शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार?

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद : कट्टर शिवसैनिकांसह आमदार समर्थकांमध्ये उत्सुकता

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरकधी नव्हे ते यश शिवसेनेच्या पदरात पडले असताना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार याचा निकाल २१ मार्चला लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांसह आता आमदार समर्थक शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यसंख्येमध्ये दहा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, त्या-त्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या सोयीनुसार कुणाशी आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय घेतल्याने अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही सर्वत्र सोयीची भूमिका घेतली आहे. एकीकडे मूळची शिवसेना आणि नंतर आमदारांची शिवसेना असे दोन गट काही ठिकाणी स्पष्टपणे दिसत असतानाही जिल्ह्याच्या पातळीवर निर्णय घेत शिवसेनेने जिल्हा परिषदेत मिळविलेले यश उल्लेखनीयच आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेली काँगे्रस १४ जागांवर थांबली. महसूलमंत्री पदासारखे वजनदार मंत्रिपद असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपला १४ जागा मिळवल्या. अनेक सत्तास्थाने ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीने ११ जागा पटकावल्या. त्या तुलनेत पक्षाकडून फारसे बळ मिळाले नसताना केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर आणि स्थानिक विधानसभा मतदारसंघाचा विचार करत सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, तीनही जिल्हाप्रमुख आणि पाच आमदार यांनी जोडण्या घालत मिळविलेले दहा जागांचे यश कौतुकास्पद आहे.मात्र, हीच शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून एकीकडे मंडलिक यांची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे आमदारही आपापल्या विधानसभेच्या अडचणी कशा कमी होतील, याची काळजी करताना दिसत आहेत. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर शिवसेनेचे दहाच्या दहा सदस्य एकाच आघाडीसोबत राहतील याची शाश्वती नाही. सभापती निवडीमध्ये शिवसेनेने एकीकडे राष्ट्रवादी, दुसरीकडे काँग्रेस यांच्याशी युती करत पदे मिळवली आहेत. याच पद्धतीने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. एकमेव आदेश, ‘मातोश्री’चा आदेश !या विचित्र परिस्थितीत केवळ आणि केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मार्ग काढू शकतात. जिल्ह्यातील शिवसेनेत आधीच फूट आहे. त्यात पुन्हा आणखी फूट दिसू नये, यासाठी केवळ त्यांनीच कुठल्या आघाडीसोबत राहायचे आणि तेही दहाजणांनी राहायचे असे सांगत आदेश दिला तरच शिवसेनेतील संभाव्य फूट टळेल, परंतु जिल्हा परिषदेपेक्षा आगामी विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी सोयीची भूमिका घेण्याची परवानगी जर त्यांनी दिली, तर सेनेत फूट अटळ मानली जात आहे.