शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

शिवमय वातावरणात शिवराज्याभिषेक दिन

By admin | Updated: June 7, 2017 01:05 IST

जयघोषाचा अखंड गजर : राज्यातील १४ विद्यापीठांच्या एनएसएस स्वयंसेवकांची उपस्थित्ती; ढोलताशांच्या निनादाने शिवाजी विद्यापीठात चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवरायांच्या जयघोषाचा अखंंड गजर आणि ढोलताशांच्या निनादात शिवाजी विद्यापीठात मंगळवारी ‘शिवराज्याभिषेक दिन’ साजरा करण्यात आला. विद्यापीठात सुरू असलेल्या ‘आव्हान’ शिबिरातील सहभागी १४ विद्यापीठांमधील राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) सुमारे १२०० शिबिरार्थी स्वयंसेवकांनी परिसरात चैतन्य निर्माण केले. त्यांच्या उत्साहाने विद्यापीठातील सकाळचे वातावरण शिवमय बनले. ‘आव्हान’मधील स्वयंसेवकांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती जमून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयघोषाचा अखंड गजर, ढोलताशांचा निनाद यांच्या तालावर विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनाची सकाळ शिवमय बनविली. यावेळी ‘एन. एस. एस.’चे स्वयंसेवक अक्षय चव्हाण, तेजस घुलघुले यांनी केलेल्या शिवगर्जनेने उपस्थितांच्या अंगावर रोमांच उभारले. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जोसेस वढाईने प्रेरणादायी शिवगीत सादर केले. सर्व मान्यवर ढोलताशांच्या गजरात विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील प्रांगणात जमले. कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, एन.एस.एस.चे समन्वयक डॉ. डी. के. गायकवाड, क्रीडा अधिविभागप्रमुख डॉ. पी. टी. गायकवाड, अधिष्ठाता डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पी. डी. राऊत, ए. एम. गुरव, एन.डी.आर.एफ.चे निरीक्षक एस. डी. इंगळे, नागरबाई शिंदे, अनिता शिंदे, डॉ. डी. आर. मोरे, आदी उपस्थित होते.शिबिरार्थींकडून अनोख्या पद्धतीने अभिवादनशिबिरार्थींनी अत्यंत अनोख्या पद्धतीने शिवरायांना अभिवादन केले. राज्याच्या १४ विद्यापीठांतून आलेल्या स्वयंसेवकांची पन्हाळा, भिवगड, कन्हेरगड, रायगड आणि देवगिरी पाच गटांत विभागणी केली. त्यांना अनुक्रमे भगवा, पांढरा, हिरवा, आकाशी आणि गडद निळा असे पाच रंगांचे गणवेश देण्यात आले होते. यांपैकी पांढऱ्या गणवेशातील विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याभोवती गोल कडे केले आणि इतर संघांनी पुतळ्याच्या बागेभोवती गोल कडे करीत रंगीबेरंगी स्वस्तिक साकारले.शिवराय हे ज्ञानाचे प्रतीकछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ शौर्याचेच नव्हे, तर ज्ञानाचेही प्रतीक आहेत. म्हणूनच आज जगभर त्यांच्या युद्धनीतीचा आणि कुशल व्यवस्थापनशास्त्राचा अभ्यास केला जातो, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी येथे केले. विद्यापीठात सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित विशेष समारंभात त्यांनी मार्गदर्शन केले.