शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

By admin | Updated: June 7, 2017 01:05 IST

जयघोषाचा अखंड गजर : राज्यातील १४ विद्यापीठांच्या एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थित्ती; ढोलताशांच्या निनादाने शिवाजी विद्यापीठात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या जयघोषाचा अखंंड गजर आणि ढोलताशांच्या निनादात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. विद्यापीठात सुरू असलेल्या ‘आव्हान’ शिबिरातील सहभागी १४ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सुमारे १२०० शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या उत्साहाने विद्यापीठातील सकाळचे वातावरण शिवमय बनले. ‘आव्हान’मधील स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाचा अखंड गजर, ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनाची सकाळ शिवमय बनविली. यावेळी ‘एन. एस. एस.’चे स्वयंसेवक अक्षय चव्हाण, तेजस घुलघुले यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभारले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाईने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. सर्व मान्यवर ढोलताशांच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एन.एस.एस.चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, एन.डी.आर.एफ.चे निरीक्षक एस. डी. इंगळे, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.शिबिरार्थींकडून अनोख्या पद्धतीने अभिवादनशिबिरार्थींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून आलेल्या स्वयंसेवकांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच गटांत विभागणी केली. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले होते. यांपैकी पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.शिवराय हे ज्ञानाचे प्रतीकछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनीतीचा आणि कुशल व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी येथे केले. विद्यापीठात सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले.