शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

बिनकामी दुभाजक वाहनचालकांसाठी कर्दनकाळ

By admin | Updated: April 18, 2015 00:10 IST

निसरेफाटा येथे वाहतुकीस धोका : अपघातांमध्ये वाढ; दुभाजक काढण्याची नागरिकांची मागणी

राजेंद्र लोंढे- मल्हारपेठ निसरे फाटा येथील तिकाटण्यात बिनकामाचा दुभाजक मध्येच ठेवल्याने शेकडो अपघात होत असून, बांधकाम खाते याकडे मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशातून होत आहे.पाटण, कराड, उंब्रज मार्गाकडे जाणारे निसरे फाटा येथे तिकाटणे आहे. या चौकाचे २००० साली विस्तारीकरण करून संपूर्ण निसरे फाटा रुंदीकरण केला व ‘बीओटी’ तत्त्वावर टोल नाका सुरू केला. त्यावेळी ठेकेदारांनी रुंदीकरण करताना पिकअप शेड उद्ध्वस्थ केले व रस्त्यामध्ये दुभाजक टाकले. त्यावेळी रात्रीच्या वेळी पुरेशी लाईट, दुभाजक दर्शक फलक व लाईट रिफ्लेक्टर नसल्याने टोलनाक्याच्या पूर्वेकडील बाजूस सातत्याने दुभाजकाला धडक लागून रात्रीचे लहान-मोठ्या वाहनांचे अपघात होऊ लागले. अनेकवेळा दुभाजक पुन्हा-पुन्हा बांधले; परंतु आठवड्यातून एक तरी वाहन धडकून ते कठडे उद्ध्वस्थ होत होते. हा मार्ग म्हणजे गुहागर, पंढरपूर, चिपळूण, पाटण, विजापूर असा राष्ट्रीय महामार्ग आहे. दिवसरात्र सातत्याने निसरे फाट्यावर गर्दी व वाहनांची ससत वर्दळ असते. सध्या गेल्या दोन वर्षांपासून निसरे टोलनाका बंद करण्यात आला आहे. या परिसराची सर्व देखभाल बांधकाम खाते करीत आहे. यामार्गाची डागडुजी बांधकाम प्रशासन करीत असताना विनालाईट रिफ्लेक्टरचे हे २५ फूट लांबीचे, बिनकामाचे रस्ता दुभाजक मध्येच का ठेवलेत या प्रश्नाचे उत्तर अजुनती अनुत्तरीत आहे. हा धोकादायक दुभाजक काढण्यासाठी नागरिक व वाहनधारकांनी वारंवार मागणी केली. तरीही बांधकाम विभागाला या बाबीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. या दुभाजकांमुळे रात्रीच्या वेळी अपघात होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा या दुभाजक संबंधित विभागाने तत्काळ हटवावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीरस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकाविषयी सातारा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ग्रामस्थांनी विचारणा केली असता त्यांनी ‘हे काम पश्चिम विभागाशी संबंधित आहे. त्यांच्याशी संपर्क करून विचारा,’ असे सांगण्यात आले. अशा प्रकारे बांधकाम विभाग ही समस्या मिटविण्याऐवजी टोलवाटोलवी करीत असल्याचे नागरिकांचे म्हणने आहेया दुभाजकामुळे आजपर्यंत अनेत लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना अपंगत्व आले आहे. या दुभाजकामुळले वाहतुकीस धोका निर्माण होत असल्याने दुभाजक तत्काळ हटविने गरजेचे आहे.- मधुकर माने, वाहनधारक