शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
2
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
3
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
4
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
5
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
6
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
7
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
8
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
9
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
10
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
11
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
12
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
13
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
14
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
15
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
16
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
17
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
18
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
19
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
20
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर

शिरोळ तालुक्यामध्ये भाजप भक्कम स्थितीत

By admin | Updated: January 10, 2017 23:09 IST

यादव, माने, निंबाळकर यांचा प्रवेश : कमळ फुलविण्याचे नेत्यांसमोर आव्हान

संदीप बावचे --जयसिंगपूर भाजपने राजकीय कौशल्याचा वापर करून शिरोळ तालुक्यातही राजकीय भूकंप घडविला. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, नृसिंहवाडीचे उपसरपंच धनाजीराव जगदाळे या राजकीय वलय असणाऱ्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला धक्का देत भाजपची बाजू भक्कम केली आहे. यानिमित्त आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे तालुक्यात रणशिंग फुंकले आहे. यामुळे साहजिकच येणाऱ्या निवडणुकीत या नेत्यांसमोर शिरोळ तालुक्यात कमळ फुलविण्याचे आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांना आमदार करण्यात गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, दलितमित्र अशोकराव माने, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, धनाजीराव जगदाळे, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील, विजय भोजे, रामचंद्र डांगे या शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतील नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधान परिषद निवडणुकीच्या अगोदरपासूनच भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर लक्ष ठेवून ताराराणी आघाडीचे प्रमुख माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. नुकत्याच झालेल्या जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांच्या नेतृत्वाखाली हे नेते एकत्र आले होते. चार महिन्यांपासून बहुजन विकास आघाडीतील या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी व्यूहरचना सुरूहोती.अनिल यादव गेल्या तीन दशकांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत होते. मात्र, पक्षात त्यांच्यावर अन्यायच झाला. दोनवेळा विधानसभेचे तिकीट डावलण्यात आले. सूतगिरणी व औद्योगिक वसाहत यांच्या माध्यमातून दलितमित्र अशोकराव माने यांनी सहकाराचे जाळे विणले आहे. ते राष्ट्रवादी पक्षातून काम करीत होते. नाईक-निंबाळकर व जगदाळे यांच्या माध्यमातूनही भाजपला फायदा होणार आहे. यादव यांच्यासह बहुजन विकास आघाडीतील नेते, काही गावांचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपची बाजू भक्कम झाली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिरोळ तालुक्यातील नेत्यांचा भाजपला किती राजकीय फायदा होईल, हे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीत स्पष्ट होईल. मात्र, भाजपने सध्यातरी पक्षवाढीसाठी ‘राजकीय कॅश’ केले, हे मात्र निश्चित. स्वाभिमानीची भूमिकाभारतीय जनता पक्षाचा मित्रपक्ष म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना काम करीत आहे. खासदार राजू शेट्टी यांच्या हक्काच्या शिरोळ मतदारसंघात भाजपने पक्ष मजबूत करण्यासाठी बहुजन विकास आघाडीतील नेत्यांना पक्षात ओढले आहे. त्यामुळे भाजपची बाजू आता तालुक्यात भक्कम होणार असून, मित्रपक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जि.प. व पं. स. निवडणुकीत भूमिका कशी असणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीत कोणता पॅटर्नबहुजन विकास आघाडीतील नेते भाजपमध्ये गेल्यामुळे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील हे आता एकाकी पडले आहेत. भविष्यात त्यांना ‘एकला चलो रे’ अशी भूमिका घ्यावी लागणार आहे.बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची भूमिका आगामी काळात काय राहणार, हे देखील महत्त्वाचे असून, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राजकीय पक्षाकडून पक्षीय पातळीवर की आघाड्यांचा पॅटर्न वापरला जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.