शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2015 23:48 IST

संख्येत प्रतिवर्षी घट : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर; दरकपात झाल्यास व्यवसाय धोक्यात येणार

संजय पाटील-- सरुड-शाहूवाडी तालुक्यात वारणा नदीच्या पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे, तर गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर आहे. हंगामात गुळाचा दर सरासरी चार हजार रुपयांच्या दरम्यान असावा. जर गूळ दरात व्यापाऱ्यांनी कपात केली, तर मात्र भविष्यात हा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत.शाहूवाडी तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुऱ्हाळघरांची धुराडी पेटते. या गुऱ्हाळघरामुळे किमान चार ते पाच महिने अनेकांना हक्काचा रोजगार मिळतो. यावर अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात यापूर्वी सुमारे दोनशेच्या पुढे गुऱ्हाळघरे होती; परंतु गुळाचा दर, कामगार कमतरता यांच्यामुळे गुऱ्हाळघरांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत असल्याचे दिसत आहे.गुऱ्हाळाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी यासाठी लागणारे मजूर मिळविणे व ते टिकवून ठेवणे तसेच गुऱ्हाळावर गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सध्या साखर कारखान्यांच्या दरावर गुऱ्हाळघरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण गुळाला कमी भाव जर मिळाला तर उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे जिकडे दर तिकडे ऊस अशी स्थिती निर्माण झाल्यास गुऱ्हाळमालकांना उद्योग चालविणे अवघड जाते. गुळाला उत्पादन खर्चावर व ठरावीक रकमेपेक्षा जास्त दर जर ठरविला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा येत्या एक-दोन वर्षांत हा उद्योग पूर्ण संपण्याच्या मार्गावर जाणार असल्याचे जाणकार गूळ उत्पादकांतून बोलले जात आहे.गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. आवक जास्त झाली की व्यापारी दर पाडतात. साखर कारखान्यांचा दर व गूळ दर यांच्यातील फरक दहा टक्के गुळाला चांगला दर मिळतो, तर नव्वद टक्के गुळाला कमी दर मिळतो. त्यामुळे सरासरी दर मिळत नाही. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय पूर्ण बंद होईल.- मानसिंग पाटील, गुऱ्हाळघर मालक, सरूड.