शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
2
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
3
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
4
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
5
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
6
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
7
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
8
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय
9
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
10
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
11
गवार, मटारचा भाव २०० रुपयांवर; पालक ६०, तर मेथी ५० रुपये जुडी, दसऱ्याला भाजीपाल्याला महागाईची फोडणी
12
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
13
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
14
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
15
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
16
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
17
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
18
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
19
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
20
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?

शिरोळ ग्रामपंचायतीचे पाणी बचतीचे पुढचे पाऊल

By admin | Updated: February 18, 2016 21:45 IST

पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन : प्रकल्पामुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार

संदीप बावचे -- शिरोळ --बदलत्या हवामानानुसार पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ यात बदल झाला आहे. यंदा दुष्काळ सदृश परिस्थितीमुळे पाण्याचे नियोजन करणे आव्हान बनले आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शिरोळ ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल टाकले आहे. ग्रामपंचायतीमार्फत रेन वॉटर हावेस्टिंग (पर्जन्य जल संवर्धन) हा प्रकल्प राबविला असून ग्रामपंचायतीच्या इमारतीवर हा प्रकल्प उभारून पाणी बचतीचा संकल्प केला आहे.हवामानातील बदलामुळे पावसाचे प्रमाण व पाऊस पडण्याचा काळ कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट होत आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याबरोबरच त्याचा वापर करता यावा यासाठी ग्रामपंचायतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प हाती घेतला आहे. ग्रामपंचायत इमारतीवर पावसाच्या पाण्याचा संचय करण्यासाठी रेन हार्वेस्टिंगचा पथदर्शी प्रकल्प उभारला आहे. इमारतीवर पडणारे पावसाचे पाणी एकत्र करण्यासाठी पीव्हीसी पाईपच्या सहायाने पाईप एकत्र जोडल्या आहेत. पावसाच्या पाण्याबरोबर इमारतीच्या छतावरून माती, खडे, पाला-पाचोळा पाण्यापासून वेगळे करण्यासाठी आधुनिक पद्धतीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी बनविलेला रेनी फिल्टर लावण्यात आला आहे. या फिल्टरमुळे कचरा आपोआप गुरुत्वाकर्षनाच्या सहायाने वेगळा होणार आहे. अगदी कमी जागेत स्वयंचलित हा फिल्टर असल्यामुळे मातीने व कचऱ्याने तो ब्लाक होत नसल्यामुळे खर्चाची बचत होणार आहे. असा प्रकल्प प्रत्येकाने राबविल्यास भूजल पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.भूजल पातळीत वाढवाढत्या शहरीकरणामुळे कॉँक्रीटीकरणात वाढ झाली आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते. यामुळे भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून कूपनलिका व विहिरींची पाणी पातळी घटली आहे. यावर मात करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवून त्याचा वापर करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी पडणार आहे.ग्रामपंचायतीनेच हा प्रकल्प बसविल्यामुळे असा उपक्रम राबविणारी राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहे. यापुढे बांधकाम परवाना घेणाऱ्यांना रेन हार्वेस्टिंग प्रकल्पाची सक्ती करण्यात येणार आहे. कूपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळस्वत:पासून सुरुवातया उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतीने स्वत:पासून हा प्रकल्प राबविण्याचे धोरण निश्चित करून ग्रामपंचायत इमारतीजवळ असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी त्याचा उपयोग केला जाणार आहे. सध्या या विहिरीत असलेला गाळ व दूषित पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम सुरू आहे.