शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
5
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
6
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
7
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
8
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
9
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
10
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
11
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
12
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
13
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
14
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
15
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
16
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
17
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
18
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
19
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
20
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."

शिरढोणला लोकवर्गणीतून -सांडपाणी प्रश्न निकालात

By admin | Updated: January 3, 2017 23:53 IST

नागरिकांतून समाधान : पंचवीस वर्षांपासून प्रलंबित होता प्रश्न

गणपती कोळी --कुरूंदवाड -कोणतेही सार्वजनिक काम लोकप्रतिनिधी व लोकसहभाग झाल्यास दर्जेदार कामाबरोबरच योजना पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही. याचे उदाहरण शिरढोण (ता.शिरोळ) येथील माळभागावरील बेघर वसाहतीतील रहिवाशी व ग्रामपंचायतीने लोकवर्गणी व श्रमदानातून सांडपाणी निचऱ्याचा कित्येक वर्षाचा प्रश्न पूर्णत्वास आणत आहेत. त्यांचा हा उपक्रम स्तुत्य व आदर्शवत ठरणारा आहे. येथील माळभागावर पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने बेघर वसाहत वसविली आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती असलेल्या या वसाहतीला सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न नेहमी सतावत होता. या गल्लीतून गटारी बांधल्या तरी गटारीच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नसल्याने शिवाय ग्रामपंचायत या प्रश्नाकडे फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा गंभीर प्रश्न प्रलंबितच होता. पावसाळ्यामध्ये तर हा प्रश्न अधिकच गंभीर होऊन सांडपाणी व पावसाच्या पाण्याने अनेकांच्या घरामध्ये शिरत असल्याने घाणीचे साम्राज्य, डासांची उत्पत्ती व साथीच्या आजाराने रहिवाशी वैतागले होते. गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच बिनविरोध झाल्याने गावातील राजकीय खेळींना पूर्णविराम मिळून विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामध्ये माळभागावरील बेघर वसाहतीतील प्रश्न सोडविण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. या वसाहतीत गटारी बांधणे, पाण्याची निर्गत करण्याची व्यवस्था करणे याचा खर्च ग्रामपंचायतीला शक्य होणार नसल्याने सरपंच शितल शिंदे, उपसरपंच चंद्रकांत मालगावे, ग्रामपंचायत सदस्य विलास चौगुले यांनी पुढाकार घेवून या कामाला आर्थिक पाठबळ मिळविण्यासाठी वसाहतीतील रहिवाशांना सामावून घेतले व लोकवर्गणीचा प्रस्ताव ठेवला. लोकांनीही हा प्रस्ताव मान्य करत ग्रामपंचायत निधी व लोकवर्गणी आणि श्रमदानातून आठ दिवसांपूर्वी कामालाही प्रारंभ झाला. कामाचे गांभीर्य दाखविले शिरढोण येथील वसाहतीतील सांडपाणी निर्गतीचा प्रश्न नेहमीच सतावत होता. सांडपाणी निर्गत करण्याची व्यवस्थाच नसल्याने शिवाय या प्रश्नाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष राहिल्याने हा प्रश्न प्रलंबित होता. सध्या सरपंच शितल शिंदे या वसाहतीतच राहतात. तसेच ग्रामपंचायत सदस्य विलास चौगुले या प्रभागाचे नेतृत्व करत असल्याने त्यांनी उपसरपंच मालगावे, सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेवून या कामाचे गांभीर्य समजावून सांगितले. येथील रहिवाशांना एकत्र करुन शासनाच्या जबाबदारी बरोबर स्वत:चे कर्तव्य समजून सांगितल्याने एका चुटकीसरसी हा प्रश्न निकाला लागला. आदर्शवत उपक्रम : पाच बोळ रस्त्याचे गटारी बांधून तीन ठिकाणी नांदेड पॅटर्न शोषखड्डे बांधण्यात येत आहे. काम अंतिम टप्प्यात असून नव्या वर्षापासून येथील कित्येक वर्षाचा सांडपाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागल्याने नागरिकांतून समाधान होत आहे. लोकवर्गणी, श्रमदान व ग्रामपंचायतीचा पुढाकार यामुळे काम तर दर्जेदार झाले आहे. शिवाय कित्येक वर्षातील प्रलंबित असलेला सार्वजनिक कामाचा निपटारा लोकसहभागातून झाल्याने हा उपक्रम आदर्शवत ठरत आहे.