शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

शाहूवाडी तालुक्यात गुऱ्हाळघरांची धुराडी पेटली

By admin | Updated: November 5, 2015 23:48 IST

संख्येत प्रतिवर्षी घट : गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर; दरकपात झाल्यास व्यवसाय धोक्यात येणार

संजय पाटील-- सरुड-शाहूवाडी तालुक्यात वारणा नदीच्या पट्ट्यात गुऱ्हाळघरांच्या गाळपाला प्रारंभ झाला आहे, तर गूळ उत्पादक शेतकऱ्यांची दरावर नजर आहे. हंगामात गुळाचा दर सरासरी चार हजार रुपयांच्या दरम्यान असावा. जर गूळ दरात व्यापाऱ्यांनी कपात केली, तर मात्र भविष्यात हा व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे असल्याचे जाणकार व्यक्त करीत आहेत.शाहूवाडी तालुक्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीस गुऱ्हाळघरांची धुराडी पेटते. या गुऱ्हाळघरामुळे किमान चार ते पाच महिने अनेकांना हक्काचा रोजगार मिळतो. यावर अनेकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. तालुक्यात यापूर्वी सुमारे दोनशेच्या पुढे गुऱ्हाळघरे होती; परंतु गुळाचा दर, कामगार कमतरता यांच्यामुळे गुऱ्हाळघरांच्या संख्येत प्रतिवर्षी घट होत असल्याचे दिसत आहे.गुऱ्हाळाचा गळीत हंगाम सुरू झाला असला तरी यासाठी लागणारे मजूर मिळविणे व ते टिकवून ठेवणे तसेच गुऱ्हाळावर गाळपास येणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. सध्या साखर कारखान्यांच्या दरावर गुऱ्हाळघरांचे भवितव्य अवलंबून आहे. कारण गुळाला कमी भाव जर मिळाला तर उत्पादन खर्च निघत नाही. त्यामुळे जिकडे दर तिकडे ऊस अशी स्थिती निर्माण झाल्यास गुऱ्हाळमालकांना उद्योग चालविणे अवघड जाते. गुळाला उत्पादन खर्चावर व ठरावीक रकमेपेक्षा जास्त दर जर ठरविला तरच गुऱ्हाळघरे सुरू राहतील, अन्यथा येत्या एक-दोन वर्षांत हा उद्योग पूर्ण संपण्याच्या मार्गावर जाणार असल्याचे जाणकार गूळ उत्पादकांतून बोलले जात आहे.गुऱ्हाळघरासाठी लागणाऱ्या मजुरांची कमतरता ही मोठी समस्या आहे. उत्पादन कमी व खर्च जास्त त्या तुलनेत मिळणारा दर कमी आहे. आवक जास्त झाली की व्यापारी दर पाडतात. साखर कारखान्यांचा दर व गूळ दर यांच्यातील फरक दहा टक्के गुळाला चांगला दर मिळतो, तर नव्वद टक्के गुळाला कमी दर मिळतो. त्यामुळे सरासरी दर मिळत नाही. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष दिले नाही तर हा व्यवसाय पूर्ण बंद होईल.- मानसिंग पाटील, गुऱ्हाळघर मालक, सरूड.