शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शॉटकट मार्गामुळे बॉक्साईट वाहतूक झाली अडचणीची

By admin | Updated: May 27, 2014 19:37 IST

कसबा तारळेतील ग्रामस्थ संतप्त : आंदोलनाचा इशारा

कसबा तारळे : राधानगरी तालुक्यातील हिंडाल्को माईन्स येथून बॉक्साईटची वाहतूक करणार्‍या अनेक ट्रकची कसबा तारळे, गुडाळ, खिंडी-व्हरवडे गावांतून वर्दळ सुरू आहे. या मार्गावर लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकार्‍यांना सांगूनही वाहतूक मार्गात बदल झालेला नाही. याबाबत कंपनीने तत्काळ दखल न घेतल्यास ‘रास्ता रोको’चा इशारा धनंजय महाडिक युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर पाटील यांनी दिला आहे. दुर्गमानवाड पैकी पडसाळी येथून हिंडाल्को कंपनीची बॉक्साईट वाहतूक बेळगाव येथे सुरू आहे. यासाठी दिवसभरात २५० ते ३०० ट्रक वाहतूक करीत आहेत. ही वाहतूक माईन्सपासून दुर्गमानवाड, पिरळ, राधानगरी, गैबी तिट्टा, सरवडे, निपाणीमार्गे बेळगाव अशी सुरू आहे. परंतु वाहतूक करणारे शंभरच्या वर ट्रक अंतर व वेळ वाचविण्यासाठी कसबा तारळे, गुडाळ, खिंडी व्हरवडेमार्गे अकनूर, मुधाळ तिट्टा या गावांतून वाहतूक करीत आहेत. यातील अनेक ट्रक हे वरील गावातील आहेत; त्यामुळे गावातून जाण्यासाठी किंवा वेळ व अंतर वाचविण्याच्या उद्देशाने ते वाहतूक करीत आहेत. गावातील रस्ते अरुंद असून रहदारी जास्त आहे. त्यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघातही झालेले आहेत. ग्रामस्थांनी व तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु स्थानिक ट्रकचालक किंवा मालकांनी याची दखल घेतली नसल्याने वादावादीचे प्रसंगही घडले आहेत. कंपनीचे कर्मचारीही वाहतूक मार्गावर जाणार्‍या-येणार्‍या ट्रकचे नंबर नोंद करून घेत आहेत; पण त्यावरही काही मर्यादा येत आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही लेखी निवेदन देण्यात आले आहे. यानंतर वाहतूक एक-दोन दिवस सुरळीत होते. परत ‘ये रे माझ्या मागल्या’प्रमाणे होत आहे.