शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जादा दोन हजार लोकांना आजपासून शिवभोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:24 IST

कोल्हापूर : संचारबंदी काळात गरीब व गरजू लोकांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन योजनेतील थाळ्यांची संख्या व वेळ शुक्रवारपासून वाढवण्यात आली. ...

कोल्हापूर : संचारबंदी काळात गरीब व गरजू लोकांची भूक भागविणाऱ्या शिवभोजन योजनेतील थाळ्यांची संख्या व वेळ शुक्रवारपासून वाढवण्यात आली. यापूर्वी कोल्हापुरात गरजवंतांना रोज ४ हजार थाळ्या वितरित केल्या जात होत्या. आता ही संख्या दीड पटीने वाढवून ६ हजार इतकी करण्यात आली आहे. भोजन वाटपाची वेळही एक तासाने वाढविण्यात आली आहे. ही योजना १४ मेपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत सुरू राहील.

राज्यात सध्या ब्रेक द चेनअंतर्गत संचारबंदी सुरू आहे. या काळात गरीब व गरजू लोकांची जेवणाची आबाळ होऊ नये, त्यांना पोटभर जेवण मिळावे यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलला एक महिन्यासाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याचे जाहीर केले आहे. जेवण मोफत मिळत असल्याचे कळताच गेल्या दोन दिवसांपासून सर्वच शिवभोजन केंद्रांवर गरजूंची गर्दी होत असून वेळेआधीच थाळ्या संपत आहेत. अन्य गरजूंना मोफत जेवणाचा लाभ मिळत नसल्याने शुक्रवारी शासनाने प्रत्येक केंद्राला दीडपट थाळ्या वाढवून देण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जिल्हास्तरावर आदेश काढले. या काळात कोणताही लाभार्थी पार्सलशिवाय परत जाणार नाही, सबळ कारणाशिवाय केंद्र बंद राहणार नाही, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे, तसेच खोट्या नावाने त्याच त्याच लाभार्थ्यांची छायाचित्रे ॲपवर टाकली जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आहे.

खाऊ दे गरीब...

शिवभोजन केंद्रे :

कोल्हापूर शहर : ९

जिल्ह्यात : २५

रोज थाळी वाटप : ६ हजार

वेळ : ११ ते ४

योजना कधीपर्यंत : १४ मेपर्यंत

काय मिळते थाळीमध्ये

दोन चपात्या, एक वाटी भात, एक वाटी वरण व एक वाटी भाजी

(फोटो रांगेचा पाठवला आहे)