शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शिवाजीराव नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद शक्य

By admin | Updated: November 21, 2015 00:23 IST

पक्षवाढीसाठी निवड : पालकमंत्रीपदही मिळण्याची शक्यता; भाजपच्या कोअर कमिटी सूत्रांकडून दुजोरा

संजय घोडे-पाटील -- कोकरूड--सांगली जिल्ह्याचा मंत्रिपदाचा अनुशेष शिराळ्याचे आ. शिवाजीराव नाईक यांच्यारूपाने भरून निघत असल्याचे संकेत भाजपच्या कोअर कमिटीतील वरिष्ठ सूत्रांकडून मिळाले. येत्या शुक्रवार, दि. २७ रोजी शपथविधी होण्याचेही संकेत आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांत उत्साह संचारला असून, या वृत्ताला भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही दुजोरा दिला आहे.आ. शिवाजीराव नाईक सांगली जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते असून, चार वेळा आमदार व युती शासनाच्या कालावधित राज्यमंत्रीपद त्यांनी भूषविले आहे. स्वच्छ चारित्र्य, राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. शिराळ्यापासून जतपर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी राहू शकते, हे भाजपच्या सर्व वरिष्ठांनी ओळखले असून, पक्षवाढीच्यादृष्टीने त्यांची निवड योग्य असल्याचे बोलले जात आहे. पक्षात असणारे विरोधक हे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करण्यातही यशस्वी होत होते. आता मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत नाईक यांनी मंत्रिपदाची बाजी मारली आहे. भाजपचे खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. सुधीर गाडगीळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकाऱ्यांनी नाईक यांचे ज्येष्ठत्व या पातळीवर नाईक यांचेच नाव मंत्रिपदासाठी योग्य असल्याचा गोपनीय अहवाल पक्षाला दिला आहे. पक्षातील दुसरे ज्येष्ठ आ. सुरेश खाडे हे भाजपचे निष्ठावंत असून एक वेळा त्यांनी जतमधून अपक्ष म्हणून विजय मिळविला आहे. तसेच दोन वेळा पक्षाच्या तिकिटावर यश संपादन केले आहे. त्यांना हे यश वेगवेगळ्या परिस्थितीत व घटना या अनुषंगाने जरी मिळाले असले तरी, त्यांचा जिल्ह्याचा आवाका व अनुभव त्यादृष्टीने कमी आहे.गडकरींकडून आश्वासनाची पूृर्तता शक्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कामेरी (ता. वाळवा) येथील सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, शिवाजीरावांना निवडून द्या, मी त्यांना कॅबिनेट मंत्री करतो, असे आश्वासन जाहीर सभेत दिले होते. याला वर्षाचा कालावधी लोटला असून आता तिसऱ्यांदा विस्तार होताना या शब्दाची पूर्तता होत आहे. कोण काय म्हणाले?शिवाजीराव नाईक व मिरजेचे सुरेश खाडे या दोन आमदारांपैकी एकाला संधी मिळणार आहे. ज्यांना ही संधी मिळणार, त्याला कोअर कमिटी शपथविधीच्या आदल्या दिवशी निमंत्रण देणार आहे. त्याचवेळी जिल्ह्याला मंत्री कोण हे स्पष्ट हाईल.- राजाराम गरूड, भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत भाजपला जिल्ह्यात सर्वाधिक यश मिळाले असून, आम्ही सर्वचजण ज्याला हे पद मिळेल त्याच्या पाठीशी उभे राहून पक्षाची ताकत वाढविणार आहोत. एक खासदार व चार आमदार यापुढेही आम्ही एकदिलाने काम करणार आहोत.- आ. शिवाजीराव नाईक