शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मतांमध्ये शिवसेनाच ‘नंबर वन’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यात प्रथमच मोठे यश : मिळविली तब्बल सव्वासात लाख मते; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मातब्बर राजकीय पक्षांना पराभवाचे जबरदस्त धक्के देत शिवसेनेने तब्बल सहा जागा जिंकून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमानही मिळविला आहे. ७ लाख १८ हजार ८७९ मते मिळवून शिवसेना जिल्ह्यात ‘नंबर वन’वर राहिली. पाठोपाठ काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ८२७ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसला या विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या सहा जागा आणि सर्वाधिक मते हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे. १९९० पासून शिवसेनेला कशीबशी कोल्हापूरची फक्त एक जागा मिळायची. २००९ मध्ये सांगली, मिरज व इचलकरंजी येथील जातीय दंगलीच्या वादळात शिवसेनेने कोल्हापूर उत्तरबरोबरच करवीर व हातकणंगले अशा तीन मतदारसंघांत विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर आणि आरपीआय, स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने ‘एकला चलो रे’नारा देत लढत दिली. संघटनात्मक जाळे मजबूत नसतानाही शिवसेनेने जिल्ह्यात चांगले यश मिळविले. तब्बल सहा जागा जिंकून ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळविला. कागल आणि चंदगड येथील त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यांच्याकडे आकृष्ट झालेला मतदार राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत काँग्रेस (९), राष्ट्रवादी (८) भारतीय जनता पक्ष (५), स्वाभिमानी पक्ष (५) यांना सर्व मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत; परंतु शिवसेनेने दहाही मतदारसंघांत तगडे उमेदवार दिले होते. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन मतदारसंघांत मात्र त्यांच्या उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ४ लाख ८६ हजार ८२७ इतकी मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. आठ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची ३ लाख ५२ हजार ३०२ एवढी मते मिळविली. या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानावर अर्थातच भाजप राहिला; मात्र पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या आहेत. २५ उमेदवारांना ५00 मतेही नाहीतआमदारकीची निवडणूक लढविण्याची अनेकांना इच्छा असते; परंतु कोणी आपली राजकीय ताकद बघून या इच्छेला मुरड घालतात, तर काहीजण समाजात कसलीही ताकद अथवा नावलौकिक नसतानाही निवडणूक लढविण्याची हौस भागवून घेतात. परंतु, मतमोजणीनंतर त्यांना मिळालेली मते पाहून समाजात हेटाळणी होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील २५ उमेदवारांना ५०० मतेही मिळालेली नाहीत. त्यातील अकरा उमेदवारांनी २०० मतेसुद्धा मिळविता आलेली नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढलेल्या एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ ७८ मते मिळाली आहेत. चार पक्षांच्या ३२ उमेदवारांना १८ लाख ०८ हजार ६७३ मतेअन्य ८९ उमेदवारांना ३ लाख ८४ हजार ०३६ मते