शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

शिये ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा

By admin | Updated: August 25, 2014 22:53 IST

ग्रामस्थांचे आंदोलन : अनियमित पाणीपुरवठ्याचा निषेध

कोल्हापूर : गेल्या काही महिन्यांपासून पिण्याचा पाणीपुरवठा वारंवार खंडित झाल्यामुळे हनुमाननगर येथील शेकडो त्रस्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर घागर मोर्चा काढून ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त करीत घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशाराही मोर्चातील कार्यकर्त्यांनी दिला.या महिला मोर्चासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी सरपंच व सदस्यांना ठणकावताना तुम्हाला पाणीपुरवठा सुरळीत करणे जमत नसेल तर आम्हाला श्रीरामनगर व हनुमाननगरसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत द्या, अशी मागणी केली. त्यानंतर सरपंच लक्ष्मी फडतारे, उपसरपंच प्रवीण चौगले यांनी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित केला. यावेळी जि. प.चे सदस्य बाजीराव पाटील, पांडुरंग पाटील, ग्रा.पं. सदस्य रणजित कदम, शिवाजी गाडवे, मनोहर सुतार उपस्थित होते. मोर्चामध्ये सागर शिंदे, उदय जाधव, सुभाष जाधव, राहुल कर्णे, ग्रा.पं. सदस्या नयना शिंदे, शकुंतला माने, मंगल जाधव, सुनीता गाडवे, अरुणा जाधव, अनिता निकम, सरस्वती गाडवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)सहा महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमितपाच-सहा महिन्यांपासून हनुमाननगर येथील पाणीपुरवठा अनेक कारणांनी खंडित झाल्यामुळे तेथील नागरिक हैराण झाले होते. ग्रामपंचायतीकडील पाणीपुरवठा योजनेमुळे येथील पूर्वीच्या खासगी पाणीपुरवठा व्यवस्था बंद पडल्यामुळे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यावर लोकांना अवलंबून राहावे लागत होते. अशा परिस्थितीत ग्रामपंचायतीचा दुर्लक्षामुळे पाण्यावाचून वंचित राहावे लागल्याच्या तीव्र भावना मोर्चातील महिलांनी व्यक्त केल्या.