शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
2
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
4
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
5
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
6
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
7
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
8
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
9
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
10
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
11
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
12
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
13
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
14
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
15
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
16
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
17
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
18
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
19
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
20
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!

शेट्टींनी कांदा निर्यातीचे धोरण बदलून दाखवावे- शरद पवार :

By admin | Updated: September 16, 2014 23:56 IST

माझ्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून

कोल्हापूर : ‘युपीए’ सरकारने कांद्यावर निर्यातबंदी कधी घातली नाही, घातली तर चोवीस तासांत उठविण्याचे काम केले; पण मोदी सरकारने कांद्यावर निर्यातबंदी घातल्याने शेतकरी उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असताना शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करणारी मंडळी कोठे आहेत, त्यांनी हा निर्णय बदलून दाखवावाच, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिले. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्या, मंगळवारी कोल्हापुरात होणाऱ्या प्रचार प्रारंभ मेळाव्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, मागील दहा वर्षांत साखरेचे दर एका विशिष्ट पातळीवर स्थिर ठेवल्याने शेतकऱ्यांना उसाला चांगला दर मिळाला; पण गेले तीन महिन्यांत सर्वच शेतीमालाची वाईट अवस्था झालेली आहे. साखरेचे दर घसरल्याने आगामी हंगामात साखर कारखान्यांसमोर अडचणी वाढणार आहेत. अशा परिस्थितीत संसदेत निर्णय बदलण्याचे काम सत्ताधारी मंडळींनी केले पाहिजे; पण काही मंडळी संसदेऐवजी बारामती व कोल्हापुरातच निर्णय बदलतात, असे वाटते असा टोलाही त्यांनी खासदार शेट्टींना लगावला. दोन्ही काँग्रेसचे जागावाटप संपले की, किती व कोणत्या जागा येतात हे निश्चित झाल्यानंतर समविचार पक्षांशी चर्चा करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सामान्य माणूस भयभीतकेंद्रातील मोदी सरकारबाबत शंभर दिवसांतच निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही; पण सरकार ज्या दिशेने पाऊल टाकत आहे, त्याने सामान्य माणूस भयभीत झाला आहे. देश चालविण्यासाठी एका टीमची गरज असते; पण ती टीम केंद्रात दिसत नसल्याची टीका शरद पवार यांनी केली. कोल्हापुरातच यावे लागतेपवार म्हणाले, गेली ३५ वर्षांत माझ्या प्रत्येक निवडणुकीची सुरुवात कोल्हापुरातून करतो. कोल्हापूर माझे आजोळ असल्याने आवडत असेल हा भाग वेगळा आहे; पण रस्ता ठीक असेल तर येथील जनता पाठीशी राहते, जर ठीक नसेल तर जागाही दाखविते. त्यामुळे ठीक राहण्यासाठी कोल्हापुरात यावेच लागते.