शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गुंठ्यांसाठी शामरावचा घात

By admin | Updated: August 1, 2016 00:47 IST

पत्नीच बनली वैरी : बेवारशांना आधार देणाऱ्या वारकऱ्यावर ‘बेवारस’ अंत्यसंस्कार

एकनाथ पाटील / कोल्हापूर ज्याला कोणी नाही, त्याला मदतीचा हात देणे, बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारे पंढरीचे वारकरी शामराव पांडुरंग फडतरे (वय ४०, रा. पाचगाव, ता. करवीर) यांचा खून नऊ गुंठे जमिनीसाठी झाला. ही जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याने पत्नीनेच त्यांचा घात केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. या घटनेने पाचगाव परिसर हादरून गेला आहे. पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शामराव फडतरे यांचा खून झाल्याचे उघड होताच जिल्ह्णात खळबळ उडाली. तासगाव पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला. शामराव फडतरे दारूच्या नशेत पत्नी सुमन फडतरे हिचा छळ करीत होते. या छळाला कंटाळून तिने बहिणीचा मुलगा रणजित पाटील व त्याच्या साथीदाराच्या मदतीने त्यांचा खून केला. आरोपींनी दिलेले खुनाचे कारण फक्त निमित्त आहे. शामराव फडतरे हे माळकरी असल्याने ते निर्व्यसनी होते. नऊ गुंठे जमीन आपल्या नावावर करून देण्यासाठी पत्नी सुमन हिने तगादा लावला होता. त्यास ते नकार देत होते. यातून त्यांच्यात वारंवार वादावादी होत होती. जमीन आपल्या नावावर करून देण्यास नकार देणाऱ्या पतीचा कायमचा काटा काढण्यासाठी सुमनने बहिणीच्या मुलाची मदत घेतली. शामराव फडतरे यांचे आई-वडील शेती करतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यांना सहा भाऊ, आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर पाठोपाठ दोन भावांचे निधन झाले. त्यामुळे तिघे भाऊ स्वतंत्र राहात. ते इमारत बांधकामाची कामे घेत होते. १९९८ मध्ये त्यांचे तुरंबे (ता. राधानगरी) येथील सुमन हिच्याशी लग्न झाले. छोटेखानी कौलारू घरामध्ये त्यांचा संसार चांगला फुलला होता. त्यांचा मुलगा शंतून सध्या अकरावीमध्ये शिक्षण घेतो. शामराव हे मनमिळावू, लोकांमध्ये मिळून-मिसळून वागणारे असल्याने त्यांची वारकरी अशी ओळख पाचगाव परिसरात होती. सेंट्रींगच्या कामातून फावल्या वेळेत ते समाजसेवाही करीत होते. मानव सेवा संस्थेमध्ये सदस्य असल्याने ते बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेहमी पुढाकार घेत होते. पाचगाव परिसरात ज्याला कोणी नाही त्याला शामराव मदतीचा हात देत होते. त्यामुळे त्यांच्याविषयी लोकांमध्ये आदर होता. शामराव यांची पाचगाव परिसरात आठ गुंठे जमीन आहे. ती मोक्याची असल्याने आपल्या नावावर करण्यासाठी पत्नीने तगादा लावला होता. यातून त्यांच्यात नेहमी वादावादी होत होती. एकुलता एक मुलगा शंतनूच्या भविष्याचा ते विचार करीत होते. त्यामुळे ते पत्नीच्या नावे जमीन करण्यासाठी राजी नव्हते. जमीन मोक्याची असल्याने पत्नी सुमन व बहिणीचा मुलगा रणजित यांचा त्यावर डोळा होता. यातून त्यांनी खूनाचा कट रचला आणि बेंदरला जेवणासाठी गुडाळला येण्यासाठी रणजितने निमंत्रण दिले आणि तो प्रवास त्यांचा अखेरचा ठरला. खुनानंतर पत्नीचा बिनधास्त वावर शामराव यांच्या खुनानंतर पत्नी सुमन पाचगावमध्ये बिनधास्त वावरत होती. शामराव कुठे दिसत नसल्याने शेजारी राहणारे लोक, त्यांचे मित्र तिच्याकडे विचारपूस करीत होते. त्यावर ती कामावर गेलेले परत आलेले नाहीत, असे सांगत होती. परिसरात हळहळ शामराव फडतरे यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद कर्नाटक पोलिसांत आहे. त्यांचे नातेवाईक मिळून न आल्याने पोलिसांनी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. गेली दहा वर्षे बेवारस मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या शामराव यांच्यावरही बेवारस म्हणून अंत्यसंस्कार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.