शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

ती बी माणसचं हाईत..घाबरु नगसा..काय बी हुईत नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:13 IST

CoronaVirus Kolhapur : आजरा कोवीड सेंटरच्या स्वच्छतेपासून..कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कारापर्यंत.., नाममात्र पगारावर काम आणि घरी भितीने स्वतंत्र राहायचे.. पीपीई कीट जणू पाचवीलाच पुजलेला...असा दिनक्रम गेल्या सव्वा वर्षांपासून आजरा नगरपंचायतीच्या सिक्स स्टार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सुरू आहे.

ठळक मुद्देती बी माणसचं हाईत..घाबरु नगसा..काय बी हुईत नाय आजऱ्यातील सिक्स स्टारच्या पाचवीला पीपीई कीटचं

सदाशिव मोरेआजरा : ती बी माणसचं हाईत ‌..घाबरू नगसा.. काय बी हुईत नाय.. हा संतोष दादाचा पाठीवरील शब्द जणू कोरोनाच्या संकटातही त्यांना लढण्याचे बळ देत आहे.

आजरा कोवीड सेंटरच्या स्वच्छतेपासून..कोरोनाने मयत झालेल्यांवर अंत्यसंस्कारापर्यंत.., नाममात्र पगारावर काम आणि घरी भितीने स्वतंत्र राहायचे.. पीपीई कीट जणू पाचवीलाच पुजलेला...असा दिनक्रम गेल्या सव्वा वर्षांपासून आजरा नगरपंचायतीच्या सिक्स स्टार स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सुरू आहे.आजऱ्यात सव्वा वर्षापूर्वी साळगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात कोरोना कोव्हीड सेंटर सुरू झाले. या ठिकाणची स्वच्छता व कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचे काम नगरपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी संतोष कांबळे, धीरज ससाने,जयवंत कांबळे, बाबुराव कांबळे, मारुती कांबळे, राजाराम कांबळे या सिक्स स्टारनी जणू विडाच उचलला सारखे सुरू ठेवले आहे.

पीपीई किट घालूनच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. कोरोनाबाधित रुग्णांच्या रुमची स्वच्छता करणे,त्याठिकाणच्या कचऱ्याची व्यवस्थितरित्या विल्हेवाट लावणे, कोव्हीड सेंटरमध्ये मयत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करणे. यासह कोव्हीड सेंटरमधील कामे नित्यनेमाने या सहा जणांच्या कडून केली जात आहेतकोरोनाने मयत झालेल्यांच्या घरातील व्यक्ती अंत्यसंस्काराला व रक्षाविसर्जनलाही येत नाहीत. दिवस असो वा रात्र याच सहा जणांनी मयत झालेल्या व्यक्तीला व्यवस्थितरित्या कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून बंद करायचे व त्याला अँब्युलन्स मधून स्मशानभूमीत घेऊन जायचे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करायचे. पण मयतांच्या घरातील कोणाचाही साधा फोनही येत नाही.

अंत्यसंस्कारानंतर घरी यायचे, घरातील व्यक्ती दारात पाणी ठेवतात त्याच ठिकाणी अगोदर सॅनीटायझर करुन घ्यायचे, दिलेल्या पाण्यात डेटॉल लिक्विड टाकून आंघोळ करायची. घरातील एकाच सोप्यात बसायचे व त्याच ठिकाणी जेवायचे तिथेच झोपायचे असा दिनक्रम सुरू आहे.कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीवर रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कार करताना भीती वाटते. मात्र संतोष दादाचे धीर देणारे एकच वाक्य असते. " ती बी माणसंच हाईत.. घाबरू नगसा.. काय बी हुईत नाय..." मग पुन्हा कामाला लागायचे आणि अंत्यसंस्कार करायचे. आणि त्याच अँब्युलन्स मधून घरी परतायचे. नगरपंचायतीकडून मिळणारा पगारही तुटपुंजा त्यामुळे उदरनिर्वाह करतानाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण धाडसाने कोरोनात काम केल्याचे समाधान मिळते असे धीरज ससाने यांनी दै. लोकमतशी बोलताना सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर