शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शिरगाव-मुसळवाडी रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:25 IST

करवीर व राधानगरी तालुक्यांतील जोडणारा आरे-पिरळ हा महत्त्वाचा रस्ता असून, या मार्गावरील शिरगाव ते मुसळवाडी दरम्यानच्या रस्त्यावर ...

करवीर व राधानगरी तालुक्यांतील जोडणारा आरे-पिरळ हा महत्त्वाचा रस्ता असून, या मार्गावरील शिरगाव ते मुसळवाडी दरम्यानच्या रस्त्यावर गेले कित्येक दिवस झाले मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या रस्त्यावरून मोठमोठ्या वाहनांची ये-जा असते. जिल्हा परिषद की सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारित असलेल्या या रस्त्याला सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहने चालवावे लागते. अनेक ठिकाणी दोन फूट खोल व लांब मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यांत खड्डा की खड्ड्यात रस्ता हे काय कळत नाही. शिरगाव हे गाव उंचवट्यावर डोंगरसदृश स्थितीवर वसलेले आहे. त्यामुळे पावसाचे, नाल्यातील इतर सांडपाणी थेट या मार्गावर येते. रस्त्याच्या दुतर्फा नाले, गटारी नसल्याने अशी अवस्था झाली आहे. वाहनधारक कधी पडतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

या रस्त्याला लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य आहेत की नाही, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या निदर्शनास या रस्त्यावरील खड्डे दिसतात का नाही? असा संतप्त सवाल जनतेतून व्यक्त होत असून, एखादा मोठा अपघात झाला तरच लक्ष देणार आहेत काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फोटो : शिरगाव-मुसळवाडी रस्त्यावर असे अनेक खड्डे पडले असून, वाहनधारक अशी कसरत करीत आहेत.