शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

साखरेच्या दरवाढीसाठी शेट्टींनी प्रयत्न करावेत

By admin | Updated: November 21, 2015 00:40 IST

जयंत पाटील : जयसिंगपुरात शरद कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन

जयसिंगपूर : साखरेला ३५०० रुपयांपर्यत भाव मिळाला, तरच एकरकमी एफआरपी देणे शक्य होणार आहे. निर्यातीचे धोरण व साखरेला दर मिळवून देण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्र शासनाकडे प्रयत्न करावेत. उसाच्या दरासाठी आंदोलन करतात; मग तूरडाळीच्या वाढलेल्या दरासाठी आंदोलन का करीत नाहीत? असा इशाराही खा. शेट्टींना माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी दिला. यावेळी राजेंद्र पाटील-यड्रावकरांना विधानपरिषदेवर निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.जयसिंगपूर येथे शरद साखर कारखाना, नरंदे व कृषी महाविद्यालय, जैनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दुसऱ्या शरद कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन शुक्रवारी आमदार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पाटील म्हणाले, शरद कारखान्याच्या पुढाकाराने येथील कृषी प्रदर्शनात राज्यातील व देशातील नामवंत संस्थांनी भाग घेतला असून, खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान अवगत होणार आहे. सध्या शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत असून, त्यांनी आणखी नवीन प्रयोगाचे स्वागत करून जगातील ज्ञान घेण्याची गरज आहे.प्रारंभी सहकाररत्न स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कृषी प्रदर्शनाचे उद्द्याटन करण्यात आले. त्यानंतर शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी शरद कारखान्याची निर्मिती झाली असून, त्याबरोबरच सर्व सोयींनीयुक्त शिक्षण संस्था उभारल्या आहेत. तसेच येत्या काही दिवसांत आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात येणार असून, शेतकऱ्यांना नवनवीन काहीतरी देण्यासाठी हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे.यावेळी पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर, महाराष्ट्र राज्य जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील-बोरगावकर, नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर, जिल्हा कृषी अधिकारी मोहन आठवले, रावसाहेब भिलवडे, तुकाराम खामकर, धनाजी देसाई, सर्जेराव शिंदे, सागर चौगुले, सत्येंद्रसिंह निंबाळकर, सुजाता शिंदे, जयपाल कुंभोजे, थबा कांबळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)