शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

शिव साजिरा गोजिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:28 IST

इंद्रजित देशमुख आज महाशिवरात्री... सगळीकडे शंभू महादेवाच्या दर्शनाची लगबग दिसत आहे. प्रकृतीला अधिष्ठान पुरुषाचं म्हणजेच आत्मतत्त्वाचं असतं. याचं न्यायाने ...

इंद्रजित देशमुखआज महाशिवरात्री... सगळीकडे शंभू महादेवाच्या दर्शनाची लगबग दिसत आहे. प्रकृतीला अधिष्ठान पुरुषाचं म्हणजेच आत्मतत्त्वाचं असतं. याचं न्यायाने शक्तीचा विनियोजक शिवच आहे. आपण खऱ्या अर्थाने त्याच शिवाची पूजा करतोय आणि तोच स्वयमेव असणारा शिव सर्वांच्या अंतर्यामी वास करतो आहे. त्याच्याच अस्तित्वाच्या असण्याने आमचं जिवंत असणं आणि जाणिवेत असणं अवलंबून आहे.शिव हा सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि म्हणूनच उपासना करणाऱ्यांनी उपासक वृत्तीने त्याची उपासना केल्यानंतर ते सामर्थ्य आपल्या ठायी धारण केले पाहिजे. तसं पाहिलं तर अमृत पितो तो देव असतो आणि स्वत: विष पितो व जगाला अमृत देतो तो महादेव असतो. म्हणूनच हा महादेव आहे. त्यानं आपल्या ठिकाणी धारण केलेले सामर्थ्य निव्वळ आणि निव्वळ जगाच्या हितासाठीच धारण केलेले आहे. मग त्याची उपासना करणाऱ्यांनी सामर्थ्यहीन, निस्तेज राहून चालेल का? त्यानं आपल्या ठिकाणी धारण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून कुठल्या ना कुठल्या तºहेचं सामर्थ्य प्रकट होत असतं.शिव हा साक्षीदेखील आहे आणि तो अविचल साक्षी आहे. जिवाची होणारी धडपड तो विवेकाने पाहत असतो. देहावर आणि विचारांवर होणाºया कोणत्याच प्रभावाने किंवा त्या प्रभावानुसार होणाºया परिणामाने तो अजिबात हलत नाही. असं कोणत्याही तºहेचे तात्कालिक चांचल्य त्याच्या ठायी आपणास अजिबात पाहायला मिळत नाही. स्वत:चा शोध घेण्यासाठी साधना मार्गाने निघालेल्या साधकांनी अशीच अविचलता धारण करावी लागते. अशी अविचलता धारण केल्यानंतर साक्षी भूत असणारं ते शिवत्व आम्हालाही प्राप्त होऊ शकतं.शिव हे शांतीचेदेखील प्रतीक आहे. त्याने धारण केलेली ध्यानावस्था ही स्वत:च्या शोधासाठी किंवा स्वत:च्या आतील चैतन्याची जाणीव करून घेऊ पाहणाºया साधकांसाठी एक दर्शक आहे आणि म्हणूनच तो शांत आहे. स्वत:च्या ठायी जगाचा एका क्षणात प्रलय करण्याइतकं सामर्थ्य असतानासुद्धा तो शांत आहे. आम्हीसुद्धा तेच शिकायला हवं. स्वत:कडे असणारी कोणत्याही तºहेची संपन्नता प्रदर्शनासाठी किंवा लोकदर्शनासाठी न वापरता ते सर्व धारण करून शांत राहणं हे एक समंजस शहाणपणाचं लक्षण आहे. आजच्या दिवशी शिवदर्शनाने आमच्या ठिकाणी ते लक्षण आलं पाहिजे.वास्तविक, शिव किंवा भगवान शंकर यांच्या प्रतीकात्मक मूर्तीबद्दल चिंतन केलं की असं लक्षात येतं की हा असा देव आहे की, ज्यानं तुमच्या समाजाने अश्लाघ्य समजलेल्या कितीतरी त्याज्य गोष्टी खूप सहजगत्या स्वीकारलेल्या आहेत. याचाच एक अर्थ असाही आहे की, या जगात धिक्कार करावा असं, त्याज्य समजाव असं, अवहेलना करावी असं काहीच नाही आणि म्हणूनच शिवाने जी प्रतीके आपल्या जवळ धारण केली आहेत ती सगळी दक्षपणे चिंतिली पाहिजेत.आपल्या वाचनात असं येतं की, भगवान शिवाला तिसरा डोळा आहे आणि तो जेव्हा उघडला जाईल तेव्हा प्रलय होईल, असं म्हटलं जातं. वास्तविक, आपल्या प्रत्येकाला ज्ञान नावाचा तिसरा डोळा असतो. बºयाचदा आपण तो झाकून घेतलेला असतो. आपल्या ठायी असणारा ज्ञान नावाचा तिसरा डोळा उघडला तर जगातल्या अज्ञानाचा प्रलय होतो, असं त्याला सूचित करायचं आहे. शिवाने गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे यातूनही त्याला असं सूचित करायचं आहे की, इतरांना दंश करतील अशा किंवा एखाद्याला बोचतील अशा टाकाऊ असणाºया गोष्टी कंठात असू देत मात्र ओठात नकोत.त्याच्या या सगळ्या असीम असणाºया कर्तृत्व व्याख्या आम्ही अभ्यासल्या की, आम्हीही खूप कर्तृत्ववान बनावं असं वाटतं. जगत हितासाठी त्याने ज्या ज्या जोखमी पत्करल्या आम्हीदेखील अशा सगळ्या जोखमी जबाबदारीने स्वीकाराव्यात आणि या सर्व सामर्थ्याच्या जोरावर त्या जबाबदाºया प्रामाणिकपणाने पार पाडाव्यात, असा संदेश आम्हाला नक्कीच सूचित करतो आहे. एका कवीने म्हटल्याप्रमाणे‘कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो।हलाहलाते प्राशुनी शंकर देवेश्वर ठरतो।जगता देन्या संजीवन या कलंक आदरतो।।’असंच त्याचं सामर्थ्य दायी अस्तित्व आम्हालाही जगद हितासाठी समर्थ बनण्याचा संदेश देत असतं.या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमच्या ठिकाणी भगवान शिवांनी सूचित केलेले द्रष्टेपण यावं आणि ते स्थिर व्हावं असं वाटतं. ते द्रष्टेपण या साजिºया आणि गोजिºया असणाºया शिवाने जसं धारण केलेलं आहे तशीच धारकता आमच्या ठायी येण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून व्हावेत एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)