शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

पर्यायी पुलालाही शिवाजी महाराजांचे नाव

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

करवीर पंचायत समिती सभा : ठराव मंजूर; विविध विषयांवर खडाजंगी

कसबा बावडा : शिवाजी पुलाशेजारीच नवीन पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलालाही छत्रपती शिवाजी पूल असेच नाव देण्यात यावे, असा ठराव करवीर पंचायतीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. तानाजी आंग्रे यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. अध्यक्षस्थानी सभापती सुवर्णा बोटे होत्या. सभेत विविध विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.नवीन पर्यायी शिवाजी पुलाला त्यांचे काम पूर्ण होण्याआधीच कोणाचे नाव द्यायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका, पुरातन विभाग, वनविभाग अशा विविध विभागांच्या मंजुरीबाबत या पुलाचे काम रखडले आहे. ते पूर्ण होण्याच्या हालचाली होत नसतानाच या पुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकारण होत असल्याचा आरोप तानाजी आंग्रे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.सध्या आहे त्या पुलाची मुदत संपत आली आहे. काम रखडल्याने पुलाचा खर्च वाढणार आहे. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून भरून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.तालुक्यात इंदिरा आवास योजनेचा बट्याबोळ उडाला असल्याचा आरोप करण्यात आला. घरकुल योजनेसाठी ९८ पात्र लाभार्थी होते. त्यापैकी ४७ जणांना मंजुरी देण्यात आली. नंतर मात्र प्रशासनाने काही तांत्रिक कारणे सांगून हे काम थांबविले आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल दिलीप टिपुगडे, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी आंग्रे यांनी केला. करवीरच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व १८४ शाळा ‘ज्ञानरचनावादी’ करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन सकारात्मक वृत्तीने १0५ शाळा रचनावादी झाल्या असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विश्वास सुतार व एस. के. यादव यांनी सभागृहात दिली. तालुक्यात ३0 अंगणवाड्या मंजूर झाल्या असून, त्यासाठी सहा लाखांचा आणखीन जास्त निधी मंजूर झाल्याची माहिती बांधकामचे कार्यकारी अभियंता जे. डी. यादव यांनी दिली. पाचगावमधील २४ कॉलन्यांना कार्पोरेशनचे पाणी दिले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे एन. एम. देसाई यांनी सांगितले. स्मिता गवळी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. करवीरची आणेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील एकाही गावाचा समावेश होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलयुक्त शिवाराचे निकष बदलावेत, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकारी फोन घेत नाहीत... : बाहेरील गाड्यांचे पार्किंगपंचायतीचे अधिकारी सदस्यांचे फोन घेत नाहीत, अशी तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर असा प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे सभापती सुवर्णा बोटे यांनी सुनावले.पंचायत समितीच्या आवारात बाहेरील लोक आपली वाहने पार्क करतात. त्यामुळे सदस्यांची वाहने पार्क करताना जागा मिळत नाही, अशी तक्रार भुजगोंडा पाटील व सचिन पाटील यांनी केली