शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

चित्रनगरीला ‘शूटिंग’ची आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:04 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भारतातील पहिला बोलपट, पहिला सामाजिक चित्रपट, पहिला सुपरस्टार, भारतीय बनावटीचा पहिला ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भारतातील पहिला बोलपट, पहिला सामाजिक चित्रपट, पहिला सुपरस्टार, भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, पोस्टर पेंटिंग अशा अगणित विक्रमांतून मराठीच नव्हे, तर भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ देणाऱ्या कोल्हापूरचे भविष्य आता मात्र अंधारात आहे.येथील चित्रपटसृष्टी संपल्यात जमा आहे; तर आशेचा किरण असलेल्या सुसज्ज चित्रनगरीला वर्ष लोटले तरी तिच्यासंबंधी दूरदृष्टी आणि विकासात्मक धोरणाचा अभाव असल्याने चित्रपट व्यावसायिकांनी तिच्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे आता कोल्हापूरच्या चित्रपट परंपरेचे आणि इतिहासाचे गोडवे गाण्यापलीकडे कोल्हापूरकरांच्या हाती काही नसल्याचे निराशाजनक चित्र आहे.कोल्हापूर म्हणजे कलेचे माहेरघर. राजाश्रयामुळे येथे चित्र, शिल्प, नाट्य, नृत्य, संगीत अशा सगळ्या कला बहरल्या. भारतीय चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ देणारी बीजे रोवली गेली ती कोल्हापुरात. आज देशात मुंबई, हैदराबादसारखी शहरे चित्रपटनिर्मितीचे मुख्य केंद्र बनली असली तरी एकेकाळी कोल्हापूर अव्वल स्थानी होते. मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील राज कपूर, दिलीपकुमार यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी या मातीत अभिनयाचे धडे घेतले. कलामहर्षी बाबूराव पेंटरांपासून सुरू झालेली ही परंपरा पुढे भालजी पेंढारकर, व्ही. शांताराम, अनंत मानेंपर्यंत झिरपत आली. मध्यंतरीचा काळ जसा मराठी चित्रपटसृष्टीसाठी खडतर होता, तसाच तो कोल्हापूरच्या चित्रपट व्यवसायासाठीही होता.त्याला नवी उभारी देण्यासाठी ‘कोल्हापूर चित्रनगरी’ची मागणी पुढे आली. शालिनी सिनेटोन आणि ‘जयप्रभा’मध्येच चित्रनगरी सुरू करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर कोल्हापुरातील मोरेवाडीच्या ७७ एकर विस्तीर्ण माळरानावर २५ सप्टेंबर १९८४ रोजी कोल्हापूर चित्रनगरीचा नारळ फुटला. त्यासाठी दिग्दर्शक अनंत माने, द. स. अंबपकर, चंद्रकांत, सूर्यकांत, आय. बारगीर, सुभाष भुरके, वसंत शिंदे व शंकर सावेकर यांनी पुढाकार घेतला होता. सुरुवातीची काही वर्षे चित्रनगरीत मोठ्या प्रमाणात चित्रीकरण झाले. मात्र, शासकीय उदासीनतेतून यंत्रसामग्रीच्या अभावाने येथील चित्रपट निर्मिती रोडावली. पुढे शासनाने तोट्यात चाललेली महामंडळे बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यात चित्रनगरीचाही समावेश होता. मात्र, कोल्हापूरकरांनी उभारलेल्या जनआंदोलनाने शासनाला हा निर्णय बदलण्यास भाग पाडले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय जाहीर झाल्यानंतरही चित्रनगरीला मोडकळीस आलेली इमारत, वटवाघळांचा मुक्त संचार, जाळी-जळमटे अशा अवस्थेत एक तप काढावे लागले. अखेर २०१२ साली शासनाच्या वतीने चित्रनगरीचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरले आणि विकास आराखडा तयार झाला.