शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2015 23:48 IST

संख्येत प्रतिवर्षी घट : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर; दरकपात झाल्यास व्यवसाय धोक्यात येणार

संजय पाटील-- सरुड-शाहूवाडी तालुक्यात वारणा नदीच्या पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे, तर गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर आहे. हंगामात गुळाचा दर सरासरी चार हजार रुपयांच्या दरम्यान असावा. जर गूळ दरात व्यापाऱ्यांनी कपात केली, तर मात्र भविष्यात हा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत.शाहूवाडी तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुऱ्हाळघरांची धुराडी पेटते. या गुऱ्हाळघरामुळे किमान चार ते पाच महिने अनेकांना हक्काचा रोजगार मिळतो. यावर अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात यापूर्वी सुमारे दोनशेच्या पुढे गुऱ्हाळघरे होती; परंतु गुळाचा दर, कामगार कमतरता यांच्यामुळे गुऱ्हाळघरांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत असल्याचे दिसत आहे.गुऱ्हाळाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी यासाठी लागणारे मजूर मिळविणे व ते टिकवून ठेवणे तसेच गुऱ्हाळावर गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सध्या साखर कारखान्यांच्या दरावर गुऱ्हाळघरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण गुळाला कमी भाव जर मिळाला तर उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे जिकडे दर तिकडे ऊस अशी स्थिती निर्माण झाल्यास गुऱ्हाळमालकांना उद्योग चालविणे अवघड जाते. गुळाला उत्पादन खर्चावर व ठरावीक रकमेपेक्षा जास्त दर जर ठरविला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा येत्या एक-दोन वर्षांत हा उद्योग पूर्ण संपण्याच्या मार्गावर जाणार असल्याचे जाणकार गूळ उत्पादकांतून बोलले जात आहे.गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. आवक जास्त झाली की व्यापारी दर पाडतात. साखर कारखान्यांचा दर व गूळ दर यांच्यातील फरक दहा टक्के गुळाला चांगला दर मिळतो, तर नव्वद टक्के गुळाला कमी दर मिळतो. त्यामुळे सरासरी दर मिळत नाही. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय पूर्ण बंद होईल.- मानसिंग पाटील, गुऱ्हाळघर मालक, सरूड.