित द्राक्ष विक्रीसाठी होईल, अशी अपेक्षा आहे. - परशराम एरंडोले, द्राक्ष बागायतदार, मणेराजुरी, ता. तासगावतालुक्यात द्राक्ष हंगामाची सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर द्राक्ष बागायतदारांची फसवणूक होऊ नये, यासाठी द्राक्षे खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून परवाने सक्तीचे केले आहेत. शेतकऱ्यांच्या फसवणुकीला लगाम बसावा, यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. तालुक्यात द्राक्षे खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समिती परवाने देणार आहे. बागायतदारांनीही परवानाधारक व्यापाऱ्यांनाच द्राक्षांची विक्री करावी.- अविनाश पाटील, सभापती, तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती.