शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार?

By admin | Updated: March 16, 2017 00:25 IST

जिल्हा परिषद : कट्टर शिवसैनिकांसह आमदार समर्थकांमध्ये उत्सुकता

समीर देशपांडे ल्ल कोल्हापूरकधी नव्हे ते यश शिवसेनेच्या पदरात पडले असताना आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार याचा निकाल २१ मार्चला लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिकांसह आता आमदार समर्थक शिवसैनिकांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ६७ सदस्यसंख्येमध्ये दहा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, त्या-त्या आमदारांनी आपापल्या मतदारसंघाच्या सोयीनुसार कुणाशी आघाडी करायची किंवा नाही याचा निर्णय घेतल्याने अन्य पक्षांप्रमाणे शिवसेनेनेही सर्वत्र सोयीची भूमिका घेतली आहे. एकीकडे मूळची शिवसेना आणि नंतर आमदारांची शिवसेना असे दोन गट काही ठिकाणी स्पष्टपणे दिसत असतानाही जिल्ह्याच्या पातळीवर निर्णय घेत शिवसेनेने जिल्हा परिषदेत मिळविलेले यश उल्लेखनीयच आहे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेली काँगे्रस १४ जागांवर थांबली. महसूलमंत्री पदासारखे वजनदार मंत्रिपद असलेले चंद्रकांतदादा पाटील यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून भाजपला १४ जागा मिळवल्या. अनेक सत्तास्थाने ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीने ११ जागा पटकावल्या. त्या तुलनेत पक्षाकडून फारसे बळ मिळाले नसताना केवळ कोल्हापूर जिल्ह्याच्या पातळीवर आणि स्थानिक विधानसभा मतदारसंघाचा विचार करत सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक, तीनही जिल्हाप्रमुख आणि पाच आमदार यांनी जोडण्या घालत मिळविलेले दहा जागांचे यश कौतुकास्पद आहे.मात्र, हीच शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा डोळ्यांसमोर ठेवून एकीकडे मंडलिक यांची वाटचाल सुरू असताना दुसरीकडे आमदारही आपापल्या विधानसभेच्या अडचणी कशा कमी होतील, याची काळजी करताना दिसत आहेत. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेतही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले तर शिवसेनेचे दहाच्या दहा सदस्य एकाच आघाडीसोबत राहतील याची शाश्वती नाही. सभापती निवडीमध्ये शिवसेनेने एकीकडे राष्ट्रवादी, दुसरीकडे काँग्रेस यांच्याशी युती करत पदे मिळवली आहेत. याच पद्धतीने एकदाच घुसणार की शिवसेना फुटणार, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. एकमेव आदेश, ‘मातोश्री’चा आदेश !या विचित्र परिस्थितीत केवळ आणि केवळ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच मार्ग काढू शकतात. जिल्ह्यातील शिवसेनेत आधीच फूट आहे. त्यात पुन्हा आणखी फूट दिसू नये, यासाठी केवळ त्यांनीच कुठल्या आघाडीसोबत राहायचे आणि तेही दहाजणांनी राहायचे असे सांगत आदेश दिला तरच शिवसेनेतील संभाव्य फूट टळेल, परंतु जिल्हा परिषदेपेक्षा आगामी विधानसभा महत्त्वाची आहे. त्यासाठी सोयीची भूमिका घेण्याची परवानगी जर त्यांनी दिली, तर सेनेत फूट अटळ मानली जात आहे.