शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

शिरोळला प्रचाराची ईर्षा शिगेला

By admin | Updated: October 9, 2014 00:19 IST

राजकीय वातावरण गरमागरम : सर्वच पक्षांना लागले फुटीरतेचे ग्रहण

संदीप बावचे -शिरोळ - विधानसभा मतदारसंघात प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. राजकीय वातावरण गरमागरम झाले असून, या चौरंगी लढती लक्षवेधी ठरत आहेत. मात्र, पक्षीय पातळीपेक्षा गट पातळीवरील अस्तित्व अबाधित ठेवणारी ही निवडणूक असल्याने प्रचारातील ईर्षा पेटली आहे. गाठीभेटी, पदयात्रा, कोपरासभा यांसह जाहीर सभेत राजकीय नेत्यांच्या टीका होत असून, सध्यातरी या मतदारसंघात सर्व पक्षांना फुटीरतेचे ग्रहण लागले आहे. यामुळे येथे कांटे की टक्कर होणार आहे.शिरोळ तालुका हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला. मध्यंतरीचा अपवाद वगळता कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व या तालुक्यात कायम राहिले आहे. राज्यात महायुती तुटली व आघाडीत बिघाडी झाली, त्यामुळे राजकीय समीकरणे बदलली, अशी पहिलीच घटना घडल्याने पक्षीय पातळीवरील नेत्यांनी आपल्या समर्थक स्थानिक नेत्यांना उमेदवारी देऊन कार्यकर्त्यांची गोची केली आहे. कालपर्यंत हातात हात घालून कॉँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्र होते. महायुतीमुळे स्वाभिमानी, शिवसेना, भाजप यांच्यात मनोमिलन झाले होते; पण त्यांच्यात दुफळी झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उभी फूट पडली. तालुका पातळीवरील काही स्थानिक नेतेमंडळींनी पक्षाचे उमेदवार असूनही त्यांचे कार्यकर्ते दिशाहीन झाले असून, सोयीचा उमेदवार निवडून ते प्रचाराला लागले आहेत. तालुक्यात सा. रे. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर, माने गट, कुंभार गट हे प्रमुख गट कार्यरत असून, त्या खालोखाल अनिल यादव, दिलीप पाटील, अशोकराव माने, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर यांचे गट आहेत. यातील निवेदिता माने, अनिल यादव, दिलीप पाटील हे आपल्या भूमिकेबाबत अद्याप मौन पाळून आहेत. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजी मंत्री जयंत पाटील यांनी शिवसेना, कॉँग्रेस यासह स्वाभिमानी पक्षावर तोफ डागली आहे. विकासाची दृष्टी देणाऱ्या युवा नेतृत्वाला संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सा. रे. पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडून कॉँग्रेस पक्षाचे धोरण लोकहिताचे आहे, या मुद्द्यावर भर दिला, तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या तडफदार भाषण शैलीत स्वाभिमानीला लक्ष्य केले. स्वाभिमानीचे उमेदवार सावकर मादनाईक यांचा प्रचार आक्रमकपणे सुरू असून, साखरसम्राटांना जागा दाखवा, असे सांगून कॉँग्रेस-राष्ट्रवादीला ते डिवचत आहेत, तर सेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी एक व्होट, एक नोट हा फार्म्युला राबवीत, स्वाभिमानीने केलेल्या अन्यायाचा पाढा ते गिरवीत आहेत. एकंदरीत प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडत असून, जाहीर सभेतील दिग्गज नेत्यांचे व्यक्तव्य काय असणार याची उत्सुकता असल्याने सभांना गर्दी होत आहे. याच गर्दीचे रूपांतर मतात कितपत होते हे निकालानंतरच समजणार आहे. मात्र, सध्यातरी उमेदवार तुल्यबळ असल्याने लक्षवेधी ठरलेली शिरोळची ही निवडणूक ऐतिहासिक ठरेल, असेच संकेत मिळत आहेत.