शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

मतांमध्ये शिवसेनाच ‘नंबर वन’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यात प्रथमच मोठे यश : मिळविली तब्बल सव्वासात लाख मते; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मातब्बर राजकीय पक्षांना पराभवाचे जबरदस्त धक्के देत शिवसेनेने तब्बल सहा जागा जिंकून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमानही मिळविला आहे. ७ लाख १८ हजार ८७९ मते मिळवून शिवसेना जिल्ह्यात ‘नंबर वन’वर राहिली. पाठोपाठ काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ८२७ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसला या विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या सहा जागा आणि सर्वाधिक मते हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे. १९९० पासून शिवसेनेला कशीबशी कोल्हापूरची फक्त एक जागा मिळायची. २००९ मध्ये सांगली, मिरज व इचलकरंजी येथील जातीय दंगलीच्या वादळात शिवसेनेने कोल्हापूर उत्तरबरोबरच करवीर व हातकणंगले अशा तीन मतदारसंघांत विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर आणि आरपीआय, स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने ‘एकला चलो रे’नारा देत लढत दिली. संघटनात्मक जाळे मजबूत नसतानाही शिवसेनेने जिल्ह्यात चांगले यश मिळविले. तब्बल सहा जागा जिंकून ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळविला. कागल आणि चंदगड येथील त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यांच्याकडे आकृष्ट झालेला मतदार राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत काँग्रेस (९), राष्ट्रवादी (८) भारतीय जनता पक्ष (५), स्वाभिमानी पक्ष (५) यांना सर्व मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत; परंतु शिवसेनेने दहाही मतदारसंघांत तगडे उमेदवार दिले होते. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन मतदारसंघांत मात्र त्यांच्या उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ४ लाख ८६ हजार ८२७ इतकी मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. आठ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची ३ लाख ५२ हजार ३०२ एवढी मते मिळविली. या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानावर अर्थातच भाजप राहिला; मात्र पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या आहेत. २५ उमेदवारांना ५00 मतेही नाहीतआमदारकीची निवडणूक लढविण्याची अनेकांना इच्छा असते; परंतु कोणी आपली राजकीय ताकद बघून या इच्छेला मुरड घालतात, तर काहीजण समाजात कसलीही ताकद अथवा नावलौकिक नसतानाही निवडणूक लढविण्याची हौस भागवून घेतात. परंतु, मतमोजणीनंतर त्यांना मिळालेली मते पाहून समाजात हेटाळणी होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील २५ उमेदवारांना ५०० मतेही मिळालेली नाहीत. त्यातील अकरा उमेदवारांनी २०० मतेसुद्धा मिळविता आलेली नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढलेल्या एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ ७८ मते मिळाली आहेत. चार पक्षांच्या ३२ उमेदवारांना १८ लाख ०८ हजार ६७३ मतेअन्य ८९ उमेदवारांना ३ लाख ८४ हजार ०३६ मते