शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
3
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
4
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
5
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
6
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
7
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
8
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
9
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
10
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
11
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
12
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
13
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
14
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
15
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
16
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
17
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
18
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
19
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
20
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ

शिरोळ ग्रामपंचायत नगरपरिषदेच्या मार्गावर

By admin | Updated: April 13, 2015 00:02 IST

शासनाच्या राजपत्रात उद्घोषणा : आक्षेपासाठी ३० दिवसांची मुदत

शिरोळ : शिरोळला ग्रामपंचायत ऐवजी नगरपालिका करण्याची उद्घोषणा झाली असून, त्यादृष्टीने शासनस्तरावर प्रयत्न अंतिम टप्प्यात सुरू आहेत. जयसिंगपूर, कुरुंदवाडनंतर तालुक्यातील तिसरी नगरपालिका होण्याच्या मार्गावर असून शासनाने जाहीर केलेल्या अभिसूचनेला आक्षेप घेण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी दिला आहे. नगरपालिका झाल्यानंतर शिरोळच्या विकासाला मोठा निधी मिळणार आहे.मार्च २०१४ मध्ये तत्कालीन आघाडी शासनाने राज्यातील १३८ गावे नगरपरिषद व नगरपंचायती मंजूर केल्याचे आदेश जारी केले होते. शिरोळला नगरपरिषद की नगरपंचायत अशी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला होता. शासनाच्या लालफितीत अडकलेला नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव अखेर मंजूर झाला आहे. ६ एप्रिल २०१५ रोजी महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्रात याबाबतची उद्घोषणाही प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय शिरोळ तहसील कार्यालय, ग्रामपंचायत आणि जिल्हाधिकारी कार्यालयात हद्दीबद्दल माहितीही उपलब्ध करण्यात आली आहे. यात क्षेत्र दर्शविणारा आराखडा जोडलेला आहे. यामुळे निश्चित शिरोळची नगरपरिषदेकडे वाटचाल सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)विकासाला चालनाशहराची वाढती लोकसंख्या, अपुरे पडणारे ग्रामपंचायतीचे उत्पन्न, सेवा-सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीची होणारी दमछाक या पार्श्वभूमीवर तालुकापातळीवर सर्वच ग्रामपंचायत नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन राज्य शासनाने घेतला होता. ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी यापूर्वीच नगरपरिषदेबाबतचा प्रस्ताव शासनाकडे देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता.नगरपरिषद होण्याच्या दृष्टिकोनातून शासनस्तरावर प्रयत्न अंतिम टप्प्यात सुरू आहे. ग्रामपंचायतऐवजी नगरपालिका करण्याची उद्घोषणा झाली असली तरी यावर आक्षेप सादर करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी राखून ठेवण्यात आला आहे. त्यानंतरच नगरपरिषदेबाबतचा अंतिम निर्णय शासनाकडून जाहीर होणार आहे.राजकीय इच्छाशक्तीची गरजनगरपरिषद झाल्यानंतर गावच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, स्वच्छता याशिवाय विविध सुविधा निर्माण करण्यासाठी नगरपरिषदेचा निधी उपयुक्त ठरणार आहे. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून गाव पुढाऱ्यांनी नगरपरिषदेला अंतिम मुहूर्त देण्यासाठी पुढाकार घेतला तरच नगरपरिषद होण्यास कोणतीही अडचण होणार नाही.