शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

शिरोळ तालुक्यामध्ये भाजप भक्कम स्थितीत

By admin | Updated: January 10, 2017 23:09 IST

यादव, माने, निंबाळकर यांचा प्रवेश : कमळ फुलविण्याचे नेत्यांसमोर आव्हान

संदीप बावचे --जयसिंगपूर भाजपने राजकीय कौशल्याचा वापर करून शिरोळ तालुक्यातही राजकीय भूकंप घडविला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे या राजकीय वलय असणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का देत भाजपची बाजू भक्कम केली आहे. यानिमित्त आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तालुक्यात रणशिंग फुंकले आहे. यामुळे साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांसमोर शिरोळ तालुक्यात कमळ फुलविण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांना आमदार करण्यात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, विजय भोजे, रामचंद्र डांगे या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरपासूनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर लक्ष ठेवून ताराराणी आघाडीचे प्रमुख माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. नुकत्याच झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे नेते एकत्र आले होते. चार महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी व्यूहरचना सुरूहोती.अनिल यादव गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्यायच झाला. दोनवेळा विधानसभेचे तिकीट डावलण्यात आले. सूतगिरणी व औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून दलितमित्र अशोकराव माने यांनी सहकाराचे जाळे विणले आहे. ते राष्ट्रवादी पक्षातून काम करीत होते. नाईक-निंबाळकर व जगदाळे यांच्या माध्यमातूनही भाजपला फायदा होणार आहे. यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीतील नेते, काही गावांचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरोळ तालुक्यातील नेत्यांचा भाजपला किती राजकीय फायदा होईल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, भाजपने सध्यातरी पक्षवाढीसाठी ‘राजकीय कॅश’ केले, हे मात्र निश्चित. स्वाभिमानीची भूमिकाभारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करीत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हक्काच्या शिरोळ मतदारसंघात भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीतील नेत्यांना पक्षात ओढले आहे. त्यामुळे भाजपची बाजू आता तालुक्यात भक्कम होणार असून, मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जि.प. व पं. स. निवडणुकीत भूमिका कशी असणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत कोणता पॅटर्नबहुजन विकास आघाडीतील नेते भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे आता एकाकी पडले आहेत. भविष्यात त्यांना ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची भूमिका आगामी काळात काय राहणार, हे देखील महत्त्वाचे असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षाकडून पक्षीय पातळीवर की आघाड्यांचा पॅटर्न वापरला जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.