शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
2
धक्कादायक! राजस्थानमध्ये प्राणघातक गोळ्या! नमुने फेल झाले होते तरीही हजारो गोळ्या विकल्या
3
टाटा कॅपिटल आणि एलजी इलेक्ट्रॉनिक्सच्या IPO मध्ये चढाओढ; कोणाची किती मागणी, तुम्ही गुंतवणूक केलीये का?
4
वस्ताद द्रविडचं नाव घेत रोहित शर्मानं ठोकला गंभीरविरोधात शड्डू! शेअर केली यशामागची खरी गोष्ट
5
भारतात येणासाठी फ्लाइटमध्ये प्रवेश करताच ब्रिटिश PM स्टार्मर म्हणाले, 'मी तुमचा पंतप्रधान बोलतोय...!'; जाणून घ्या नेमकं काय घडलं
6
VIRAL : ७ वर्षांपूर्वी झोमॅटोवर किती रुपयांना मिळायचा पनीर टिक्का? बील होतंय व्हायरल; आकडा पाहून विश्वासच बसणार नाही!
7
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
8
"नवरा मेल्याचा पश्चाताप नाही, ४ मुलांच्या मृत्यूचं दुःख"; काय म्हणाली बॉयफ्रेंडसोबत पळालेली महिला?
9
मुंबईत दाऊदच्या जवळच्या माणसाभोवती ईडीने फास आवळला, सलीम डोलाच्या ८ ठिकाणांवर धाडी
10
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
11
आता चष्म्याद्वारेही UPI पेमेंट करता येणार; मोबाईल फोनची गरजच भासणार नाही, पाहा डिटेल्स
12
'खेलने का बहुत शॉक था उसे, फिर मैने भी सिखा दिया...!' निक्की तांबोळीचा धनश्री वर्मावर निशाणा
13
Cough Syrup : पालकांनो अलर्ट! लहान मुलांना कधी, कसं, किती द्यावं कफ सिरप? AIIMS च्या डॉक्टरांचा मोलाचा सल्ला
14
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
15
टाटा-पेप्सी सारख्या कंपनीतील नोकरी सोडून तरुणाने धरली शेतीची वाट! आता वर्षाला कमावतोय ५ कोटी
16
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली
17
टाटा अल्ट्रोजपासून हॅरियरपर्यंत, 'या' ६ कार्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट! वाचू शकतात १.४० लाख रुपये
18
पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?
19
टाटा सन्समध्ये पदावरुन वाद वाढला; नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांनी घेतली अमित शाहंची भेट, सरकारचं म्हणणं काय?
20
रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

पर्यायी पुलालाही शिवाजी महाराजांचे नाव

By admin | Updated: December 17, 2015 01:20 IST

करवीर पंचायत समिती सभा : ठराव मंजूर; विविध विषयांवर खडाजंगी

कसबा बावडा : शिवाजी पुलाशेजारीच नवीन पर्यायी पूल बांधण्याचे काम सुरू आहे. या पुलालाही छत्रपती शिवाजी पूल असेच नाव देण्यात यावे, असा ठराव करवीर पंचायतीच्या मासिक सभेत मंजूर करण्यात आला. तानाजी आंग्रे यांनी याबाबतचा ठराव मांडला होता. अध्यक्षस्थानी सभापती सुवर्णा बोटे होत्या. सभेत विविध विषयांवर जोरदार खडाजंगी झाली. यावेळी सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.नवीन पर्यायी शिवाजी पुलाला त्यांचे काम पूर्ण होण्याआधीच कोणाचे नाव द्यायचे, याची चर्चा सुरू झाली आहे. महापालिका, पुरातन विभाग, वनविभाग अशा विविध विभागांच्या मंजुरीबाबत या पुलाचे काम रखडले आहे. ते पूर्ण होण्याच्या हालचाली होत नसतानाच या पुलाला कोणाचे नाव द्यायचे, यावरून राजकारण होत असल्याचा आरोप तानाजी आंग्रे व राजेंद्र सूर्यवंशी यांनी केला.सध्या आहे त्या पुलाची मुदत संपत आली आहे. काम रखडल्याने पुलाचा खर्च वाढणार आहे. हा खर्च संबंधित अधिकाऱ्यांकडून भरून घ्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.तालुक्यात इंदिरा आवास योजनेचा बट्याबोळ उडाला असल्याचा आरोप करण्यात आला. घरकुल योजनेसाठी ९८ पात्र लाभार्थी होते. त्यापैकी ४७ जणांना मंजुरी देण्यात आली. नंतर मात्र प्रशासनाने काही तांत्रिक कारणे सांगून हे काम थांबविले आहे. त्याला जबाबदार कोण? असा सवाल दिलीप टिपुगडे, राजेंद्र सूर्यवंशी, तानाजी आंग्रे यांनी केला. करवीरच्या शिक्षण विभागाने तालुक्यातील सर्व १८४ शाळा ‘ज्ञानरचनावादी’ करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकांना विश्वासात घेऊन सकारात्मक वृत्तीने १0५ शाळा रचनावादी झाल्या असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, विश्वास सुतार व एस. के. यादव यांनी सभागृहात दिली. तालुक्यात ३0 अंगणवाड्या मंजूर झाल्या असून, त्यासाठी सहा लाखांचा आणखीन जास्त निधी मंजूर झाल्याची माहिती बांधकामचे कार्यकारी अभियंता जे. डी. यादव यांनी दिली. पाचगावमधील २४ कॉलन्यांना कार्पोरेशनचे पाणी दिले असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे एन. एम. देसाई यांनी सांगितले. स्मिता गवळी यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. करवीरची आणेवारी ५0 टक्क्यांपेक्षा कमी नसल्याने जलयुक्त शिवार योजनेत तालुक्यातील एकाही गावाचा समावेश होत नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जलयुक्त शिवाराचे निकष बदलावेत, अशी सूचना राजेंद्र सूर्यवंशी यांनी केली. सहायक गटविकास अधिकारी एस. व्ही. केळकर यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. अधिकारी फोन घेत नाहीत... : बाहेरील गाड्यांचे पार्किंगपंचायतीचे अधिकारी सदस्यांचे फोन घेत नाहीत, अशी तक्रार भुजगोंडा पाटील यांनी केली. यावर असा प्रकार झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे सभापती सुवर्णा बोटे यांनी सुनावले.पंचायत समितीच्या आवारात बाहेरील लोक आपली वाहने पार्क करतात. त्यामुळे सदस्यांची वाहने पार्क करताना जागा मिळत नाही, अशी तक्रार भुजगोंडा पाटील व सचिन पाटील यांनी केली