शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भ्रामक वृत्ती थोपविण्यासाठी शाहूंचे विचार गरजेचे

By admin | Updated: June 27, 2016 01:16 IST

शरद पवार यांचे मत : राजर्षी शाहू ग्रंथाचा हिंदीत अनुवाद प्रकाशित; शाहूंनी उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानला : एन. डी. पाटील

कोल्हापूर : समाजात भ्रामक कल्पना पसरविणारा वर्ग पुन्हा जोमाने वाढत आहे. ते समाजात चुकीचा पगडा पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा या कामकाजाबद्दल राजर्षी शाहू महाराजांना घृणा, संताप होता. अशा प्रवृत्तीला वेळीच दूर करण्यासाठी शाहूंच्या विचारांची नितांत गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनीच्या वतीने डॉ. जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहू छत्रपती : एक समाजक्रांतिकारी राजा’ या प्रा. डॉ. पद्मा कदम यांनी हिंदी अनुवादित केलेल्या शाहू चरित्रग्रंथाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते रविवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज होते. पवार म्हणाले, समाजातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी सत्तेचा वापर दलितांचे विचार बदलण्यासाठी केला. माझ्याकडे सत्ता असताना देशात महिलांना ५० टक्के आरक्षणाबाबतचा निर्णय घेतला. ही प्रेरणा मला शाहूराजांच्या स्मृतीतून मिळाली. शाहूंनी स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांसाठी आरक्षणाचा निर्णय घेतला. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी प्राथमिक शिक्षणाला त्यांनी पाठबळ दिले. डॉ. आंबेडकर यांना शाहूंच्या कार्यातूनच खरी प्रेरणा मिळाल्याचेही डॉ. पवार यांनी सांगितले.डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, दबलेल्या, पिचलेल्या वर्गाबाबत शाहूंनी राखीव जागांचा वटहुकूम काढला. त्या वटहुकुमामुळे आजही राज्यकर्ते चाचपडत आहेत. त्यांनी सामान्य, दुर्लक्षित, उपेक्षित माणूस केंद्रबिंदू मानून समाजकार्याचा मार्ग अवलंबला. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू ग्रंथाच्या माध्यमातून विचार मांडण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. समाजात जोपर्यंत समता निर्माण होत नाही तोपर्यंत शाहूंचे कार्य, विचार सर्वांपर्यंत पोहोचले, असे म्हणता येणार नाही.डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या इतिहासात जो शाहूंचा प्रकल्प डोळ्यांसमोर ठेवला, त्याचा एक टप्पा आज पूर्ण केला. पंधरा वर्षांपूर्वी पॅलेसच्या प्रांगणात शाहूंचा पहिला ग्रंथ प्रकाशित करताना शरद पवार यांनी हा ग्रंथ राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असा ठेवलेला संकल्प आज पूर्ण करीत आहोत. पवारांनी आता अराजकीय आत्मचरित्र लिहावे, अशी आपली इच्छाही असल्याचे त्यांनी सांगितले.डॉ. मंजूश्री पवार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. प्रा. पद्मा पाटील, आदींनीही विचार मांडले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री सुनील तटकरे, अण्णासाहेब डांगे, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, प्रतिभा शरद पवार, सरोज पाटील, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, प्रा. राजन गवस, प्रा. अशोक चौसाळकर, मेघा पानसरे, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)नाव न घेता मोदींना टोलाभारताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विज्ञानवादी राज्यघटना स्वीकारली असताना आमचे सहकारी संसदेत जाताना पायरीवर डोके टेकून नमस्कार करतात, मगच संसदेत प्रवेश करतात. यालाच म्हणावे का विज्ञानवादी? असा टोला पवार यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.फेसबुक पेजचे उद्घाटनयावेळी डॉ. प्रा. पद्मा पाटील आणि निहाल शिपूरकर यांचा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला; तर राजर्षी शाहू प्रचार व प्रसार गु्रपतर्फे केलेल्या फेसबुक पेजचा आणि ‘शाहू आॅनलाईन क्विझ कॉम्पिटिशन’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.