शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

By admin | Updated: June 27, 2016 01:16 IST

शरद पवार यांचे मत : राजर्षी शाहू ग्रंथाचा हिंदीत अनुवाद प्रकाशित; शाहूंनी उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानला : एन. डी. पाटील

कोल्हापूर : समाजात भ्रामक कल्पना पसरविणारा वर्ग पुन्हा जोमाने वाढत आहे. ते समाजात चुकीचा पगडा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या कामकाजाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना घृणा, संताप होता. अशा प्रवृत्तीला वेळीच दूर करण्यासाठी शाहूंच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या प्रा. डॉ. पद्मा कदम यांनी हिंदी अनुवादित केलेल्या शाहू चरित्रग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. पवार म्हणाले, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर दलितांचे विचार बदलण्यासाठी केला. माझ्याकडे सत्ता असताना देशात महिलांना ५० टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. ही प्रेरणा मला शाहूराजांच्या स्मृतीतून मिळाली. शाहूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांसाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्राथमिक शिक्षणाला त्यांनी पाठबळ दिले. डॉ. आंबेडकर यांना शाहूंच्या कार्यातूनच खरी प्रेरणा मिळाल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबाबत शाहूंनी राखीव जागांचा वटहुकूम काढला. त्या वटहुकुमामुळे आजही राज्यकर्ते चाचपडत आहेत. त्यांनी सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याचा मार्ग अवलंबला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू ग्रंथाच्या माध्यमातून विचार मांडण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजात जोपर्यंत समता निर्माण होत नाही तोपर्यंत शाहूंचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असे म्हणता येणार नाही.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात जो शाहूंचा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवला, त्याचा एक टप्पा आज पूर्ण केला. पंधरा वर्षांपूर्वी पॅलेसच्या प्रांगणात शाहूंचा पहिला ग्रंथ प्रकाशित करताना शरद पवार यांनी हा ग्रंथ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असा ठेवलेला संकल्प आज पूर्ण करीत आहोत. पवारांनी आता अराजकीय आत्मचरित्र लिहावे, अशी आपली इच्छाही असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. मंजूश्री पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रा. पद्मा पाटील, आदींनीही विचार मांडले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, प्रतिभा शरद पवार, सरोज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रा. राजन गवस, प्रा. अशोक चौसाळकर, मेघा पानसरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाव न घेता मोदींना टोलाभारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विज्ञानवादी राज्यघटना स्वीकारली असताना आमचे सहकारी संसदेत जाताना पायरीवर डोके टेकून नमस्कार करतात, मगच संसदेत प्रवेश करतात. यालाच म्हणावे का विज्ञानवादी? असा टोला पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.फेसबुक पेजचे उद्घाटनयावेळी डॉ. प्रा. पद्मा पाटील आणि निहाल शिपूरकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; तर राजर्षी शाहू प्रचार व प्रसार गु्रपतर्फे केलेल्या फेसबुक पेजचा आणि ‘शाहू आॅनलाईन क्विझ कॉम्पिटिशन’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.