शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शिवाजी विद्यापीठ करणार तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:48 IST

संदीप आडनाईक । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू ...

संदीप आडनाईक ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांच्यामुळे कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांत जतन झालेल्या मराठी संस्कृतीचा अहद् तंजावर, तहद् पेशावरचा इतिहास उजेडात येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. या संदर्भात शिवाजी विद्यापीठ आणि तमिळ विद्यापीठामध्ये एप्रिलमध्ये सामंजस्य करार होणार आहे. त्यामुळे इतिहास संशोधकांना दोन्ही प्रदेशांबरोबरच त्यांच्या सावत्र नात्यावरही आणखी प्रकाश पडणार असून, संशोेधनाचे नवे द्वार उघडणार आहे.चार वर्र्षांपूर्वी राज्य मराठी संस्कृती मंडळाच्या अनुदानातून तंजावरच्या ऐतिहासिक दस्तऐवजाच्या जतनीकरणाचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पावर कोल्हापूरचे मोडीतज्ज्ञ गणेश नेर्लेकर-देसाई यांच्यासह महाराष्ट्रातील काही मान्यवर काम करीत होते. यावेळी मंडळामार्फत सात लाख दुर्मीळ मोडी कागदपत्रांचे डिजिटायजेशन करण्यात आले. यानिमित्ताने तमिळ विद्यापीठासोबत सामंजस्य करार करता येईल, असा विचार सुरू झाला. त्याला तमिळ विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाने अनुकूलता दर्शविली. त्याला आॅगस्ट २०१९ मध्ये मूर्त स्वरूप प्राप्त झाले.यासाठी स्थापन केलेल्या समितीवर राज्य मराठी विकास मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. आनंद काटीकर, सहायक संचालक डॉ. अशोक सोलणकर, तज्ज्ञ समिती सदस्य गणेश नेर्लेकर-देसाई, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या पुरातत्त्व विभागाचे प्रा. डॉ. गिरीश मांडके, मुंबईचे मोडीतज्ज्ञ श्रीकृष्णाजी म्हात्रे यांची निवड करण्यात आली होती.सामंजस्य करारासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. अवनीश पाटील, गणेश नेर्लेकर, डॉ. नीलांबरी जगताप, तंजावरचे तमिळ विद्यापीठाचे कुलगुरू सी. बालसुब्रह्मण्यम, डॉ. विवेकानंद गोपाळ यांचा समावेश आहे.छत्रपतींचे घराणे म्हणून तंजावरचे भोसले घराणे ओळखले जाते; तेथील ऐतिहासिक व मोडी कागदपत्रांचे जतन त्या घराण्याने केले आहे, याची फार थोड्यांना माहिती आहे. तेथील माहिती घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची एक समिती तंजावरला पाठविली. डॉ. अवनीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या समितीने अभ्यास करून तंजावर व कोल्हापूरचे संबंध आणखी दृढ होतील अशी कागदपत्रे तपासली आहेत. त्यातून हा सामंजस्य करार अस्तित्वात येत आहे. यानिमित्ताने दोन राज्यांतील जुने संबंध पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.- डॉ. देवानंद शिंदे, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