शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मतांमध्ये शिवसेनाच ‘नंबर वन’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यात प्रथमच मोठे यश : मिळविली तब्बल सव्वासात लाख मते; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मातब्बर राजकीय पक्षांना पराभवाचे जबरदस्त धक्के देत शिवसेनेने तब्बल सहा जागा जिंकून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमानही मिळविला आहे. ७ लाख १८ हजार ८७९ मते मिळवून शिवसेना जिल्ह्यात ‘नंबर वन’वर राहिली. पाठोपाठ काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ८२७ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसला या विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या सहा जागा आणि सर्वाधिक मते हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे. १९९० पासून शिवसेनेला कशीबशी कोल्हापूरची फक्त एक जागा मिळायची. २००९ मध्ये सांगली, मिरज व इचलकरंजी येथील जातीय दंगलीच्या वादळात शिवसेनेने कोल्हापूर उत्तरबरोबरच करवीर व हातकणंगले अशा तीन मतदारसंघांत विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर आणि आरपीआय, स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने ‘एकला चलो रे’नारा देत लढत दिली. संघटनात्मक जाळे मजबूत नसतानाही शिवसेनेने जिल्ह्यात चांगले यश मिळविले. तब्बल सहा जागा जिंकून ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळविला. कागल आणि चंदगड येथील त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यांच्याकडे आकृष्ट झालेला मतदार राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत काँग्रेस (९), राष्ट्रवादी (८) भारतीय जनता पक्ष (५), स्वाभिमानी पक्ष (५) यांना सर्व मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत; परंतु शिवसेनेने दहाही मतदारसंघांत तगडे उमेदवार दिले होते. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन मतदारसंघांत मात्र त्यांच्या उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ४ लाख ८६ हजार ८२७ इतकी मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. आठ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची ३ लाख ५२ हजार ३०२ एवढी मते मिळविली. या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानावर अर्थातच भाजप राहिला; मात्र पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या आहेत. २५ उमेदवारांना ५00 मतेही नाहीतआमदारकीची निवडणूक लढविण्याची अनेकांना इच्छा असते; परंतु कोणी आपली राजकीय ताकद बघून या इच्छेला मुरड घालतात, तर काहीजण समाजात कसलीही ताकद अथवा नावलौकिक नसतानाही निवडणूक लढविण्याची हौस भागवून घेतात. परंतु, मतमोजणीनंतर त्यांना मिळालेली मते पाहून समाजात हेटाळणी होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील २५ उमेदवारांना ५०० मतेही मिळालेली नाहीत. त्यातील अकरा उमेदवारांनी २०० मतेसुद्धा मिळविता आलेली नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढलेल्या एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ ७८ मते मिळाली आहेत. चार पक्षांच्या ३२ उमेदवारांना १८ लाख ०८ हजार ६७३ मतेअन्य ८९ उमेदवारांना ३ लाख ८४ हजार ०३६ मते