शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

शेट्टी-दिलीप तात्यांमध्ये गुफ्तगू

By admin | Updated: September 22, 2015 00:11 IST

स्वाभिमानी-राष्ट्रवादीचा नवा शिष्टाचार : जिल्हा बँकेत सूर जुळले

सांगली : वर्षानुवर्षे ऊस दराच्या प्रश्नावरून एकमेकांविरोधात लढणारे स्वाभिमानी शेतकरी व राष्ट्रवादीचे नेते आता राजकीय शिष्टाचाराचे गोडवे गाताना दिसत आहेत. खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी जिल्हा बँकेतील गणरायाच्या आरतीला उपस्थिती लावून बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली. त्यांच्यातील ‘गुफ्तगू’ राजकीय पटलावर चर्चेचा विषय बनले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय कडवटपणा आहे. उसाच्या प्रश्नावर तो दिवसेंदिवस वाढत गेला. यातून संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्लेसुद्धा झाले. इतका टोकाचा संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने विशेषत: वाळवा तालुक्याने अनुभवलेला असताना, आता हे दोन्ही पक्ष राजकीय शिष्टाचाराच्या वाटेवरून नवा अध्याय मांडत आहेत. स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत काही दिवसांपूर्वी जिल्हा बँकेत आले होते. बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली होती. दिलीपतात्या हे राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात, तर जयंत पाटील स्वाभिमानीचे कट्टर विरोधक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे ती चर्चा राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. सदाभाऊ खोत यांच्यानंतर ‘स्वाभिमानी’चे खासदार राजू शेट्टी यांनीही सोमवारी जिल्हा बँकेत हजेरी लावली. त्यांनीही बंद खोलीत दिलीपतात्यांशी मनमोकळी बातचित केली. चर्चा काय झाली याचा तपशील कळाला नसला तरी, त्यांचा हा संवादच अनेकांना आश्चर्यात टाकणारा ठरला. दिलीपतात्यांच्यामते सदाभाऊ खोत त्यांचे चांगले मित्र आहेत. राजकीय भूमिका वेगळ्या असल्या तरी, व्यक्तिगत पातळीवर आपले चांगले संबंध असल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. दिलीपतात्यांचे हे स्पष्टीकरण राजकीय चतुराईचे उदाहरण आहे, की नव्या बदलाची नांदी, याचे कोडे स्वाभिमानीच्या तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अद्याप उलगडलेले नाही. कार्यकर्त्यांमधील हा संभ्रम कायम ठेवत आता जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवा अध्याय मांडला जात आहे, हे निश्चित. (प्रतिनिधी)त्यांनी खासदार म्हणून स्वीकारले आहे!पत्रकारांनी शेट्टी यांना या भेटीविषयी विचारले असता ते म्हणाले की, खासदार म्हणून दिलीपतात्यांनी मला स्वीकारले आहे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना स्वीकारले आहे. तात्त्विक मतभेद असणारच आहेत. ज्यावेळी तत्त्वाचा विषय येईल, तेव्हा आम्ही आमच्या तत्त्वाशी ठाम राहू.