शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

शिवसेना कदापि थांबणार नाही

By admin | Updated: February 3, 2015 00:28 IST

‘एफआरपी’प्रश्नी जाब : आता अधिकाऱ्यांविरोधातच न्यायालयीन लढाई लढू

कोल्हापूर : हंगाम संपत आला तरी कारखान्यांनी गाळप झालेल्या ७५ टक्के उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिलेले नाहीत. त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? शेतकऱ्यांचे पैसे मिळणार कधी? याबाबत विचारणा केल्याबद्दल आपण आमचा निषेध करता, तुम्हाला शिवसेनेची अ‍ॅलर्जी आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही दररोज इथे येणार, कोणी काही म्हणो शिवसेना कदापि थांबणार नाही, असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी साखर सहसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांना सोमवारी दिला. ऊस उत्पादकांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने तीन दिवसांपूर्वी लक्ष्मीपुरी साखर सहसंचालक कार्यालयातील वाय. व्ही. सुर्वे यांना हाकलले होते. त्यावेळी दिलेल्या आश्वासनांचे पुढे काय झाले? हे विचारण्यासाठी सोमवारी जिल्हाप्रमुख संजय पवार, मुरलीधर जाधव, विजय देवणे यांचे शिष्टमंडळ पुन्हा या कार्यालयात गेले होते. दरम्यान, सुर्वे कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विशेष लेखापरीक्षक डी. बी. पाटील यांच्याशी आंदोलकांनी चर्चा केली. सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या आदेशानुसार या कार्यालयासह परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी भेट दिली.मुरलीधर जाधव यांनी आंदोलन करताना आम्ही तुम्हाला मारले काय? आमचा निषेध का केला? असा जाब विचारला. त्यावर संजय पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पळवून लावलेले त्यांना चालते पण आमचे आंदोलन चालत नाही. त्यांच्याविरुद्ध न्यायालयीन लढाईही लढू. यावेळी प्रवीणसिंह सावंत, दत्ताजी टिपुगडे, कमलाकर जगदाळे, बाजीराव पाटील, सुजित चव्हाण, आदी उपस्थित होते.नेहमीचेच सरकारी उत्तरशिवसेना पदाधिकाऱ्यांनी लेखी देण्याची मागणी केली. त्यावर सायंकाळीपर्यंत साखर आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधून लेखी देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. कारवाईबाबत ठोस काही तरी होईल, असे अपेक्षा असतानाच नेहमीप्रमाणे सरकारी व गुळगुळीत उत्तर या कार्यालयाकडून मिळाले.