शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

पॅकबंद ‘शिवशाही’ला अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:24 IST

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संकट सर्व जगावर पसरले आहे. त्यात एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करतानाही सुरक्षित प्रवास कसा होईल, ...

गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संकट सर्व जगावर पसरले आहे. त्यात एका गावाहून दुसऱ्या गावी प्रवास करतानाही सुरक्षित प्रवास कसा होईल, याकडे प्रवाशांचे काटेकोरपणे लक्ष असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कमी प्राधान्य देऊन प्रवासी स्वत:च्या अथवा ट्रॅव्हल्सच्या बसेसना अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत. काही प्रवाशांच्या मते पॅकबंद बसेसमधून गेल्यानंतर कोरोना होण्याची शक्यता अधिक असते; तर काहींना बसस्थानकावरील गर्दी, गोंगाट नको असतो. त्यातूनच कोरोनाची लागण होऊ शकते. असे १०० पैकी ७० जणांना वाटते. त्यामुळे अनेकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला रामराम करीत स्वत:च्या, खासगी चारचाकीने प्रवास करण्यास अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेल्या एस. टी. महामंडळास दिवसेंदिवस मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेक वेळा या वातानुकूलित बसना एकूण आसन क्षमतेच्या अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. त्याचा थेट परिणाम व्यवसायावरही होत आहे. एकूण फेऱ्या आणि सर्व खर्च जाऊन महामंडळास काहीच हाती लागत नाही. विशेष म्हणजे यांतील काही बसेस खासगी कंत्राटी पद्धतीने महामंडळाकडे घेण्यात आलेल्या आहेत. नियमित वातावरणात तिकिटाचे दर उच्च असूनही अनेक प्रवासी सुरक्षित आणि चांगला प्रवास म्हणून ‘शिवशाही’ने प्रवास करणे पसंत करतात. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर आता आलेल्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी शिवशाहीच काय, सर्वच सार्वजनिक वाहतुकीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.

अधिक पसंतीच्या पुणे मार्गालाही अल्प प्रतिसाद

पुण्यामध्ये आयटीसह इतरत्र नोकरी करणारे तरुण, तरुणी दोन दिवसांचा विकऑफ असल्यामुळे शुक्रवारी रात्री कोल्हापूरला येत असत आणि दोन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी सकाळी पुण्याकडे प्रस्थान करीत असत. हा अनेक प्रवाशांचा आठवड्याचा क्रम होता. विशेष म्हणजे अनेकांची महिनोमहिन्यांची खास शिवशाहीची आरक्षणे फुल्ल होती. मात्र, कोरोनाच्या लाटेनंतर ही आरक्षणे सोडाच; नियमित प्रवासाकडेही या ठरलेल्या प्रवाशांनी पाठ फिरवली आहे.

उत्पन्नात घट

लाॅकडाऊननंतर कोल्हापूर-पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूर या मार्गांवरील शिवशाही सेवा पूर्ववत झाली. तिकिटांचे दर उच्च असूनही अनेकजण या बसेसमधून प्रवासास प्राधान्य देत होते. मात्र, कोरोनाची लाट पुन्हा सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांपासून नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांनीही पाठ फिरविली आहे. त्यामुळे शिवशाहीचे उत्पन्न २५ टक्क्यांवर आले आहे.

कोट

नियमित बसेसपेक्षा या बसेसमधून महामंडळास चांगले उत्पन्न मिळत होते. मात्र, कोरोनाच्या कहर पुन्हा वाढू लागल्यानंतर प्रवासी संख्येत घट आली आहे. त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होऊ लागला आहे. महामंडळ प्रवाशांची सर्व ती काळजी घेते. तरीही प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.

- रोहन पलंगे, विभाग नियंत्रक, एस.टी. महामंडळ, कोल्हापूर विभाग

शिवशाहीची एकूण संख्या - ३४

सध्या सुरू - १९