शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
4
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
5
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
6
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
7
खुशखबर! थिएटरनंतर आता OTTवर दाखल होतोय 'धुरंधर', जाणून घ्या कुठे आणि कधी पाहता येणार?
8
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
9
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
10
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
11
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
12
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
14
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
15
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
16
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
17
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
18
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
19
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठ करणार तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:48 IST

संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू ...

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत जतन झालेल्या मराठी संस्कृतीचा अहद् तंजावर, तहद् पेशावरचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि तमिळ विद्यापीठामध्ये एप्रिलमध्ये सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांना दोन्ही प्रदेशांबरोबरच त्यांच्या सावत्र नात्यावरही आणखी प्रकाश पडणार असून, संशोेधनाचे नवे द्वार उघडणार आहे.चार वर्र्षांपूर्वी राज्य मराठी संस्कृती मंडळाच्या अनुदानातून तंजावरच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या जतनीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पावर कोल्हापूरचे मोडीतज्ज्ञ गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह महाराष्ट्रातील काही मान्यवर काम करीत होते. यावेळी मंडळामार्फत सात लाख दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्यात आले. यानिमित्ताने तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार करता येईल, असा विचार सुरू झाला. त्याला तमिळ विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने अनुकूलता दर्शविली. त्याला आॅगस्ट २०१९ मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले.यासाठी स्थापन केलेल्या समितीवर राज्य मराठी विकास मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर, सहायक संचालक डॉ. अशोक सोलणकर, तज्ज्ञ समिती सदस्य गणेश नेर्लेकर-देसाई, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. गिरीश मांडके, मुंबईचे मोडीतज्ज्ञ श्रीकृष्णाजी म्हात्रे यांची निवड करण्यात आली होती.सामंजस्य करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, गणेश नेर्लेकर, डॉ. नीलांबरी जगताप, तंजावरचे तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू सी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. विवेकानंद गोपाळ यांचा समावेश आहे.छत्रपतींचे घराणे म्हणून तंजावरचे भोसले घराणे ओळखले जाते; तेथील ऐतिहासिक व मोडी कागदपत्रांचे जतन त्या घराण्याने केले आहे, याची फार थोड्यांना माहिती आहे. तेथील माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची एक समिती तंजावरला पाठविली. डॉ. अवनीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीने अभ्यास करून तंजावर व कोल्हापूरचे संबंध आणखी दृढ होतील अशी कागदपत्रे तपासली आहेत. त्यातून हा सामंजस्य करार अस्तित्वात येत आहे. यानिमित्ताने दोन राज्यांतील जुने संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