शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

जाचक अटींमुळे अपघात विमा योजनेस अल्प प्रतिसाद

By admin | Updated: May 26, 2015 00:52 IST

चंदगड तालुक्यातील स्थिती : ५ वर्षांत अवघे ४१ लाभार्थी, अटी शिथिल करण्याची मागणी

नंदकुमार ढेरे -चंदगड -नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास शासनाकडून संबंधित कुटुंबाला शेतकरी जनता अपघात विमा योजनेंतर्गत १ लाख रुपयांची मदत दिली जाते. पण, या योजनेतील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू व अन्य काही अटींमुळे गेल्या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ जणांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा नैसर्गिक आपत्ती किंवा अपघाती मृत्यू किंवा दोन अवयव निकामी झाले, तर लाख रुपयांची मदत मिळते. एक अवयव निकामी झाला, तर ५० हजार रुपये मिळतात. योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय १० ते ७५ वर्षे या दरम्यान असण्याची अट आहे. त्याचबरोबर प्रस्तावासोबत अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे नाव ७/१२ वर आले, तर त्या संबंधी फेरफार नोंद (गाव नमुना नं. ६-ड), पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल, आदी कागदपत्रे जोडून प्रस्ताव तालुका कृषी कार्यालयास सादर करावा लागतो. कृषी कार्यालय तो विमा कंपनीस पाठवते. त्यानंतर योजनेचा लाभ विमा कंपनी देते.७/१२ पत्रकावर कुटुंबातील वडीलधारी म्हणजेच कर्त्या व्यक्तीचे नाव असते. परंतु प्रत्यक्षात शासनाने कर्ती म्हणून संबोधलेली व्यक्ती वयोमानानुसार तसेच आजारपण वगैरे अन्य कारणाने खऱ्या अर्थाने कर्ती असतेच असे नाही. तसेच वडीलधारी व्यक्ती हयात असल्याने कुटुंबातील अन्य कर्त्या व्यक्तींची नावे (मुलांची) ७/१२ पत्रकी नोंद नसतात. पण बऱ्याच कुटुंबाचा भार या मुलांवर अवलंबून असतो. दुर्दैवाने कुटुंब चालवणाऱ्या कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यास संबंधिताचे नाव ७/१२ पत्रकी नसल्याने शासनाच्या नियमानुसार या कुटुंबाला मदतीची रक्कम मिळत नाही.त्यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा (मुलाचा) मृत्यू झाल्यानंतर कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण झालेली अनेक कुटुंबे या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. याच जाचक अटीमुळे २००८-०९ त २०१४-१५ या पाच वर्षांत चंदगड तालुक्यातील केवळ ४१ शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे.२०१४-१५ मध्ये कृषी कार्यालयास चार प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातात कुटुंबातील कर्त्या पण ७/१२ पत्रकी खातेदार म्हणून नावाची नोंद नसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर संबंधित कुटुंबाला या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन शासनाला जर खऱ्या अर्थाने शेतकरी जनता अपघात योजनेचा लाभ अडचणीतील शेतकरी कुटुंबाला द्यायचा असेल, तर या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वच पातळीवर उठाव होण्याची गरज आहे.