शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

शरद पवारांचे राजकारण संपले राजू शेट्टी यांचा घणाघात : काँग्रेसचा पराभव पवार यांच्या धोरणामुळेच

By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांचे राजकारण या निवडणुकीत संपले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांचे राजकारण या निवडणुकीत संपले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘लोकसभा तो झाँकी है, अभी विधानसभा बाकी है..’ असा इशारा देत त्यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली विधानसभेतही भगवा फडकावून दोन्ही काँग्रेसची सत्ता उलथवून टाकू, असे जाहीर केले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेट्टी मतमोजणी केंद्रात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला विजय सामान्य माणसाच्या वर्चस्वाचा विजय असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘माझा विजय हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणार्‍या सामान्य जनतेचा आहे. या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी पवार यांच्यापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत अनेकांनी देव पाण्यात घातले होते. ‘काहीही करून शेट्टी यांना पाडायचे,’ असा विडाच पवार यांनी उचलला होता; परंतु जनतेने इथेच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव करून त्यांचे राजकारण संपविले आहे. दोन्ही काँग्रेसचा पराभव पवारांच्या धोरणांचाच पराभव आहे. सदाभाऊ खोत यांनी ‘माढा’मध्ये चिवट झुंज दिली; परंतु यंत्रणा राबविण्यात कमी पडल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जिल्ह्यातील सामान्य शेतकरी नेता बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन पावणेपाच लाख मते मिळवतो, या त्यांच्या यशाला माझा सलाम. त्यांना निवडून आणू शकलो असतो तर त्यासारखा दुसरा आनंद नव्हता. संजय मंडलिक यांची उमेदवारीही अखेरच्या टप्प्यात जाहीर झाल्याचा फटका काही प्रमाणात बसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.