शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

शिरोळ-दत्त, जवाहरला पुरस्कार प्रदान

By admin | Updated: September 20, 2016 00:02 IST

दिल्लीत सन्मान : गणपतराव पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उपस्थिती

शिरोळ/हुपरी : देशपातळीवरील उच्च साखर उतारा विभागात ऊस विकासाचा प्रथम पुरस्कार शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यास, तर २०१५-१६च्या गळीत हंगामामध्ये ऊस गाळप साध्य केलेल्या तांत्रिक, आर्थिक, ऊस विकास योजना व संशोधन, आदी क्षेत्रांतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास केंद्र सरकारचे मुख्य संचालक जी. एस. साहू यांच्या हस्ते दिल्ली येथे सोमवारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री दत्त कारखान्याचा पुरस्कार अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी, तर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.नॅशनल फेडरेशन आॅफ को-आॅप. शुगर फॅक्टरीज, दिल्ली या संस्थेच्या वार्षिक सभेत देशपातळीवरील हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, उपाध्यक्ष अमित कोरे, संचालक कल्लाप्पाण्णा आवाडे, मानसिंगभाई पटेल, जयंतीभाई पटेल, शिवाजीराव नागवडे, कार्यकारी संचालक मनोहर जोशी उपस्थित होते. श्री दत्त कारखान्याने गळीत हंगाम २०१५-१६ मध्ये एकूण केलेल्या ऊस विकास, ऊस विकासाच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांसाठी राबविलेल्या विविध ऊस विकास योजना, तसेच या योजना राबविल्यानंतर ऊस क्षेत्रामध्ये झालेली वाढ, उसाच्या टनेजमध्ये, तसेच रिकव्हरीमध्ये झालेली वाढ या गोष्टी विचारात घेऊन हा उच्च साखर उतारा विभागातील ऊस विकासाचा पुरस्कार कारखान्यास देण्यात आला.याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष सिदगोंडा पाटील, संचालक युसूफ मेस्त्री, अनिल यादव, श्रेणिक पाटील, शरदचंद्र पाठक, अरुणकुमार देसाई, रघुनाथ पाटील, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील, आण्णासाहेब पवार, इंद्रजित पाटील, रणजित कदम, रावसाहेब नाईक, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, महेंद्र बागे, बाबूराव पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल्य हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.जवाहर शेतकरी साखर कारखान्यास अनेक पुरस्कारहुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देश पातळीवरील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री प्रकाश आवाडे, उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले व संचालक मंडळाला सन्मानित करण्यात आले. जवाहर कारखान्यास यापूर्वी नॅशनल फेडरेशन आॅफ शुगर फॅक्टरीज नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघ मुंबई, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण पुणे अशा नामवंत संस्थांकडून तांत्रिक, आर्थिक, कृषी, पर्यावरण, वीज बचत, व्यवस्थापन आदी क्षेत्रांत उत्कृष्ट कामकाजाबाबत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे, अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सर्व सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी व ऊस तोडणी मजूर, कंत्राटदार, आदींचे आभार मानले.