शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

शिव साजिरा गोजिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 00:28 IST

इंद्रजित देशमुख आज महाशिवरात्री... सगळीकडे शंभू महादेवाच्या दर्शनाची लगबग दिसत आहे. प्रकृतीला अधिष्ठान पुरुषाचं म्हणजेच आत्मतत्त्वाचं असतं. याचं न्यायाने ...

इंद्रजित देशमुखआज महाशिवरात्री... सगळीकडे शंभू महादेवाच्या दर्शनाची लगबग दिसत आहे. प्रकृतीला अधिष्ठान पुरुषाचं म्हणजेच आत्मतत्त्वाचं असतं. याचं न्यायाने शक्तीचा विनियोजक शिवच आहे. आपण खऱ्या अर्थाने त्याच शिवाची पूजा करतोय आणि तोच स्वयमेव असणारा शिव सर्वांच्या अंतर्यामी वास करतो आहे. त्याच्याच अस्तित्वाच्या असण्याने आमचं जिवंत असणं आणि जाणिवेत असणं अवलंबून आहे.शिव हा सामर्थ्याचे प्रतीक आहे आणि म्हणूनच उपासना करणाऱ्यांनी उपासक वृत्तीने त्याची उपासना केल्यानंतर ते सामर्थ्य आपल्या ठायी धारण केले पाहिजे. तसं पाहिलं तर अमृत पितो तो देव असतो आणि स्वत: विष पितो व जगाला अमृत देतो तो महादेव असतो. म्हणूनच हा महादेव आहे. त्यानं आपल्या ठिकाणी धारण केलेले सामर्थ्य निव्वळ आणि निव्वळ जगाच्या हितासाठीच धारण केलेले आहे. मग त्याची उपासना करणाऱ्यांनी सामर्थ्यहीन, निस्तेज राहून चालेल का? त्यानं आपल्या ठिकाणी धारण केलेल्या प्रत्येक गोष्टीतून कुठल्या ना कुठल्या तºहेचं सामर्थ्य प्रकट होत असतं.शिव हा साक्षीदेखील आहे आणि तो अविचल साक्षी आहे. जिवाची होणारी धडपड तो विवेकाने पाहत असतो. देहावर आणि विचारांवर होणाºया कोणत्याच प्रभावाने किंवा त्या प्रभावानुसार होणाºया परिणामाने तो अजिबात हलत नाही. असं कोणत्याही तºहेचे तात्कालिक चांचल्य त्याच्या ठायी आपणास अजिबात पाहायला मिळत नाही. स्वत:चा शोध घेण्यासाठी साधना मार्गाने निघालेल्या साधकांनी अशीच अविचलता धारण करावी लागते. अशी अविचलता धारण केल्यानंतर साक्षी भूत असणारं ते शिवत्व आम्हालाही प्राप्त होऊ शकतं.शिव हे शांतीचेदेखील प्रतीक आहे. त्याने धारण केलेली ध्यानावस्था ही स्वत:च्या शोधासाठी किंवा स्वत:च्या आतील चैतन्याची जाणीव करून घेऊ पाहणाºया साधकांसाठी एक दर्शक आहे आणि म्हणूनच तो शांत आहे. स्वत:च्या ठायी जगाचा एका क्षणात प्रलय करण्याइतकं सामर्थ्य असतानासुद्धा तो शांत आहे. आम्हीसुद्धा तेच शिकायला हवं. स्वत:कडे असणारी कोणत्याही तºहेची संपन्नता प्रदर्शनासाठी किंवा लोकदर्शनासाठी न वापरता ते सर्व धारण करून शांत राहणं हे एक समंजस शहाणपणाचं लक्षण आहे. आजच्या दिवशी शिवदर्शनाने आमच्या ठिकाणी ते लक्षण आलं पाहिजे.वास्तविक, शिव किंवा भगवान शंकर यांच्या प्रतीकात्मक मूर्तीबद्दल चिंतन केलं की असं लक्षात येतं की हा असा देव आहे की, ज्यानं तुमच्या समाजाने अश्लाघ्य समजलेल्या कितीतरी त्याज्य गोष्टी खूप सहजगत्या स्वीकारलेल्या आहेत. याचाच एक अर्थ असाही आहे की, या जगात धिक्कार करावा असं, त्याज्य समजाव असं, अवहेलना करावी असं काहीच नाही आणि म्हणूनच शिवाने जी प्रतीके आपल्या जवळ धारण केली आहेत ती सगळी दक्षपणे चिंतिली पाहिजेत.आपल्या वाचनात असं येतं की, भगवान शिवाला तिसरा डोळा आहे आणि तो जेव्हा उघडला जाईल तेव्हा प्रलय होईल, असं म्हटलं जातं. वास्तविक, आपल्या प्रत्येकाला ज्ञान नावाचा तिसरा डोळा असतो. बºयाचदा आपण तो झाकून घेतलेला असतो. आपल्या ठायी असणारा ज्ञान नावाचा तिसरा डोळा उघडला तर जगातल्या अज्ञानाचा प्रलय होतो, असं त्याला सूचित करायचं आहे. शिवाने गळ्यामध्ये सर्प धारण केलेला आहे यातूनही त्याला असं सूचित करायचं आहे की, इतरांना दंश करतील अशा किंवा एखाद्याला बोचतील अशा टाकाऊ असणाºया गोष्टी कंठात असू देत मात्र ओठात नकोत.त्याच्या या सगळ्या असीम असणाºया कर्तृत्व व्याख्या आम्ही अभ्यासल्या की, आम्हीही खूप कर्तृत्ववान बनावं असं वाटतं. जगत हितासाठी त्याने ज्या ज्या जोखमी पत्करल्या आम्हीदेखील अशा सगळ्या जोखमी जबाबदारीने स्वीकाराव्यात आणि या सर्व सामर्थ्याच्या जोरावर त्या जबाबदाºया प्रामाणिकपणाने पार पाडाव्यात, असा संदेश आम्हाला नक्कीच सूचित करतो आहे. एका कवीने म्हटल्याप्रमाणे‘कर्तव्याला मुकता माणूस माणूस ना उरतो।हलाहलाते प्राशुनी शंकर देवेश्वर ठरतो।जगता देन्या संजीवन या कलंक आदरतो।।’असंच त्याचं सामर्थ्य दायी अस्तित्व आम्हालाही जगद हितासाठी समर्थ बनण्याचा संदेश देत असतं.या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आमच्या ठिकाणी भगवान शिवांनी सूचित केलेले द्रष्टेपण यावं आणि ते स्थिर व्हावं असं वाटतं. ते द्रष्टेपण या साजिºया आणि गोजिºया असणाºया शिवाने जसं धारण केलेलं आहे तशीच धारकता आमच्या ठायी येण्यासाठीचे प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून व्हावेत एवढीच अपेक्षा.(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व परिवर्तनशील वक्ते आहेत.)