शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

नूल पंचक्रोशीचे श्रद्धास्थान लिंगैक्य श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:24 IST

गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे मठाधिपती षट्स्थळब्रह्मी उपाचार्यरत्न श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुक्रवार, २७ ऑगस्ट, ...

गडहिंग्लज तालुक्यातील कसबा नूल येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे मठाधिपती षट्स्थळब्रह्मी उपाचार्यरत्न श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१ रोजी महानिर्वाण झाले. त्यांचा समाधी (गदगी) समर्पण आणि शिवगणाराधना कार्यक्रम आज, सोमवारी, १३ सप्टेंबर २०२१ रोजी होत आहे. त्यानिमित्त श्री. महास्वामीजींच्या आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कामगिरीचा घेतलेला आढावा..

६ एप्रिल १९३८ रोजी कणगला (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथील कुलाचार संपन्न हिरेमठ घराण्यात श्री. महास्वामीजी यांचा जन्म झाला. त्यांचे वडील आप्पय्या लिंगय्या मठद हे धर्मनिष्ठ तर मातोश्री निलांबिका या प्रेमळ परंतु करारी स्वभावाच्या होत्या. स्वामीजींचे बालपण व प्राथमिक शिक्षण कणगला येथेच झाले.

१९५४ मध्ये वयाच्या १६व्या वर्षीच नूल येथील श्री सुरगीश्वर मठाचे तत्कालीन मठाधिपती गुरुसिद्धय्या यांनी त्यांची मठाचे उत्तराधिकारी म्हणून निवड केली. त्यात त्यावेळचे नूलचे सामाजिक कार्यकर्ते दिनकरराव शिंदे मास्तर यांनी मोलाची भूमिका बजावली. तथापि, एक विद्वान संस्कृत पंडित बनण्याची स्वामीजींची तीव्र इच्छा होती. त्यामुळे यमकनमर्डी-हत्तरगी येथे वैदिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी बंगळुरूला धाव घेतली. त्या ठिकाणी ११ वर्षे राहून शासकीय संस्कृत महाविद्यालयात रात्रंदिवस खपून त्यांनी मोठ्या जिद्दीने सुवर्णपदकासह ‘साहित्यालंकार’ ही पदवी प्राप्त केली. त्यानंतर श्रीक्षेत्र काशी ज्ञानपीठात वर्षभर राहून त्यांनी धार्मिक शिक्षणही पूर्ण केले. दरम्यानच्या काळात त्यांचे वडीलबंधू संबय्या हिरेमठ यांनी मठाची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली. उच्चविद्याविभूषित झाल्यानंतर ते नूल गावी आले. नूल आणि पंचक्रोशीतील ग्रामीण लोकांच्या सामाजिक व शैक्षणिक गरजा ओळखून त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. बारशे ते मुंज, वास्तुशास्त्र यासह अनेक घरगुती व सार्वजनिक अडीअडचणीसंदर्भात मार्गदर्शनासाठी भक्तगण त्यांच्याकडे हक्काने येत. परंतु, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि महात्मा बसवेश्वर यांच्या लोककल्याणाच्या विचारांची बैठक पक्की असल्यामुळे त्यांनी नेहमी खरे तेच आणि योग्य तेच सांगून त्यांच्याकडे आशेने येणाऱ्यांमध्ये जीवनाकडे बघण्याची नवी ऊर्जा निर्माण केली. म्हणूनच महास्वामीजी आणि भक्त यांच्यातील गुरुशिष्याचे नाते अखेरपर्यंत अतूट असेच राहिले. त्याचीच प्रचिती त्यांच्या अंत्ययात्रेत अनुभवायला मिळाली.