शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

शिरोळ ग्रामपंचायतीचे पाणी बचतीचे पुढचे पाऊल

By admin | Updated: February 18, 2016 21:45 IST

पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन : प्रकल्पामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार

संदीप बावचे -- शिरोळ --बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ यात बदल झाला आहे. यंदा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पाण्याचे नियोजन करणे आव्हान बनले आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शिरोळ ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हावेस्टिंग (पर्जन्य जल संवर्धन) हा प्रकल्प राबविला असून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारून पाणी बचतीचा संकल्प केला आहे.हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबरोबरच त्याचा वापर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे. इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या सहायाने पाईप एकत्र जोडल्या आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर इमारतीच्या छतावरून माती, खडे, पाला-पाचोळा पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनविलेला रेनी फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमुळे कचरा आपोआप गुरुत्वाकर्षनाच्या सहायाने वेगळा होणार आहे. अगदी कमी जागेत स्वयंचलित हा फिल्टर असल्यामुळे मातीने व कचऱ्याने तो ब्लाक होत नसल्यामुळे खर्चाची बचत होणार आहे. असा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.भूजल पातळीत वाढवाढत्या शहरीकरणामुळे कॉँक्रीटीकरणात वाढ झाली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. यावर मात करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवून त्याचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे.ग्रामपंचायतीनेच हा प्रकल्प बसविल्यामुळे असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे बांधकाम परवाना घेणाऱ्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती करण्यात येणार आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळस्वत:पासून सुरुवातया उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने स्वत:पासून हा प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करून ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. सध्या या विहिरीत असलेला गाळ व दूषित पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम सुरू आहे.