शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कोल्हापुरात जल्लोष

By admin | Updated: February 28, 2016 00:57 IST

फटाक्यांची आतषबाजी

कोल्हापुरात जल्लोष कोल्हापूर : आशिया कप टी-२० क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानचा शनिवारी दारुण पराभव केला. या विजयानंतर कोल्हापुरातील शिवाजी चौकात रात्री क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतषबाजी करून एकच जल्लोष केला. ‘आशिया कप’मधील शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सामना होता. हा सामना भारताने ५ गडी राखून जिंकला. भारत-पाकिस्तान सामन्याला जणू युद्धाचे स्वरूप असते. या सामन्यातील जय-पराजय देशवासीयांसाठी अभिमानाचा विषय असतो. शनिवारी सामना सुरू होताच शहरवासीय दूरचित्रवाणी संचासमोर बसले होते. भारताने सामना जिंकताच रात्री क्रिकेटप्रेमींनी जल्लोष सुरू केला. तरुणाईने शिवाजी चौकात एकच गर्दी केली होती. फटाक्यांची आतषबाजी करतानाच त्यांनी दुचाकी गाड्यांचे सायलन्सर काढून जल्लोष केला. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता. तलवार नेताना पोलिसांनी पकडले जल्लोष सुरू असतानाच शिवाजी चौकात शनिवार पेठ परिसरातील दोघेजण दुचाकीवरून तलवार घेऊन जाताना बंदोबस्तावरील पोलिसांना दिसले. त्यांनी या दोघांना पकडून हत्यारासह पोलीस ठाण्यात आणले. ही तलवार आपण लग्नासाठी नेत असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या दोघांवर सीआरपीसी २८३ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. हा प्रकार समजताच शनिवार पेठ व सोमवार पेठ परिसरातील मित्रांनी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती.(प्रतिनिधी)