शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

शिवसेना तिन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अटळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी ...

कोल्हापूर : शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आलेल्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी पदाधिकारी बदल होणारच याबाबत स्पष्ट भूमिका घेतल्याने शिवसेना तिन्ही पदाधिकाऱ्यांचे राजीनामे अटळ मानले जात आहेत. या आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात येते. शिवसेनेचे संपर्कमंत्री आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर असल्याने त्यांच्यासमोरदेखील या विषयाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

पाटील हे रविवारी जिल्हा परिषदेत आले होते. शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने गुढी उभारल्यानंतर चहासाठी ते अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या दालनामध्ये आले. तेव्हा समाजकल्याण समितीच्या सभापती स्वाती सासने यांनी कलाकार मानधन निवडीसाठीची समिती अजून स्थापन झाली नसल्याकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर ‘पदाधिकारी बदलानंतर समिती स्थापन करणार’ असे त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना पदाधिकारी बदल करायचा आहे; परंतु तो फार तणातणी न व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. शिवसेनेचे तीनही पदाधिकारी सहजासहजी राजीनामे द्यायला तयार नाहीत.

शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर आल्यानंतरही प्रवीण यादव आणि हंबीरराव पाटील हे दोन सभापती न भेटल्याने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना नेते संतप्त आहेत. दुधवडकर पुन्हा येणार होते; परंतु ते आले नाहीत.

सोमवारी दोन्ही मंत्री ‘गोकुळ’वरील कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी नूतन संचालक बनलेले माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांना राजीनामा देण्याविषयी सांगा, अशी सूचना केली. दिवसभरात खासदार सदाशिवराव मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर यांनीही पालकमंत्र्यांशी चर्चा केली.

चौकट

नेते सांगतील ते

शिवसेनेचे हंबीरराव पाटील, प्रवीण यादव आणि स्वाती सासने हे तीन पदाधिकारी सध्या चर्चेत आहेत. यातील सासने या राजीनाम्याबाबत सकारात्मक आहेत. डॉ. मिणचेकर यांच्या पातळीवर प्रवीण यादव यांचा विषय संपू शकतो. मात्र, माजी आमदार सत्यजित पाटील हंबीरराव पाटील यांच्या राजीनाम्यासाठी सहजासहजी तयार नाहीत. त्यांच्या मतदारसंघात जनसुराज्यची वाढती ताकद त्यांना डोकेदुखी ठरू शकते त्यामुळे याबाबत ते वरिष्ठांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येते. सध्या तीनही सभापती आमच्या नेत्यांनी सांगितले की राजीनामा देणार एवढेच सांगत आहेत.