शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यामध्ये भाजप भक्कम स्थितीत

By admin | Updated: January 10, 2017 23:09 IST

यादव, माने, निंबाळकर यांचा प्रवेश : कमळ फुलविण्याचे नेत्यांसमोर आव्हान

संदीप बावचे --जयसिंगपूर भाजपने राजकीय कौशल्याचा वापर करून शिरोळ तालुक्यातही राजकीय भूकंप घडविला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे या राजकीय वलय असणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का देत भाजपची बाजू भक्कम केली आहे. यानिमित्त आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तालुक्यात रणशिंग फुंकले आहे. यामुळे साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांसमोर शिरोळ तालुक्यात कमळ फुलविण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांना आमदार करण्यात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, विजय भोजे, रामचंद्र डांगे या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरपासूनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर लक्ष ठेवून ताराराणी आघाडीचे प्रमुख माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. नुकत्याच झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे नेते एकत्र आले होते. चार महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी व्यूहरचना सुरूहोती.अनिल यादव गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्यायच झाला. दोनवेळा विधानसभेचे तिकीट डावलण्यात आले. सूतगिरणी व औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून दलितमित्र अशोकराव माने यांनी सहकाराचे जाळे विणले आहे. ते राष्ट्रवादी पक्षातून काम करीत होते. नाईक-निंबाळकर व जगदाळे यांच्या माध्यमातूनही भाजपला फायदा होणार आहे. यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीतील नेते, काही गावांचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरोळ तालुक्यातील नेत्यांचा भाजपला किती राजकीय फायदा होईल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, भाजपने सध्यातरी पक्षवाढीसाठी ‘राजकीय कॅश’ केले, हे मात्र निश्चित. स्वाभिमानीची भूमिकाभारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करीत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हक्काच्या शिरोळ मतदारसंघात भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीतील नेत्यांना पक्षात ओढले आहे. त्यामुळे भाजपची बाजू आता तालुक्यात भक्कम होणार असून, मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जि.प. व पं. स. निवडणुकीत भूमिका कशी असणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत कोणता पॅटर्नबहुजन विकास आघाडीतील नेते भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे आता एकाकी पडले आहेत. भविष्यात त्यांना ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची भूमिका आगामी काळात काय राहणार, हे देखील महत्त्वाचे असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षाकडून पक्षीय पातळीवर की आघाड्यांचा पॅटर्न वापरला जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.