शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Lok Sabha Election 2019 : शेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:31 IST

सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडेसांगलीच्या जागेसाठीच राहूल आवाडेंचा दबावतंत्र

कोल्हापूर : सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तो मान्यच करावा लागणार आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही आवाडे यांनी व्यक्त केली.आवाडे म्हणाले, सांगली व कोल्हापूरच्या राजकारणाची एकमेकाशी सांगड आहे. त्याचे प्रत्यंतर २००९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही कॉँग्रेसला आले. त्यात बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसकडे पुणे, सोलापूर व सांगली हे तीनच मतदारसंघ आहेत. त्यातील सांगली द्यायचा म्हटला तर कॉग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान होणार, म्हणून या मतदारसंघ आपल्याकडेच रहावा, असा आग्रह होता.

कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचे काम केले. त्यातूनच राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरूवारी रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे व आपली चर्चा झाली. यामध्ये सविस्तर उहापोह झाल्यानंतर आपण सांगलीची जागा मागितली नव्हती.

तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शेवटचा पर्याय सांगली होता, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही जागा वाटपात वरिष्ठ पातळीवरून सांगली ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

समन्वयाने जागेचा प्रश्न सुटल्याने सांगलीतील कोणीही कॉँग्रेसमध्ये जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पिटर चौधरी, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

माझ्या परवानगीनेच बंडराहूल आवाडे यांनी ‘हातकणंगले’तून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना आपली परवानगी घेतली होती. आमच्यामध्ये चर्चा होऊनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

जागा कायमस्वरूपी सोडलेली नाहीसांगलीची जागा आघाडीच्या तडजोडीत ‘स्वाभिमानी’ला सोडलेले आहे. याचा अर्थ कायस्वरूपी गेली असा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीत दिलेली जागा असल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगले