शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शताब्दी महोत्सवातून ताकद दाखवूया

By admin | Updated: November 23, 2014 23:53 IST

वसंत वाणी : शिक्षक संघाची महामंडळ सभा; शताब्दी महोत्सवाला पंतप्रधान येणार

कोल्हापूर : शिक्षक संघाचा शताब्दी महोत्सव पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित करण्याचे नियोजन असून, या कार्यक्रमातून राज्यातील शिक्षक संघाची ताकद दाखवून देऊया, असे आवाहन भाजपचे महासमन्वयक वसंत वाणी यांनी केले. राज्य प्राथमिक शिक्षक संघाची महामंडळ सभा आज, रविवारी कोल्हापुरातील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे झाली, त्यामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षक नेते संभाजीराव थोरात होते. शिक्षकच देशाचे खरे मार्गदर्शक असून देशभक्ती व समाजभक्तासाठी पिढी उभी करण्याचे काम त्यांच्यावर असल्याने शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे, असेही वाणी यांनी सांगितले. गेले दीड तासांत माजी अध्यक्षांच्या नावाची खूप चर्चा झाली आहे, पुन्हा-पुन्हा नाव घेऊन माणसं मोठी होतात, याचे भान ठेवा.सरकार बदलले असले तरी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी पाठपुरावा करणार आहे. यासाठीच भगवानगड येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत २५ हजार शिक्षकांचे महामंडळ घेऊन शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. त्याचबरोबर शिक्षक संघाच्या शताब्दी महोत्सव पुणे येथील बालेवाडी येथे अडीच लाख शिक्षकांच्या उपस्थितीत घेणार असल्याचे संभाजीराव थोरात यांनी सांगितले. मुख्यालयात राहण्याची सक्ती कोल्हापुरातील शिक्षकांना केली जाते, पण काळजी करू नका, कोणाचेही घरभाडे कपात केले जाणार नाही. प्रसंगी उपोषणाला बसू पण शिक्षकांच्या एका रुपयालाही हात लावू देणार नसल्याचे थोरात यांनी सांगितले. मोहन भोसले, आप्पासाहेब कुल, अंबादास वाझे, जनार्दन निऊंगरे, एन. वाय. पाटील, विलास पाटील, अरुण चाळके, सुनील पाटील, बाळकृष्ण हळदकर, पी. ए. पाटील, शिवाजी खाडे, बाबूराव खोत, विष्णू काटकर आदी उपस्थित होते.गुरुजींचे कान उपटले!सभा उशिरा सुरू झाल्याने गुरुजींच्या नजरा जेवणाकडेच होत्या. भाषणे सुरू असतानाच निम्मे शिक्षक जेवणाच्या हॉलमध्ये होते. त्यामुळे संभाजीराव थोरात चांगलेच संतप्त झाले. आपल्या प्रश्नांसाठी तीन तास बसता येत नसेल तर काय बोलायचे? आपण सकाळपासून उपाशी असल्याचे सांगत, तुम्हीच जर अशी शिस्त बिघडवत असाल तर अपेक्षा कोणाकडून करायच्या, अशा शब्दात थोरातांनी गुरुजींचे कान उपटले. शिक्षक बँकेवर प्रशासक नेमाराज्यातील मुदत संपलेल्या शिक्षक बँका, पतसंस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून तिथे प्रशासक नेमावे, अशी मागणी सहकारमंत्र्यांकडे करणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.असे झाले ठराव प्रशासकीय बदल्यांच्या शासननिर्णयातील त्रुटी दूर करण्यात याव्यात.पटसंख्येचा विचार न करता इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते आठवीसाठी सरसकट मुख्याध्यापकांची नेमणूक करावी४४ टक्के सादिलवार तत्काळ द्यावा.विषय शिक्षकांच्या नेमणुका करत असताना अट न घालता नेमणुका कराव्यात.शिक्षकांच्या मुलांच्या उच्चशिक्षणात फी सवलत मिळावी.आर.टी.ई कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात.