शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

शिरोलीसह शिवाजी पुलावर प्लाय ओव्हर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, त्याचा मदत कार्यावर परिणाम होतो. यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पुराचे पाणी राष्ट्रीय महामार्गावर आल्यानंतर वाहतूक ठप्प होते, त्याचा मदत कार्यावर परिणाम होतो. यासाठी केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्या सहकाऱ्यातून शिरोली, शिरोळ व शिवाजी पूल येथे पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल, असे प्लाय ओव्हर उभे करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. अतिवृष्टी व महापुराने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नुकसानीबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यानंतरच आर्थिक पॅकेजची घोषणा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

महापुरामुळे झालेल्या नुकसानीची कोल्हापूर शहरात पाहणी केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांसमवेतील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापुरातील अनेक तालुक्यात हंगामातील पाऊस तीन दिवसांत कोसळल्याने शेती, रस्ते, पूल, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरडी कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा काळातही पालकमंत्री सतेज पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधींनी झोकून देऊन काम केले.

आता पाणी ओसरल्यानंतर साफ-सफाईसह इतर कामांना वेग आला आहे. पुराचे पाणी वाढण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील प्रामुख्याने ठिकठिकाणी ब्रिटिशकालीन मोऱ्या आहेत. त्यांच्यामध्ये कमी व्यासाच्या पाइपमधून पाणी पुढे सरकत नसल्याने त्या तुंबतात. यासाठी बांधकाममंत्री अशोकराव चव्हाण व मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पावसाळ्यानंतर येथे बॉक्स अथवा स्लॅबच्या मोठ्या मोऱ्या करण्याचा निर्णय घेतला जाईल. पुराच्या पाण्याने विद्युत खांब मोडल्याने वीज पुरवठा खंडित झाला तिथे प्राधान्याने पूर्ववत होत आहे.

शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, जमिनी खरडून गेल्या आहेत. या सगळ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यामुळे पुराचा धोका वाढला -

ब्रिटिशकालीन कमी व्यासाच्या पाइपच्या मोऱ्या

भराव टाकून उभारलेले पूल

शहरातील ओढ्या, नाल्यातील अतिक्रमणे

नद्यांत वाढलेला गाळ

धरणातून एकदम सुरू होणारा विसर्ग

जिल्हा नियोजनमधून बोटी घेणार

महापुरात लोकांच्या मदतीसाठी बोटींची गरज भासते. यासाठी जिल्हा नियोजनमधून तातडीने बोटी घेण्याची सूचना पालकमंत्र्यांना केल्याचे पवार यांनी सांगितले.

भराव टाकून पूल नको

मातीचा भराव टाकून अनेक ठिकाणी पूल बांधले आहेत. त्यातून पाणी सहजरीत्या पुढे सरकत नसल्याने तुंबी वाढते आणि लगेच रस्ते बंद होतात. यासाठी भराव टाकून पूल नको, अशी मागणी अनेक सरपंचांनी केल्याचे पवार यांनी सांगितले.

मृत शेतकऱ्याला मिळणार ९ लाख

अतिवृष्टी, पुराच्या पाण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या व ज्याच्या नावावर सात/बारा असलेल्या शेतकऱ्यांना राज्याकडून ५ लाख, केंद्राकडून २ लाख व गोपीनाथ मुंडे अपघात विम्यातून २ लाख असे नऊ लाख रुपये मदत दिली जाणार आहे. तर इतरांना ७ लाख रुपये देणार असून मुंडे अपघात योजनेत काही त्रुटी आहेत, त्या तात्काळ दूर करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

स्थलांतरांसाठी कारखान्यांवर मजूर वसाहती

प्रत्येक वर्षी पुराच्या पाण्याने हजारो कुटुंबांना स्थलांतरित व्हावे लागते. मात्र, त्यांची शेती तिथे असल्याने ते कायमस्वरूपी स्थलांतरित होऊ शकत नाहीत. यासाठी ‘दत्त’, ‘गुरुदत्त’, ‘जवाहर’, ‘शरद’ कारखान्यांना ऊसतोड मजुरांसाठी वसाहती उभ्या करण्यास सांगितले असून हंगाम संपल्यानंतर पावसाळ्यात स्थलांतरांसाठी वापर करता येईल, असे पवार यांनी सांगितले.

शहर स्वच्छतेसाठी मुंबई, पुण्यातून टँकर

पुरामुळे कोल्हापूर शहरात अनेक ठिकाणी गाळ साचला असून तो ओला आहे, तोपर्यंतच स्वच्छ करावा लागतो. यासाठी मुंबई, पुणे व नवी मुंबई महापालिकांच्या ४८ टीम कार्यरत झाल्याचे पवार यांनी सांगितले.

राज्यपालांबाबत नो कमेंट्स

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यासमवेत कोकण दौऱ्यावर गेल्याचे निदर्शनास आणून दिले असता, महामहीम राज्यपालांनी कोणासोबत जायचे, हा त्यांचा अधिकार आहे. याबाबत आपली ‘नो कमेंट्स’ असे पवार यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात बाधित गावे-

बाधित गावे - ३९६

बाधित कुटुंबे - ४४ हजार ७०६

सदस्य - १ लाख ९४ हजार ४६४

निवारा केंद्रे - २५३ पैकी शासकीय -२२२

मृत व्यक्ती - ७

पाणी योजना बंद -८८९

वीज कनेक्शन बंद ग्राहक - २ लाख ४० हजार