शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिवनाकवाडीतील मुलांना हवाय मायेचा हात!

By admin | Updated: September 14, 2016 00:47 IST

बापानेच आईचा खून केल्याने मुले निराधार : सामाजिक, दानशूर व्यक्तींकडून मदतीची गरज

गणपती कोळी -- कुरूंदवाड-शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे सोमवारी पत्नी रुपालीचा राजेंद्र यशवंत माळी याने खून केल्याने या दाम्पत्यांची तीनही मुले निराधार बनली आहेत. वडिलांनी घरच सोडल्याने या मुलांना आईचाच आधार होता. मात्र, व्यसनी बापाने आईचाच खून करुन मुलांचा आधारही हिरावून घेतल्याने मुले पोरकी बनली आहेत. त्यामुळे या मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, पुन्हा उभारी देण्यासाठी मायेचा आधार देणाऱ्या माणसांची गरज आहे. माळी कुटुंबीय मूळचे हातकणंगले तालुक्यातील अंबप गावचे. अत्यल्प शेती त्यामुळे काम करुन कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी रुपाली व राजेंद्र पंधरा वर्षांपूर्वी शिवनाकवाडी येथे वास्तव्यास आले. राजेंद्र गावालगत असलेल्या आवाडे पेपर मिलमध्ये नोकरीस होता. त्यांना कोमल, मधुरा या दोन मुली तर शुभम् एक मुलगा आहे. घरचा चरितार्थ चालविताना पती-पत्नीमध्ये खटके उडत असत. त्यातच राजेंद्र व्यसनाच्या आहारी गेल्याने व नोकरीही सोडल्याने पत्नीकडेच वारंवार पैशाची मागणी करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार तंटा निर्माण होत होता. राजेंद्र गावातच एका धाब्यावर कामाला जावून आलेल्या पैशातून चैनी करत बाहेरच फिरायचा. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च व संसाराचा गाढा चालविण्यासाठी रुपाली यंत्रमागामध्ये कांड्या भरण्याचे काम करीत होती. वडील व्यसनी व घरी येत नसल्याने मुलांना आईचाच आधार होता. मात्र, वडिलांनी आईचाच खून केल्याने मुलांच्या पायाखालची माती सरकून डोक्यावरचे छत्र हरवले आहे. थोरली मुलगी कोमल इचलकरंजी येथील गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये अकरावी कॉमर्समध्ये शिकत आहे. मधुरा इयत्ता नववी तर मुलगा शुभम् इयत्ता आठवी शिवनाकवाडी येथे माध्यमिक शाळेत शिकत आहेत. शुभम् शारीरिकदृष्ट्या अशक्त असून वारंवार दवाखाना चालू असतो. व्यसनाधीन पतीची साथ नसतानाही केवळ मुलांना शिक्षण देऊन आपल्यासारखे जीवन त्यांच्या वाट्यास येऊ नये म्हणून स्वत: कष्ट करत मुलांना शिक्षण देण्यासाठी रुपालीची धडपड चालू होती. यातच पैशाच्या मागणीवरुन निर्दयी बापाने आईचाच खून केला.मृत रुपालीचे माहेर करवीर तालुक्यातील पोहाळे (कुशिरे) हे असून, आई-वडील हयात नसल्याने माहेरचेही दार बंद आहे. तर सासरी तुटपुंज्या जमिनीसाठी सासू-सासरेही जवळ घेत नसल्याने मुलांना आईचा तर आईला मुलांचा आधार होता. एकमेकांना आधार देत जीवन जगत असताना निर्दयी बापाने पत्नीचा खून करून आईचे छत्रही हिरावून घेतल्याने मुलेही भेदरली आहेत. आसरा देणारे, मायेची फुंकर घालणारे कोणीच नसल्याने मुले आईच्या फोटोकडे पाहात अद्यापही हंबरडा फोडत आहेत. शत्रूच्या वाट्यालाही असा प्रसंग येऊ नये, असे पाहणाऱ्यातून बोलत त्यांच्याही डोळ्यातून अश्रू ठिपकत आहेत. सध्या त्या मुलांना आधार देण्यासाठी त्यांच्या मावश्या दीपाली माळी (रा. सौंदलगा, ता. चिकोडी), शोभा मगदूम (मोहरे, ता. पन्हाळा) व सुवर्णा माळी (हुपरीे) या मुलांना धीर देत आहेत. आईचे छत्र हरपलेल्या या मुलांना मायेचा आधार देणाऱ्या माणसांची गरज आहे. मुलांना शिक्षणाबरोबर त्यांच्या आहाराची, सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या संस्था, व्यक्तिंनी पुढाकार घेतल्यास या मुलांना मायेचे मातृत्व मिळाल्यास दु:ख विसरून मुले नव्या जोमाने उभे राहतील व त्यांना आधार मिळेल. ग्रामस्थांनीच केले अंत्यसंस्काररुपाली माळी हिच्या खुनानंतर तीन मुले पोरकी झाल्याची चर्चा शिवनाकवाडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे ग्रामस्थांनी निधी गोळा करुन अंत्यसंस्कारासाठी खर्च केला व इचलकरंजीचे पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांनी मदतीचे आवाहन केले होते. यास प्रतिसाद देत गावातील तरुण मंडळांनी आर्थिक सहाय्य या मुलांना देण्याचे ठरविले असून, अन्य संस्था मदत देण्यासाठी सरसावत आहेत. हुशार असून, आर्थिक अडचण थोरली मुलगी कोमल अत्यंत हुशार असून, दहावीला तिने ८३ टक्के गुण घेवून शिवनाकवाडी विद्यालयात तिसरा क्रमांक घेतला होता. तिला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावयाचा होता. मात्र घरची आर्थिक परिस्थिती नसल्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. त्यामुळे हुशार असूनही केवळ आर्थिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही.