शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षणात दुकानदारांचा अडथळा

By admin | Updated: September 21, 2016 01:06 IST

अंबाबाई मंदिर : राज्य शासनाच्या अध्यादेशावर हरकती

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक ’ म्हणून घोषित करण्यात मंदिर परिसरातील दुकानदारांचा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने जाहीर केलेल्या अध्यादेशावर २४ हरकती आल्या असून, त्यांत जवळपास २० हून अधिक दुकानदारांचा समावेश आहे. अन्य हरकती या खासगी मंदिरे व जागेच्या संदर्भात आहेत. या हरकतींबाबत पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. त्यात हरकतीदार व अधिकारी यांच्याशी संवाद साधून वाद न होता तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असूनही, अनास्थेमुळे या मंदिराचा राज्य संरक्षित स्मारकात समावेश होऊ शकलेला नाही. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन करणाऱ्या देवस्थान समितीपासून ते भक्तांपर्यंत, व हितसंबंध गुंतलेल्या व्यक्ती, व्यापारी या घटकांनी मंदिर वास्तुरचनेत आधुनिक व अनावश्यक बदल करून मंदिराचे विद्रूपीकरण केले आहे. मंदिराचा ‘पुरातत्त्व’मध्ये समावेश नसल्याने कोणीही यावे आणि वाट्टेल ते करावे, अशी त्याची अवस्था झाली होती. मात्र मंदिर व मूर्ती अभ्यासक, महापालिका व मंदिराशी निगडित व्यक्तींच्या पाठपुराव्यामुळे शासनाच्या पुरातत्त्व खात्याने २० जुलै रोजी अंबाबाई मंदिराला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करणार असल्याचा अध्यादेश प्रसिद्ध केला. याची प्रत देवस्थान समितीच्या कार्यालयाबाहेर लावली आहे. या अध्यादेशावर दोन महिन्यांच्या आत हरकती मागविल्या होत्या. त्याची मुदत मंगळवारी संपली. गैरसमजच अधिकअंबाबाई मंदिराचा राज्य संरक्षित स्मारकात समावेश झाला तर आम्हाला त्रास होईल. आमचा उद्योग-व्यवसाय अडचणीत येईल, अशा अनेक गैरसमजुती आहेत. त्यातून शासनाच्या अध्यादेशावर हरकती नोंदविल्या. मंदिराच्या चारीही दरवाजांच्या आतील परिसर हा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मालकीेचा आहे. दुकानगाळेसुद्धा समितीनेच भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यांचे पुनर्वसन मंदिर विकास आराखड्यांतर्गत करण्यात येणार आहे. येथील खासगी मंदिरे आणि जागाही अंबाबाई मंदिराच्या परिसरातच असल्याने आजही तेथे सुधारणा किंवा बांधकाम करता येत नाही आणि मंदिर हे स्मारक म्हणून घोषित झाल्यावर तर नाहीच नाही. उलट मंदिराचा राज्य शासनाच्या यादीत समावेश झाला तर मंदिराची हेळसांड थांबून, अभ्यासकांचा, पर्यटकांचा ओढा वाढेल. राज्य संरक्षित स्मारकात समावेश नसल्याने अंबाबाई मंदिराचे नुकसान झाले आहे. मंदिराच्या वास्तूचे प्राचीन वैभव आणि पावित्र्य जपले जाणे गरजेचे आहे. संरक्षित स्मारकात समावेश झाला तर मंदिराचे प्राचीन स्वरूप खुलविण्यासाठी निधीची वाट पाहावी लागणार नाही. अनावश्यक बाबी काढून मंदिराचे सौंदर्य अबाधित राखले जाईल. - विलास वहाने (सहायक संचालक, पुरातत्त्व विभाग)’’मंदिराच्या अध्यादेशावर २४ हरकती आल्या असून, त्यांवर हरकतीदार व अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मंदिरातील बेकायदेशीर बाबींना आळा बसेल.- संजय बोकरे (उपसचिव, सांस्कृतिक विभाग, मंत्रालय)