कागदावरील हा आराखडा वास्तवात उतरण्यासाठी २०१६ साल उजाडले आणि पहिल्या टप्प्यातील १२ कोटींच्या विकासकामांना सुरुवात झाली. अनेक वर्षांचा वनवास, लाल फितीचे चटके आणि असंख्य अडचणी पार करीत कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या विकासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. डिसेंबर २०१७ मध्ये या चित्रनगरीचे उद्घाटन होणार होते; पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही.पुढील टप्प्यासाठी १६ कोटीचित्रनगरीच्या पहिल्या टप्प्यात चित्रीकरण तातडीने सुरू होण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातून शासनाला उत्पन्न सुरू झाले की, दुसरा टप्प्याच्या १६ कोटींच्या आराखड्याचे काम सुरू करण्याचे नियोजन होते. यात हिंदी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी लागणारा मोठा स्टुडिओ उभारण्यात येणार आहे. त्याला नऊ कोटींपर्यंत खर्च अपेक्षित आहे. याशिवाय परिसरातील अन्य रस्ते व खास चित्रीकरणासाठी उपयुक्त असतील अशी १५ फूट उंचीची वैशिष्ट्यपूर्ण झाडे लावण्यात येणार आहेत; पण पहिला टप्पा संपून वर्ष झाले तरी येथे चित्रीकरणच सुरू झालेले नाही. त्यामुळे दुसºया टप्प्याचा विचार अजून नजरेच्या टप्प्यात नाहीच.अवास्तव दर, व्यावसायिकतेचा अभावचित्रनगरीच्या पुनरुज्जीवनानंतर येथील लोकेशन्सचे दर मराठी चित्रपट व्यावसायिकांना परवडणारे असतील असे सांगण्यात आले होते; पण झाले उलटेच. व्यवस्थापनाने प्रत्येक लोकेशनला एका दिवसासाठी आकारलेले अवास्तव भाडे पाहता वर्षानंतरही येथे चित्रपटांचे शूटिंग का होत नाही, याचे कारण समजेल. सध्या मुंबईतील गोरेगाव फिल्मसिटीसह अन्य स्टुडिओंमध्ये हिंदी, मराठीसह चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण होते. कन्नड, दाक्षिणात्य शहरांमध्येही मोठ्या प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. त्याला उत्तम पर्याय म्हणून चित्रनगरीकडे पाहिले जात होते. कोल्हापुरात चांगला स्टुडिओ आहे, याची हिंदीच काय; मराठीतील चित्रपट-मालिका निर्मात्यांनाही माहिती नाही. चित्रनगरीची प्रसिद्धीच करण्यात आलेली नाही. हिंदी-मराठी चित्रपट, मालिकांच्या प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचलेले नाही. त्यांना येथे चित्रीकरणासाठी प्रोत्साहित केलेले नाही.नव्या पिढीची धडपडएकीकडे कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीची दुरवस्था होत असताना दुसरीकडे तरुणाईची धडपड आणि त्यांना मिळत असलेले यश ही सकारात्मक बाब आहे. येथील मातीत तयार झालेले चित्रपट, लघुपट विविध महोत्सवांत गाजत आहेत. अनेक कलाकारांनी चित्रपट, मालिकांमधून आपले स्थान पटकाविले आहे. ग्रामीण भागातील कलाकार, आपापल्या संकल्पना घेऊन या क्षेत्रात उतरत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यासाठी चित्रपट महामंडळासह या क्षेत्राशी संबंधित संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘जयप्रभा’चे काय करणार ?