शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळच्या वैकुंठधाम स्मशानभूमीचे रूप पालटणार

By admin | Updated: December 19, 2014 23:35 IST

ग्रामपंचायतीचा पुढाकार : ४८ लाख रुपये खर्चाची तरतूद; सहा ठिकाणी शवदाहिनी बांधणार

संदीप बावचे - शिरोळ येथे ग्रामपंचायत निधी, उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळ व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चाच्या या कामातून एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात येत आहे. वैकुंठधाम स्मशानभूमीत सहा ठिकाणी शवदाहिनी बांधण्यात येणार असून, त्याठिकाणी शेड उभारून तीन हजार लोक बसतील अशी बैठक व्यवस्था, शिवाय बगीचा, वृक्ष लागवड, कंपौंड, आदींचा यात समावेश असून, शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन एक चांगले पाऊल उचलले आहे. येथे पंचगंगा नदीवर जुन्या कुरुंदवाड रस्त्याकडे शिरोळची स्मशानभूमी आहे. अपुऱ्या स्मशानभूमी शेडमुळे अंत्यविधी किंवा अन्य विधीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी कुचंबणा होत आहे. दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर शेडची दुरवस्था होते. प्रत्येकवेळी खर्च करून या स्मशानशेडची डागडुजी करण्यात येते. गावची लोकसंख्या ४० ते ४५ हजारांच्या घरात पोहोचली आहे. शिवाय छोट्याशा स्मशानशेडमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात थांबण्याची व्यवस्थाही नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. शिरोळ ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय प्रत्यक्ष कामालाही सुरुवात केली आहे. ग्रामपंचायत निधीबरोबरच उर्वरित वैज्ञानिक विकास महामंडळाच्या निधीशिवाय विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या फंडातील निधी व अन्य निधींतून सुमारे ४८ लाख रुपये खर्चातून एक सुसज्ज स्मशानभूमी तयार केली जात आहे. एकाचवेळी सहा ठिकाणी दहन विधी करता येईल यासाठी शवदाहिनी बांधल्या जाणार आहेत. एकाच वेळी तीन हजार लोकांची बैठक व्यवस्था करण्यासाठी सुसज्ज शेडही उभारले जाणार आहे. पावसाळ्यात पूर आल्यानंतर विद्युत उपकरणे खराब होऊ नयेत यासाठी वॉटरफ्रूप बल्बदेखील बसविले जाणार आहेत. स्मशानभूमी परिसरात दोन्ही बाजूला झाडे लावण्यात येणार असून, गार्डन व्यवस्था, कंपौंडदेखील बांधण्यात येणार आहे. सध्या सुसज्ज अशी स्मशानभूमी बांधण्याचे काम सुरू असून, निश्चित ग्रामपंचायतीने एक चांगले पाऊल उचलले आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने यापूर्वी गणेश विसर्जनावेळी निर्माल्यकुंड उभारून उपक्रम राबविला होता. याचप्रकारे रक्षाविसर्जनासाठी रक्षाकुंड उभारण्यात येणार आहे. ‘पाच मूठ रक्षा नदीत’ यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण रोखले जाणार आहे.- पृथ्वीराज यादव, उपसरपंच शिरोळनिधी असूनही जिल्ह्यातील अनेक गावांतील स्मशानशेड बांधकामाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र आहे. निधी आहे जागा नाही, तसेच लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे स्मशानशेडचे बांधकाम होत नसल्याची स्थिती असताना शिरोळ ग्रामपंचायतीने मात्र चांगला पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या या पुढाकारात लोकसहभागातून पाठबळ मिळाले, तर परिसराचा विकास होणार आहे. शिरोळ येथील पंचगंगा नदीकाठी सुसज्ज अशी स्मशानभूमी उभारण्यात येणार आहे.