शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

मतांमध्ये शिवसेनाच ‘नंबर वन’

By admin | Updated: October 23, 2014 00:44 IST

जिल्ह्यात प्रथमच मोठे यश : मिळविली तब्बल सव्वासात लाख मते; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची पसंती

कोल्हापूर : काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या मातब्बर राजकीय पक्षांना पराभवाचे जबरदस्त धक्के देत शिवसेनेने तब्बल सहा जागा जिंकून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळविण्याचा बहुमानही मिळविला आहे. ७ लाख १८ हजार ८७९ मते मिळवून शिवसेना जिल्ह्यात ‘नंबर वन’वर राहिली. पाठोपाठ काँग्रेसने ४ लाख ८६ हजार ८२७ अशी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. विशेष म्हणजे काँग्रेसला या विधानसभेच्या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेल्या सहा जागा आणि सर्वाधिक मते हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय झाला आहे. १९९० पासून शिवसेनेला कशीबशी कोल्हापूरची फक्त एक जागा मिळायची. २००९ मध्ये सांगली, मिरज व इचलकरंजी येथील जातीय दंगलीच्या वादळात शिवसेनेने कोल्हापूर उत्तरबरोबरच करवीर व हातकणंगले अशा तीन मतदारसंघांत विजय मिळविला. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपसोबत त्यांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत भाजपबरोबरची युती तुटल्यानंतर आणि आरपीआय, स्वाभिमानी पक्षाची साथ मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेने ‘एकला चलो रे’नारा देत लढत दिली. संघटनात्मक जाळे मजबूत नसतानाही शिवसेनेने जिल्ह्यात चांगले यश मिळविले. तब्बल सहा जागा जिंकून ‘नंबर वन’ होण्याचा मान मिळविला. कागल आणि चंदगड येथील त्यांचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. शिवसेनेला मिळालेले यश आणि त्यांच्याकडे आकृष्ट झालेला मतदार राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यातील दहा मतदारसंघांत काँग्रेस (९), राष्ट्रवादी (८) भारतीय जनता पक्ष (५), स्वाभिमानी पक्ष (५) यांना सर्व मतदारसंघांत उमेदवार देता आले नाहीत; परंतु शिवसेनेने दहाही मतदारसंघांत तगडे उमेदवार दिले होते. कोल्हापूर दक्षिण व इचलकरंजी या दोन मतदारसंघांत मात्र त्यांच्या उमेदवारांना दहा हजारांचाही टप्पा गाठता आला नाही. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नसली तरी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली आहेत. ४ लाख ८६ हजार ८२७ इतकी मते काँग्रेसच्या पारड्यात पडली. आठ जागा लढविणाऱ्या राष्ट्रवादीला तिसऱ्या क्रमांकाची ३ लाख ५२ हजार ३०२ एवढी मते मिळविली. या पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. चौथ्या स्थानावर अर्थातच भाजप राहिला; मात्र पाच जागा लढवून दोन जागा जिंकल्या आहेत. २५ उमेदवारांना ५00 मतेही नाहीतआमदारकीची निवडणूक लढविण्याची अनेकांना इच्छा असते; परंतु कोणी आपली राजकीय ताकद बघून या इच्छेला मुरड घालतात, तर काहीजण समाजात कसलीही ताकद अथवा नावलौकिक नसतानाही निवडणूक लढविण्याची हौस भागवून घेतात. परंतु, मतमोजणीनंतर त्यांना मिळालेली मते पाहून समाजात हेटाळणी होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील २५ उमेदवारांना ५०० मतेही मिळालेली नाहीत. त्यातील अकरा उमेदवारांनी २०० मतेसुद्धा मिळविता आलेली नाहीत. कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढलेल्या एका सुशिक्षित उमेदवाराला केवळ ७८ मते मिळाली आहेत. चार पक्षांच्या ३२ उमेदवारांना १८ लाख ०८ हजार ६७३ मतेअन्य ८९ उमेदवारांना ३ लाख ८४ हजार ०३६ मते