शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

Lok Sabha Election 2019 : शेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:31 IST

सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देशेट्टींनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा : प्रकाश आवाडेसांगलीच्या जागेसाठीच राहूल आवाडेंचा दबावतंत्र

कोल्हापूर : सांगलीची जागा कॉँग्रेसला मिळावी, यासाठी शेवटपर्यंत पक्षश्रेष्ठींकडे प्रयत्न करत होतो. त्यासाठीच राहूल आवाडे यांचे दबावतंत्र होते, अशी कबुली कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

कॉँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने ही जागा ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने तो मान्यच करावा लागणार आहे. पण खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीत उमेदवार देताना कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षाही आवाडे यांनी व्यक्त केली.आवाडे म्हणाले, सांगली व कोल्हापूरच्या राजकारणाची एकमेकाशी सांगड आहे. त्याचे प्रत्यंतर २००९ च्या लोकसभा निवडणूकीत दोन्ही कॉँग्रेसला आले. त्यात बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉँग्रेसकडे पुणे, सोलापूर व सांगली हे तीनच मतदारसंघ आहेत. त्यातील सांगली द्यायचा म्हटला तर कॉग्रेस कार्यकर्त्यांचे नुकसान होणार, म्हणून या मतदारसंघ आपल्याकडेच रहावा, असा आग्रह होता.

कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचे काम केले. त्यातूनच राहूल आवाडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली होती. पण गुरूवारी रात्री बारा वाजता खासदार राजू शेट्टी, कल्लाप्पाण्णा आवाडे व आपली चर्चा झाली. यामध्ये सविस्तर उहापोह झाल्यानंतर आपण सांगलीची जागा मागितली नव्हती.

तीन जागा मागितल्या होत्या त्यातील शेवटचा पर्याय सांगली होता, असे शेट्टी यांनी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही जागा वाटपात वरिष्ठ पातळीवरून सांगली ‘स्वाभिमानी’ला सोडण्याचा निर्णय झाल्याचे सांगितले.

समन्वयाने जागेचा प्रश्न सुटल्याने सांगलीतील कोणीही कॉँग्रेसमध्ये जाणार नाही. पण राजू शेट्टी यांनी उमेदवार देताना कॉँग्रेसचा सन्मान करावा, असे प्रकाश आवाडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे, पिटर चौधरी, एस. के. माळी आदी उपस्थित होते.

माझ्या परवानगीनेच बंडराहूल आवाडे यांनी ‘हातकणंगले’तून उमेदवारी अर्ज भरण्याची घोषणा करताना आपली परवानगी घेतली होती. आमच्यामध्ये चर्चा होऊनच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे प्रकाश आवाडे यांनी सांगितले.

जागा कायमस्वरूपी सोडलेली नाहीसांगलीची जागा आघाडीच्या तडजोडीत ‘स्वाभिमानी’ला सोडलेले आहे. याचा अर्थ कायस्वरूपी गेली असा अर्थ होत नाही. आजच्या परिस्थितीत दिलेली जागा असल्याचे आवाडे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूरsangli-pcसांगलीhatkanangle-pcहातकणंगले