शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

जाचक अटींमुळे अपघात विमा योजनेस अल्प प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

चंदगड तालुक्यातील स्थिती : ५ वर्षांत अवघे ४१ लाभार्थी, अटी शिथिल करण्याची मागणी

नंदकुमार ढेरे -चंदगड -नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाते. पण, या योजनेतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू व अन्य काही अटींमुळे गेल्या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाले, तर लाख रुपयांची मदत मिळते. एक अवयव निकामी झाला, तर ५० हजार रुपये मिळतात. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १० ते ७५ वर्षे या दरम्यान असण्याची अट आहे. त्याचबरोबर प्रस्तावासोबत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले, तर त्या संबंधी फेरफार नोंद (गाव नमुना नं. ६-ड), पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे जोडून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयास सादर करावा लागतो. कृषी कार्यालय तो विमा कंपनीस पाठवते. त्यानंतर योजनेचा लाभ विमा कंपनी देते.७/१२ पत्रकावर कुटुंबातील वडीलधारी म्हणजेच कर्त्या व्यक्तीचे नाव असते. परंतु प्रत्यक्षात शासनाने कर्ती म्हणून संबोधलेली व्यक्ती वयोमानानुसार तसेच आजारपण वगैरे अन्य कारणाने खऱ्या अर्थाने कर्ती असतेच असे नाही. तसेच वडीलधारी व्यक्ती हयात असल्याने कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींची नावे (मुलांची) ७/१२ पत्रकी नोंद नसतात. पण बऱ्याच कुटुंबाचा भार या मुलांवर अवलंबून असतो. दुर्दैवाने कुटुंब चालवणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यास संबंधिताचे नाव ७/१२ पत्रकी नसल्याने शासनाच्या नियमानुसार या कुटुंबाला मदतीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली अनेक कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच जाचक अटीमुळे २००८-०९ त २०१४-१५ या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.२०१४-१५ मध्ये कृषी कार्यालयास चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात कुटुंबातील कर्त्या पण ७/१२ पत्रकी खातेदार म्हणून नावाची नोंद नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित कुटुंबाला या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाला जर खऱ्या अर्थाने शेतकरी जनता अपघात योजनेचा लाभ अडचणीतील शेतकरी कुटुंबाला द्यायचा असेल, तर या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर उठाव होण्याची गरज आहे.