शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांचे राजकारण संपले राजू शेट्टी यांचा घणाघात : काँग्रेसचा पराभव पवार यांच्या धोरणामुळेच

By admin | Updated: May 17, 2014 00:41 IST

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांचे राजकारण या निवडणुकीत संपले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी

कोल्हापूर : ‘राष्ट्रवादी’चे नेते शरद पवार यांचे राजकारण या निवडणुकीत संपले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी विजयानंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ‘लोकसभा तो झाँकी है, अभी विधानसभा बाकी है..’ असा इशारा देत त्यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली विधानसभेतही भगवा फडकावून दोन्ही काँग्रेसची सत्ता उलथवून टाकू, असे जाहीर केले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास शेट्टी मतमोजणी केंद्रात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपला विजय सामान्य माणसाच्या वर्चस्वाचा विजय असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘माझा विजय हा शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार मानणार्‍या सामान्य जनतेचा आहे. या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी पवार यांच्यापासून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत अनेकांनी देव पाण्यात घातले होते. ‘काहीही करून शेट्टी यांना पाडायचे,’ असा विडाच पवार यांनी उचलला होता; परंतु जनतेने इथेच नव्हे तर महाराष्ट्रातही त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव करून त्यांचे राजकारण संपविले आहे. दोन्ही काँग्रेसचा पराभव पवारांच्या धोरणांचाच पराभव आहे. सदाभाऊ खोत यांनी ‘माढा’मध्ये चिवट झुंज दिली; परंतु यंत्रणा राबविण्यात कमी पडल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जिल्ह्यातील सामान्य शेतकरी नेता बाहेरच्या जिल्ह्यात जाऊन पावणेपाच लाख मते मिळवतो, या त्यांच्या यशाला माझा सलाम. त्यांना निवडून आणू शकलो असतो तर त्यासारखा दुसरा आनंद नव्हता. संजय मंडलिक यांची उमेदवारीही अखेरच्या टप्प्यात जाहीर झाल्याचा फटका काही प्रमाणात बसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.