शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ ग्रामपंचायतीचे पाणी बचतीचे पुढचे पाऊल

By admin | Updated: February 18, 2016 21:45 IST

पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन : प्रकल्पामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार

संदीप बावचे -- शिरोळ --बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ यात बदल झाला आहे. यंदा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पाण्याचे नियोजन करणे आव्हान बनले आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शिरोळ ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हावेस्टिंग (पर्जन्य जल संवर्धन) हा प्रकल्प राबविला असून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारून पाणी बचतीचा संकल्प केला आहे.हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबरोबरच त्याचा वापर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे. इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या सहायाने पाईप एकत्र जोडल्या आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर इमारतीच्या छतावरून माती, खडे, पाला-पाचोळा पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनविलेला रेनी फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमुळे कचरा आपोआप गुरुत्वाकर्षनाच्या सहायाने वेगळा होणार आहे. अगदी कमी जागेत स्वयंचलित हा फिल्टर असल्यामुळे मातीने व कचऱ्याने तो ब्लाक होत नसल्यामुळे खर्चाची बचत होणार आहे. असा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.भूजल पातळीत वाढवाढत्या शहरीकरणामुळे कॉँक्रीटीकरणात वाढ झाली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. यावर मात करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवून त्याचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे.ग्रामपंचायतीनेच हा प्रकल्प बसविल्यामुळे असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे बांधकाम परवाना घेणाऱ्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती करण्यात येणार आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळस्वत:पासून सुरुवातया उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने स्वत:पासून हा प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करून ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. सध्या या विहिरीत असलेला गाळ व दूषित पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम सुरू आहे.