चित्रपटसृष्टीला उभारी देण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी जयप्रभा स्टुडिओ उभारला. त्यानंतरच्या सरकारनेही भालजींना ‘परिसराचा वापर केवळ चित्रपटासाठीच केला जावा,’ असा करार करून हा स्टुडिओ विकला. या स्टुडिओत भालजींनी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळ दिला; पण भालजी अडचणीत आल्यानंतर त्यांनी हा स्टुडिओ आणि परिसरातील जागा गायिका लता मंगेशकर यांना विकली. मध्यंतरीच्या काळात स्टुडिओ बंद पडला आणि मराठी चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली. परिणामी, जयप्रभा स्टुडिओचीही वाताहत झाली. लता मंगेशकर यांनी सुरुवातीला मोकळी जागा विकली; पण प्रत्यक्ष स्टुडिओ विक्रीचा घाट घातल्यानंतर कोल्हापूरकरांनी २०१३ साली आंदोलन केले. दरम्यान, महापालिकेने जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज वास्तूंच्या यादीत केल्याने हा स्टुडिओ बचावला आहे.काही दिवसांपूर्वीच ‘हेरिटेज’विरोधातील याचिका लता मंगेशकर यांनी सर्वोच्च न्यायालयातून काढून घेतली. स्टुडिओ वाचला तरी त्याचे पुढे काय हा प्रश्न उरतोच. रया गेलेल्या इमारती आणि तुटलेले गेट एवढीच काय ती स्टुडिओची संपत्ती! चित्रीकरणाचे साहित्य पूर्वीच हलविले गेले आहे. शिवाय स्टुडिओ हेरिटेज यादीत असला तरी त्याची मालकी लता मंगेशकर यांचीच आहे. शासनाने सध्या चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केल्याने पुन्हा जयप्रभा स्टुडिओसाठी निधी मिळणे शक्य नाही. त्यामुळे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जयप्रभा स्टुडिओचे करणार काय, हा प्रश्न आहे.चित्रपट संग्रहालय हवेचकोल्हापूरला चित्रपटसृष्टीची १०० वर्षांची परंपरा लाभली आहे. हा उज्ज्वल इतिहास सगळ्यांना केवळ माहिती आहे; पण त्याची साक्ष देणारे एकही चित्रपट संग्रहालय कोल्हापुरात नाही. अजूनही येथील जुन्या-जाणत्या कलाकारांकडे, चित्रपट व्यावसायिकांकडे तसेच चित्रपट महामंडळाकडे कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्यापासूनची छायाचित्रे, कृष्णधवल चित्रपट, त्या काळी चित्रीकरणात झालेले प्रयोग, लहान-मोठ्या फिल्म्सचा खजिना उपलब्ध आहे. या सगळ्यांचे संकलन तसेच दिवंगत चित्रपट व्यावसायिकांची माहिती, त्यांनी निर्माण केलेले चित्रपट, येथील मातीत घडलेले कलाकार, त्यांची छायाचित्रे चित्रपट संग्रहालयात ठेवल्यास कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीचा इतिहास जगाला कळेल. आता ‘शालिनी’चे अस्तित्व संपले; पण ‘जयप्रभा’मधील स्टुडिओचे स्ट्रक्चर अजूनही आहे. या इमारतीचेच नूतनीकरण करून तेथे चित्रपट संग्रहालय उभारणे सहज शक्य आहे.अजूनही वेळ गेली नाहीआता कोल्हापुरातून चित्रपट निर्माण होत नसले तरी त्यासाठी व मालिकांसाठीचे लोकेशन्स, सहकलाकार, तंत्रज्ञ, नृत्य-कलादिग्दर्शक, लेखक, सहदिग्दर्शक अशी कॅमेºयामागचे जग सांभाळणारी भक्कम फळी येथे आहे. शहराच्या बाह्य परिसरात, गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रीकरण होते. त्यामुळे स्थानिक चित्रपट व्यावसायिकांनाही रोजगार मिळाला आहे. अजूनही या क्षेत्रात खूप काही करण्यासारखे आहे. त्यासाठी स्थानिक चित्रपट व्यावसायिकांनीही थोडा पुढाकार घ्यायला हवा.शिल्पं गेली अडगळीतकोल्हापूरला लाभलेल्या चित्रपट परंपरेच्या खाणाखुणा सांगणारी ‘प्रभात’ची तुतारी, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या कॅमेºयाचे शिल्प, त्यांचा पुतळा, जी. कांबळेंचे संग्रहालय हा सगळा ठेवा आता अडगळीत गेला आहे. पर्यटकांनी ही शिल्पे पाहण्यासाठी यावे या दृष्टीने त्यांचे सुशोभीकरण झालेले