शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिर्डीचा गुंता सुटला, कोल्हापूरचा का अडला..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असलेले शिर्डी देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नियुक्तीवर शासनाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्याचे राजपत्रच प्रसिद्ध झाल्याने आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदाची निवड कधी होणार, याची उत्सुकता आहे. परंतु समिती बरखास्तीचा वादच न्यायालयात गेल्याने ही निवड लोंबकळणार असेच चित्र आहे.

मुळात दोन्ही काँग्रेसपैकी ही देवस्थान समिती कुणाच्या वाट्याला जाणार, हा मोठा गुंता आहे व तो सुटल्यावर मग त्यावर कुणाची वर्णी लागणार, हा त्यानंतरचा गुंता आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांची या पदावर पाच वर्षांकरिता ऑगस्ट २०१७ मध्ये नियुक्ती झाली. त्यांचा कालावधी संपण्यास १६ महिन्यांचा अवधी असतानाच महाविकास आघाडीने ही समिती बरखास्त केली. त्याविरोधात भाजपचे असलेले जाधव उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयात तीन सुनावण्या झाल्या. राज्य शासनानेही म्हणणे मांडले आहे. परंतु, जोपर्यंत न्यायालयाकडून समिती बरखास्त करण्याचा शासनाचा निर्णय वैध ठरवला जात नाही, तोपर्यंत या समितीवरील अध्यक्षपदाची नियुक्ती करता येत नाही. राष्ट्रवादीकडून पक्षाचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी या पदासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांची व्हेटो पॉवर वापरली होती. परंतु, जोपर्यंत न्यायालयीन वाद मिटत नाही तोपर्यंत काहीच करता येत नाही.

कुणाच्या पाठीशी कुठले देवस्थान

महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, मुंबईचा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट, शिर्डीचे साईबाबा संस्थान ट्रस्ट आणि पंढरपूरचे विठ्ठल मंदिर ही प्रमुख धार्मिक, आर्थिक व राजकीय सत्ताकेंद्रे आहेत. शिर्डी व पंढरपूर मंदिरांचे व्यवस्थापन प्रशासक मंडळाकडे होते. शिर्डी राष्ट्रवादीकडे गेल्याने पंढरपूर देवस्थान काँग्रेसला देण्यात आले. सिद्धिविनायक मंदिर गेली अनेक वर्षे शिवसेनेकडेच असून, आदेश बांदेकर त्याचे अध्यक्ष आहेत.

आता जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे..

शासनाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त केल्यावर समितीची सूत्रे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहेत. महेश जाधव यांच्या काळात जी विविध कामे झाली, त्याबद्दल ते पदावरून दूर जाताच मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात बारकाईने लक्ष घातले आहे. त्याची चौकशी, कारणे दाखवा नोटीस अशी कारवाई सुरू झाली आहे. या ना त्या कारणाने देवस्थान समिती चर्चेत आहे.