शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

साखरेच्या दरवाढीसाठी शेट्टींनी प्रयत्न करावेत

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

जयंत पाटील : जयसिंगपुरात शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

जयसिंगपूर : साखरेला ३५०० रुपयांपर्यत भाव मिळाला, तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे. निर्यातीचे धोरण व साखरेला दर मिळवून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत. उसाच्या दरासाठी आंदोलन करतात; मग तूरडाळीच्या वाढलेल्या दरासाठी आंदोलन का करीत नाहीत? असा इशाराही खा. शेट्टींना माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिला. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकरांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जयसिंगपूर येथे शरद साखर कारखाना, नरंदे व कृषी महाविद्यालय, जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या शरद कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन शुक्रवारी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील म्हणाले, शरद कारखान्याच्या पुढाकाराने येथील कृषी प्रदर्शनात राज्यातील व देशातील नामवंत संस्थांनी भाग घेतला असून, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान अवगत होणार आहे. सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत असून, त्यांनी आणखी नवीन प्रयोगाचे स्वागत करून जगातील ज्ञान घेण्याची गरज आहे.प्रारंभी सहकाररत्न स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन करण्यात आले. त्यानंतर शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शरद कारखान्याची निर्मिती झाली असून, त्याबरोबरच सर्व सोयींनीयुक्त शिक्षण संस्था उभारल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना नवनवीन काहीतरी देण्यासाठी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, महाराष्ट्र राज्य जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, जिल्हा कृषी अधिकारी मोहन आठवले, रावसाहेब भिलवडे, तुकाराम खामकर, धनाजी देसाई, सर्जेराव शिंदे, सागर चौगुले, सत्येंद्रसिंह निंबाळकर, सुजाता शिंदे, जयपाल कुंभोजे, थबा कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)