शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
4
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
5
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
6
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
7
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
8
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
9
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
10
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
11
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
12
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
13
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
14
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
15
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
16
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
17
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!
18
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
19
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
20
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग

शक्तीपीठ अंबाबाई

By admin | Updated: October 18, 2015 23:57 IST

.पौराणिक ग्रंथांनुसार करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान.

स्त्रीशक्तीचा गौरव, घटाच्यारूपाने होणारी सृजनशीलतेची उपासना आणि देवीचा जागर करणाऱ्या नवरात्रौत्सवाचा मुख्य सोहळा म्हणजे शाही दसरा. साडेतीन शक्तिपीठांतील एक देवता असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा दसरा या नवरात्रौत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य. म्हैसूर, ग्वाल्हेर आणि कोल्हापूर संस्थान या राजघराण्यांना देवीच्या उपासनेशी जोडण्यात आल्याने येथील शाही दसरा देशभरातील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे...पौराणिक ग्रंथांनुसार करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे स्वरूप हे आदिशक्तीचे मूळ पीठ आहे. दक्षप्रजापतीच्या यज्ञात आहुती दिलेल्या सतीचे नेत्र पडले ते हे स्थान. त्यामुळे येथे शिव-शक्ती, गणपती, कार्तिकेय असा परिवार आहे. देश-विदेशातील १०८, नंतर ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन या सर्व शक्तिपीठांत अग्रस्थानी असलेले हे क्षेत्र आद्यशक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. नेत्र हे प्रकाश आणि तेजाचे प्रतीक म्हणून देशभरातील शक्तिपीठांत अंबाबाईला प्रमुख शक्तिपीठ म्हणून मान आहे. मूर्तीच्या मस्तकावर नाग, लिंग, योनी ही काल, पुरुष आणि प्रकृती (म्हणजे शिवशक्ती) या तीन तत्त्वांची प्रतीके आहेत. हातात बीजफल आणि औषधी असलेले म्हाळुंग फळ, दुसऱ्या हातात पानपात्र, अन्य दोन हातांत गदा, ढाल ही आयुधं आहेत. तिच्यापासून ब्रह्मा, विष्णू, महेश निर्माण झाल्याने डोक्यावर शिव, हृदयात नारायण व चरणात ब्रह्मस्वरूप अशी त्रिगुणात्मिका आहे. तसेच या देवतेमध्ये सती, पार्वती, महाकाली, लक्ष्मी, सरस्वती अशा सर्व स्त्री देवतांचेही मूळ स्थान आहे. म्हैसूर आणि ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा प्रसिद्ध आहे. या तीनही शहरांमध्ये देवीचा दसरा सोहळा आणि राजघराणे यांना एकाच धाग्यात गुंफण्यात आल्याने या सोहळ््याला शाही दसरा असे संबोधते जाते. कोल्हापुरात करवीरनिवासिनी अंबाबाई, छत्रपती घराण्याची जुना राजवाडा येथील तुळजाभवानी, गुरू महाराज यांच्या पालख्या आणि छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत हा शाही दसरा सोहळा होतो.पूर्वी म्हणजे शके १८०० च्या शेवटच्या दशकात हा शाही दसरा सोहळा त्र्यंबोली टेकडीवर व्हायचा. मात्र, नंतर ब्रिटिश रेसिडन्सी आणि कोल्हापूरचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून चौफाळ््याचा माळ म्हणजे आताच्या दसरा चौकात शाही दसरा सोहळा होऊ लागला.त्यावेळी भवानी मातेच्या पादुका हत्तीवरून या सोहळ््याला यायच्या. कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींसोबत भगवी ढाल, भगवी पताका, त्रिपटका, रिसाला, कोटकरी, विटेकरी, बाणदार, गायकवाड, यादव, पंतप्रतिनिधी असे मानकरी, सरदार असा शाही लवाजमा असायचा. साधारण १९३७ ला छत्रपतींनी मेबॅक कार घेतली. तेव्हापासून आजतागायत शाही लवाजम्यानिशी या कारमधून श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, महाराजकुमार मालोजीराजे, यौवराज शहाजीराजे, यशराज राजे दसरा चौकात येतात. त्याचवेळी करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानी आणि गुरूमहाराजांच्या पालख्याही आपल्या लवाजम्यानिशी येथे दाखल होतात. येथे पोलीस बँड आणि मिलिटरी बँडच्यावतीने देवीला मानवंदना दिली जाते. त्यानंतर शाहू महाराज दसऱ्याच्या मुख्य सोहळ््याच्या ठिकाणी येऊन अपराजिता व शमी पूजन करतात. देवीची आरती होते. बंदुकीच्या फैरी झाडून देवीला सलामी दिली जाते आणि त्यानंतर सोने लुटण्याचा कार्यक्रम होतो. छत्रपती सर्व मानकऱ्यांना सोने दिल्यानंतर मेबॅक कारमध्ये उभे राहतात आणि सर्व नगरवासीयांना सोने देत जुना राजवाड्यात दाखल होतात. येथे दसऱ्याचा दरबार भरवला जातो. संस्थानच्या सर्व मानकऱ्यांना सोने वाटले जाते. त्यानंतर पंचगंगा नदीतीरावरील समाधिस्थळीही सोने दिले जाते. अंबाबाईची पालखी मात्र नगरवासीयांना भेट देत त्यांना दर्शन देत मंदिरात येते. सिद्धार्थनगर, पंचगंगा नदी घाट, शुक्रवार पेठ, गंगावेश, गुजरी मार्गे रात्री पालखी मंदिरात दाखल होते. त्यानंतर पुन्हा पालखी सोहळा होतो. अशा रीतीने कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा होतो. अश्विन पौर्णिमेला देवस्थान समिती आणि महालक्ष्मी भक्त मंडळाच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन होऊन नवरात्रौत्सवाची सांगता होते. ^- इंदुमती गणेश