शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

‘महावितरण’चा शेतीपंपधारकांना शॉक

By admin | Updated: April 10, 2017 23:46 IST

सोनाळीतील शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात : मीटर रीडिंग न घेताच परस्पर वाढविला वीजभार व वीज बिल

बोरवडे : महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले असून, कित्येक महिन्यांपासून शेतीपंप वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, मंजूर वीजभारपेक्षा मनमानी ज्यादा वाढविलेला वीजभार, वाढीव स्वरूपात विजेची बिले यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकमद अव्वाच्या सव्वा बिल धाडून ग्राहकांवर आर्थिक भार टाकला जात आहे. यामुळे कागल तालुक्यातील सोनाळीसह परिसरातील ग्राहक शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. मीटरचा फोटो घेऊन रीडिंग अपडेट करणे, त्यानंतर बिल प्रिंट करून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविणे याकरिता महावितरण कंपनीने खासगी एजन्सी नियुक्त केल्या आहेत. पंपास मीटर रीडिंग अनिवार्य असूनही अंदाजे बिल देण्यात येत आहे. पावसाळ्यामध्ये वीज वापर नसतानाही काही बिलांमध्ये मागील युनिटचा समावेश करून भरमसाट बिल पाठविले जात आहे. याबाबत अनेक ग्राहकांनी तक्रारीही केल्या, मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली गेली नाही. काहींना तर ही बिले भरावीच लागली. वीजग्राहकांना चुकीचे रीडिंग, वाढीव स्वरूपात विजेच्या बिलामुळे ग्राहकांत संतापाची लाट पसरली आहे. मंजूर वीजभारात महावितरणने परस्पर बिलावर वीजभार वाढविला जात आहे. वास्तविक हा बदल करताना कृषीपंपाची स्थळ तपासणी करायला हवी होती. त्यानंतर स्थळ तपासणीचा अहवाल तयार करावयाचा असतो; मात्र प्रत्यक्षात स्थळ तपासणी न करता कार्यालयातच बसून आपल्याला जसे वाटते तसे अंदाजे वीजभार वाढविण्याचा अजब कारभाराचा नमुना महावितरणने दाखविला आहे. काही बिलांवर तर रीडिंग वेगळे, फोटो दुसरा, तर बिल तिसऱ्याचेच पाठविले जात आहे. याबाबत महावितरण कार्यालयात विचारणा केली असता, आधी संपूर्ण वीज बिल भरा, त्यानंतर पुढे पाहू, असे उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. महावितरच्या या भोंगळ कारभाराचा शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून, ते ग्राहक न्यायालयाकडे धाव घेणार आहेत. महावितरणच्या या गलथान व मनमानीला येथील जनता वैतगली असून महावितरणमध्ये स्वच्छ व पारदर्शक कारभार कधी येणार? असा प्रश्न ग्राहकांमधून विचारला जात आहे. याबाबत मुरगूड कार्यालयाचे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता बिलविभागाकडे विचारणा करण्यास सांगितले. (वार्ताहर)आमच्या शेतीपंपाचा ०५ एच. पी. मंजूर वीजभार आहे. मात्र, विद्युत वितरण कंपनीने परस्पर ०७ एच. पी. असा वीजभार बिलावरती वाढवलेला आहे. पावसाळ्यामध्ये वीजवापर नसतानाही बिलावरती २१०० युनिट विजेची नोंद आहे. अद्याप बिलावरती कधीही मीटर रीडिंगचा फोटो आलेला नाही. याबाबत लेखी तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. - समाधान म्हातुगडे, ग्राहक, सोनाळीअनेकदा वीज कंपनीच्या चुकीमुळे बिलामध्ये प्रचंड घोळ असतो. या गोष्टीला महावितरण कंपनी जबाबदार आहे. याबाबत संबंधित कार्यालयाकडे ग्राहकांनी लेखी तक्रार करावी. तिथे दखल न घेतल्यास ग्राहक न्यायालयाकडे दाद मागावी. - कादंबरी प्रल्हाद भोंडे, संचालिका, अखिल भारतीय ग्राहक प्रबोधिनी न्यायमंच महाराष्ट्र राज्य