शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

बाबा भांड यांच्या पुस्तकात शाहू महाराजांची बदनामी, सुभाष देसाई यांची तक्रार : परिच्छेद काढून टाकण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरीत शाहू महाराज हे आपल्या संस्थानातील ...

कोल्हापूर : लेखक बाबा भांड यांनी लिहिलेल्या युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरीत शाहू महाराज हे आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवत होते असा उल्लेख असून तो शाहू महाराज यांची बदनामी करणारा आहे. तो तातडीने वगळण्यात यावा अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार व इतिहास अभ्यासक डॉ. सुभाष देसाई यांनी केली आहे.

देसाई त्यासंबंधीच्या निवेदनात म्हणतात, भांड यांच्या साकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित युगद्रष्टा महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जीवनावरील कादंबरी खूप गाजली आहे. सयाजीराव गायकवाड यांचे छत्रपती शाहू महाराजांशी नाते संबंधही होते. दोघेही मोठे समाजसुधारक. ब्रिटिश राजवटीत या दोघांनी अनेक स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली. एका बाजूला सनातनी ब्राह्मण समाजाचा विरोध आणि दुसऱ्या बाजूला ब्रिटिशांकडून सर्व प्रकारची मुस्कटदाबी या दोन्ही महाराजांच्या वाट्याला आली. युगद्रष्टा महाराजा या चरित्र ग्रंथांमध्ये पान २८३ वर एक परिच्छेद आहे. त्यात म्हटले आहे, " अरविंद यांचे बंधू क्रांतिकारक वारिंद्र घोष बडोदामध्ये आले आहेत. त्यावेळेला अरविंद घोष म्हणाले " बडोदा संस्थान आणि कोल्हापूर संस्थानांच्या प्रमुखात हाच मोठा फरक आहे, आपल्या संस्थानातील शस्त्रधारी देशभक्तांच्या हालचालींची बित्तंबातमी काढून ती मुंबई सरकारला तत्परतेने कळवण्याचे संस्थानिक कर्तव्य म्हणून कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींनी जसे अनेक वर्षे चोख बजावले आहे पण, तसे सयाजीराव महाराज यांनी केल्याचा एकही पुरावा आढळत नाही. "

कादंबरीतील हे भाष्य कल्पनाविलास म्हणून बाबा भांड यांनी रचले आहे का, ते सत्याचे खरे दर्शन आहे हे भांड यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. कारण छत्रपती शाहू महाराजांनी ब्रिटिशांचे लांगुलचालन केले आणि देशभक्तांना वाऱ्यावर सोडले असा याचा अर्थ होतो. तो महाराज यांच्यावर अन्याय करणारा आहे. या संदर्भातले उदाहरण बाबा भांड यांनी पुराव्यानिशी द्यावे, अन्यथा अनवधानाने छत्रपती शाहू महाराजांची बदनामी केली अशी कबुली देऊन प्रसिद्ध झालेल्या सर्व आवृत्तीतून तो परिच्छेद तातडीने काढून टाकावा.