शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
3
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
4
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
5
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
6
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
7
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
8
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
9
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
10
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
11
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
12
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
13
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
14
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
15
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
16
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
17
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
18
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
19
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
20
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

संरक्षणात दुकानदारांचा अडथळा

By admin | Updated: September 21, 2016 01:06 IST

अंबाबाई मंदिर : राज्य शासनाच्या अध्यादेशावर हरकती

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक ’ म्हणून घोषित करण्यात मंदिर परिसरातील दुकानदारांचा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशावर २४ हरकती आल्या असून, त्यांत जवळपास २० हून अधिक दुकानदारांचा समावेश आहे. अन्य हरकती या खासगी मंदिरे व जागेच्या संदर्भात आहेत. या हरकतींबाबत पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यात हरकतीदार व अधिकारी यांच्याशी संवाद साधून वाद न होता तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असूनही, अनास्थेमुळे या मंदिराचा राज्य संरक्षित स्मारकात समावेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन करणाऱ्या देवस्थान समितीपासून ते भक्तांपर्यंत, व हितसंबंध गुंतलेल्या व्यक्ती, व्यापारी या घटकांनी मंदिर वास्तुरचनेत आधुनिक व अनावश्यक बदल करून मंदिराचे विद्रूपीकरण केले आहे. मंदिराचा ‘पुरातत्त्व’मध्ये समावेश नसल्याने कोणीही यावे आणि वाट्टेल ते करावे, अशी त्याची अवस्था झाली होती. मात्र मंदिर व मूर्ती अभ्यासक, महापालिका व मंदिराशी निगडित व्यक्तींच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या पुरातत्त्व खात्याने २० जुलै रोजी अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करणार असल्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला. याची प्रत देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर लावली आहे. या अध्यादेशावर दोन महिन्यांच्या आत हरकती मागविल्या होत्या. त्याची मुदत मंगळवारी संपली. गैरसमजच अधिकअंबाबाई मंदिराचा राज्य संरक्षित स्मारकात समावेश झाला तर आम्हाला त्रास होईल. आमचा उद्योग-व्यवसाय अडचणीत येईल, अशा अनेक गैरसमजुती आहेत. त्यातून शासनाच्या अध्यादेशावर हरकती नोंदविल्या. मंदिराच्या चारीही दरवाजांच्या आतील परिसर हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीेचा आहे. दुकानगाळेसुद्धा समितीनेच भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यांचे पुनर्वसन मंदिर विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार आहे. येथील खासगी मंदिरे आणि जागाही अंबाबाई मंदिराच्या परिसरातच असल्याने आजही तेथे सुधारणा किंवा बांधकाम करता येत नाही आणि मंदिर हे स्मारक म्हणून घोषित झाल्यावर तर नाहीच नाही. उलट मंदिराचा राज्य शासनाच्या यादीत समावेश झाला तर मंदिराची हेळसांड थांबून, अभ्यासकांचा, पर्यटकांचा ओढा वाढेल. राज्य संरक्षित स्मारकात समावेश नसल्याने अंबाबाई मंदिराचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या वास्तूचे प्राचीन वैभव आणि पावित्र्य जपले जाणे गरजेचे आहे. संरक्षित स्मारकात समावेश झाला तर मंदिराचे प्राचीन स्वरूप खुलविण्यासाठी निधीची वाट पाहावी लागणार नाही. अनावश्यक बाबी काढून मंदिराचे सौंदर्य अबाधित राखले जाईल. - विलास वहाने (सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग)’’मंदिराच्या अध्यादेशावर २४ हरकती आल्या असून, त्यांवर हरकतीदार व अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मंदिरातील बेकायदेशीर बाबींना आळा बसेल.- संजय बोकरे (उपसचिव, सांस्कृतिक विभाग, मंत्रालय)