शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पाच उद्योगांना कारणे दाखवा नोटीस जारी

By admin | Updated: July 8, 2017 22:04 IST

भरारी पथकाचा दुसरा झटका : प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक मोहीम सुरुच...

लोकमत न्यूज नेटवर्कआवाशी : लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील ५६ कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी)ने केलेल्या कारवाईमधील ज्या वीस कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस आदेश बजावण्यात येणार होते, त्यापैकी पाच कंपन्यांना आज (शनिवारी) कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. त्यामुळे भरारी पथकाने कंपन्यांना दिलेला हा दुसरा झटका मानण्यात येत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीत भरारी पथकाने सुरु केलेले कारवाईचे शस्त्र पुन्हा मागील आठवड्यापासून उपसले आहे. त्यामध्ये प्रथम एक्सेल इंडस्ट्रीज, नंदादीप केमिकल, हरीश्री ओरोमेटिक, उर्ध्वा केमिकल व श्रीया केमिकल या पाच कंपन्यांना उत्पादन बंदची नोटीस बजावून कारवाई करण्यात आली. पैकी एक्सेल इंडस्ट्रीज वगळता इतर चौघांचा पाणीपुरवठा एमआयडीसीकडून बंद करण्यात आला असून, पाचहीजणांचा वीज पुरवठा महावितरणकडून काल गुरुवारी खंडित करण्यात आला आहे. त्यानंतर आज हाती आलेल्या माहितीनुसार येथील अरोमा इंटरमिडीएटस, पॅक्ट लॅब प्रा. लि., योजना इंडस्ट्रीज, पार्को फार्मास्युटिकल्स अँड केमिकल व थम्स आॅर्गेनिक या पाच कंपन्यांना कारण ेदाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.शनिवारी सुटी असल्याने एमपीसीबीच्या कार्यालयाशी संपर्क झाला नसला, तरी संबंधित कंपनी मालकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्राथमिक रासायनिक प्रक्रिया अद्ययावत नसणे, सांडपाणी सीईटीपीला सोडण्याच्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाड आदी कारणे या नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचे समजते. दि. १९ रोजी या पाचही कारखानदारांना याचा खुलासा करण्यासाठी माटुंगा (मुंबई) येथील एमपीसीबीच्या मुख्य कार्यालयात हजर राहण्याचे आदेश यामध्ये देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे भरारी पथकाच्या या कारवाई प्रक्रियेत आणखी कुणाची नावे समाविष्ट आहेत का, हे लवकरच समोर येणार असल्याचे समजते. एकीकडे ही कारवाई प्रक्रिया सुरु असतानाच येथील उर्ध्वा केमिकलचे पाणी व वीज पुरवठा बंद असतानाही शनिवारी दुपारी कंपनीचे सांडपाणी उघड्यावर आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.सर्वस्तरातून स्वागतलोटे वसाहत परिसरात होणाऱ्या प्रदूषणाबाबत आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरु केल्याने त्याचे परिसरातील जनतेकडून स्वागत करण्यात येत आहे.