शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आजरा तहसीलवर श्रमुदचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:24 IST

आजरा - आजरा तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अपंग, विधवा, परित्यक्ता, धनगर समाज आणि धरणग्रस्त शेतकरी ...

आजरा - आजरा तहसील कार्यालयावर श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली मंगळवारी अपंग,

विधवा, परित्यक्ता, धनगर समाज आणि धरणग्रस्त शेतकरी यांचा संयुक्त मोर्चा

काढण्यात आला. या घटकांचे गेले अनेक वर्षे जे प्रश्न प्रलंबित आहेत त्या

प्रश्नांची सोडवणूक करा अशी मागणी मोर्चाच्या वतीने करण्यात आली.

धरणग्रस्तांचे विकसनशील पुनर्वसन झालेच पाहिजे, कष्टकरी जनतेच्या

एकजुटीचा विजय असो, पाणी आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे, विधवा,

परित्यक्तांना तीन हजार पेन्शन मिळालीच पाहिजे अशा घोषणा मोर्चात देण्यात

आल्या. शिवाजी पुतळ्यासमोरुन सुरु झालेला मोर्चा तहसील कार्यालयासमोर

आल्यानंतर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मोर्चातील शिष्टमंडळाने तहसीलदार

विकास अहिर व विविध खातेप्रमुखांशी मागण्यांबाबत चर्चा केली.

अपंग, विधवा, परित्यक्ता आणि निराधार व्यक्तींना तीन हजार पेन्शन

मिळालीच पाहिजे,गावात उपलब्ध असलेले भूखंड या व्यक्तींना मागणीप्रमाणे

द्या, पंचायत समिती स्तरावरील शासकीय योजनांना शिफारशीऐवजी मागणीप्रमाणे

त्या उपलब्ध करुन द्या, प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा स्टाफ व औषधे

उपलब्ध करा, कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा,

तालुक्यातील धरणग्रस्तांचे संकलन दुरुस्त करुन प्रमाणित करा, धरणग्रस्तांना

मिळालेल्या जमिनी कसण्यासाठी होत असलेले अडथळे दूर करा, जमीन वाटप

झालेल्या पात्र प्रकल्पग्रस्तांना भूखंडांचे वाटप करा, धरणग्रस्तांना

निर्वाह भत्ता, ६५ टक्के रक्कमेवरील व्याज तातडीने मिळावे, वनहक्काचे धनगर

समाजाचे दावे तातडीने मंजूर करावेत या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

मोर्चात काॅ. संपत देसाई, शंकर पावले, प्रकाश मोरस्कर, मुकुंद

नार्वेकर, नारायण भडांगे, भीमराव माधव, निवृत्ती फगरे यासह श्रमुदचे

कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिफारशींची गरज काय ?

वैयक्तिक लाभाच्या योजना देताना पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशींची गरज काय ?

तसा शासनाचा आदेश आहे का ? कृषी विभागाच्या आत्मा अंतर्गत होणारे शिबिर व

मेळावे विशिष्ट व्यक्तींनाच का ? असा सवाल काॅ. संपत देसाई यांनी करुन कृषी

विभागातील रॅकेट बंद करण्याची मागणी केली.

फोटोकॅप्शन - आजरा तहसील कार्यालयावर श्रमुदच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी निघालेला मोर्चा.