शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

शिरोळ ग्रामपंचायतीचे पाणी बचतीचे पुढचे पाऊल

By admin | Updated: February 18, 2016 21:45 IST

पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन : प्रकल्पामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार

संदीप बावचे -- शिरोळ --बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ यात बदल झाला आहे. यंदा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पाण्याचे नियोजन करणे आव्हान बनले आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शिरोळ ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हावेस्टिंग (पर्जन्य जल संवर्धन) हा प्रकल्प राबविला असून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारून पाणी बचतीचा संकल्प केला आहे.हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबरोबरच त्याचा वापर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे. इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या सहायाने पाईप एकत्र जोडल्या आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर इमारतीच्या छतावरून माती, खडे, पाला-पाचोळा पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनविलेला रेनी फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमुळे कचरा आपोआप गुरुत्वाकर्षनाच्या सहायाने वेगळा होणार आहे. अगदी कमी जागेत स्वयंचलित हा फिल्टर असल्यामुळे मातीने व कचऱ्याने तो ब्लाक होत नसल्यामुळे खर्चाची बचत होणार आहे. असा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.भूजल पातळीत वाढवाढत्या शहरीकरणामुळे कॉँक्रीटीकरणात वाढ झाली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. यावर मात करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवून त्याचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे.ग्रामपंचायतीनेच हा प्रकल्प बसविल्यामुळे असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे बांधकाम परवाना घेणाऱ्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती करण्यात येणार आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळस्वत:पासून सुरुवातया उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने स्वत:पासून हा प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करून ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. सध्या या विहिरीत असलेला गाळ व दूषित पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम सुरू आहे.