शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

जाचक अटींमुळे अपघात विमा योजनेस अल्प प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

चंदगड तालुक्यातील स्थिती : ५ वर्षांत अवघे ४१ लाभार्थी, अटी शिथिल करण्याची मागणी

नंदकुमार ढेरे -चंदगड -नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाते. पण, या योजनेतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू व अन्य काही अटींमुळे गेल्या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाले, तर लाख रुपयांची मदत मिळते. एक अवयव निकामी झाला, तर ५० हजार रुपये मिळतात. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १० ते ७५ वर्षे या दरम्यान असण्याची अट आहे. त्याचबरोबर प्रस्तावासोबत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले, तर त्या संबंधी फेरफार नोंद (गाव नमुना नं. ६-ड), पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे जोडून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयास सादर करावा लागतो. कृषी कार्यालय तो विमा कंपनीस पाठवते. त्यानंतर योजनेचा लाभ विमा कंपनी देते.७/१२ पत्रकावर कुटुंबातील वडीलधारी म्हणजेच कर्त्या व्यक्तीचे नाव असते. परंतु प्रत्यक्षात शासनाने कर्ती म्हणून संबोधलेली व्यक्ती वयोमानानुसार तसेच आजारपण वगैरे अन्य कारणाने खऱ्या अर्थाने कर्ती असतेच असे नाही. तसेच वडीलधारी व्यक्ती हयात असल्याने कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींची नावे (मुलांची) ७/१२ पत्रकी नोंद नसतात. पण बऱ्याच कुटुंबाचा भार या मुलांवर अवलंबून असतो. दुर्दैवाने कुटुंब चालवणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यास संबंधिताचे नाव ७/१२ पत्रकी नसल्याने शासनाच्या नियमानुसार या कुटुंबाला मदतीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली अनेक कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच जाचक अटीमुळे २००८-०९ त २०१४-१५ या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.२०१४-१५ मध्ये कृषी कार्यालयास चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात कुटुंबातील कर्त्या पण ७/१२ पत्रकी खातेदार म्हणून नावाची नोंद नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित कुटुंबाला या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाला जर खऱ्या अर्थाने शेतकरी जनता अपघात योजनेचा लाभ अडचणीतील शेतकरी कुटुंबाला द्यायचा असेल, तर या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर उठाव होण्याची गरज आहे.