शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
2
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
3
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
5
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
6
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
7
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
8
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
9
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
10
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
11
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
12
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
13
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
14
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
15
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
16
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
17
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
18
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
19
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
20
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?

एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार?

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद : कट्टर शिवसैनिकांसह आमदार समर्थकांमध्ये उत्सुकता

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरकधी नव्हे ते यश शिवसेनेच्या पदरात पडले असताना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार याचा निकाल २१ मार्चला लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांसह आता आमदार समर्थक शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यसंख्येमध्ये दहा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, त्या-त्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या सोयीनुसार कुणाशी आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय घेतल्याने अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही सर्वत्र सोयीची भूमिका घेतली आहे. एकीकडे मूळची शिवसेना आणि नंतर आमदारांची शिवसेना असे दोन गट काही ठिकाणी स्पष्टपणे दिसत असतानाही जिल्ह्याच्या पातळीवर निर्णय घेत शिवसेनेने जिल्हा परिषदेत मिळविलेले यश उल्लेखनीयच आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेली काँगे्रस १४ जागांवर थांबली. महसूलमंत्री पदासारखे वजनदार मंत्रिपद असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपला १४ जागा मिळवल्या. अनेक सत्तास्थाने ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीने ११ जागा पटकावल्या. त्या तुलनेत पक्षाकडून फारसे बळ मिळाले नसताना केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर आणि स्थानिक विधानसभा मतदारसंघाचा विचार करत सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, तीनही जिल्हाप्रमुख आणि पाच आमदार यांनी जोडण्या घालत मिळविलेले दहा जागांचे यश कौतुकास्पद आहे.मात्र, हीच शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून एकीकडे मंडलिक यांची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे आमदारही आपापल्या विधानसभेच्या अडचणी कशा कमी होतील, याची काळजी करताना दिसत आहेत. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर शिवसेनेचे दहाच्या दहा सदस्य एकाच आघाडीसोबत राहतील याची शाश्वती नाही. सभापती निवडीमध्ये शिवसेनेने एकीकडे राष्ट्रवादी, दुसरीकडे काँग्रेस यांच्याशी युती करत पदे मिळवली आहेत. याच पद्धतीने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. एकमेव आदेश, ‘मातोश्री’चा आदेश !या विचित्र परिस्थितीत केवळ आणि केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मार्ग काढू शकतात. जिल्ह्यातील शिवसेनेत आधीच फूट आहे. त्यात पुन्हा आणखी फूट दिसू नये, यासाठी केवळ त्यांनीच कुठल्या आघाडीसोबत राहायचे आणि तेही दहाजणांनी राहायचे असे सांगत आदेश दिला तरच शिवसेनेतील संभाव्य फूट टळेल, परंतु जिल्हा परिषदेपेक्षा आगामी विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी सोयीची भूमिका घेण्याची परवानगी जर त्यांनी दिली, तर सेनेत फूट अटळ मानली जात आहे.