शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
2
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
3
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
4
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
5
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
6
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
7
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
8
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
9
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
10
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
11
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
12
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
13
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
14
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
15
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
16
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
18
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
19
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
20
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!

पर्यायी पुलालाही शिवाजी महाराजांचे नाव

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

करवीर पंचायत समिती सभा : ठराव मंजूर; विविध विषयांवर खडाजंगी

कसबा बावडा : शिवाजी पुलाशेजारीच नवीन पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलालाही छत्रपती शिवाजी पूल असेच नाव देण्यात यावे, असा ठराव करवीर पंचायतीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. तानाजी आंग्रे यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. अध्यक्षस्थानी सभापती सुवर्णा बोटे होत्या. सभेत विविध विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.नवीन पर्यायी शिवाजी पुलाला त्यांचे काम पूर्ण होण्याआधीच कोणाचे नाव द्यायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका, पुरातन विभाग, वनविभाग अशा विविध विभागांच्या मंजुरीबाबत या पुलाचे काम रखडले आहे. ते पूर्ण होण्याच्या हालचाली होत नसतानाच या पुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकारण होत असल्याचा आरोप तानाजी आंग्रे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.सध्या आहे त्या पुलाची मुदत संपत आली आहे. काम रखडल्याने पुलाचा खर्च वाढणार आहे. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून भरून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.तालुक्यात इंदिरा आवास योजनेचा बट्याबोळ उडाला असल्याचा आरोप करण्यात आला. घरकुल योजनेसाठी ९८ पात्र लाभार्थी होते. त्यापैकी ४७ जणांना मंजुरी देण्यात आली. नंतर मात्र प्रशासनाने काही तांत्रिक कारणे सांगून हे काम थांबविले आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल दिलीप टिपुगडे, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी आंग्रे यांनी केला. करवीरच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व १८४ शाळा ‘ज्ञानरचनावादी’ करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन सकारात्मक वृत्तीने १0५ शाळा रचनावादी झाल्या असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विश्वास सुतार व एस. के. यादव यांनी सभागृहात दिली. तालुक्यात ३0 अंगणवाड्या मंजूर झाल्या असून, त्यासाठी सहा लाखांचा आणखीन जास्त निधी मंजूर झाल्याची माहिती बांधकामचे कार्यकारी अभियंता जे. डी. यादव यांनी दिली. पाचगावमधील २४ कॉलन्यांना कार्पोरेशनचे पाणी दिले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे एन. एम. देसाई यांनी सांगितले. स्मिता गवळी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. करवीरची आणेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील एकाही गावाचा समावेश होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलयुक्त शिवाराचे निकष बदलावेत, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकारी फोन घेत नाहीत... : बाहेरील गाड्यांचे पार्किंगपंचायतीचे अधिकारी सदस्यांचे फोन घेत नाहीत, अशी तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर असा प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे सभापती सुवर्णा बोटे यांनी सुनावले.पंचायत समितीच्या आवारात बाहेरील लोक आपली वाहने पार्क करतात. त्यामुळे सदस्यांची वाहने पार्क करताना जागा मिळत नाही, अशी तक्रार भुजगोंडा पाटील व सचिन पाटील यांनी केली