शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

‘अग्निदिव्य’मधील ‘शाहू’ हरपले

By admin | Updated: March 4, 2017 01:10 IST

पुण्यात प्रयोग सुरू असताना सागर चौगुले यांचे हृदयविकाराने निधन

पुणे : रंगभूमीवर प्रयोग सुरु असतानाच ‘अग्निदिव्य’या नाटकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंची मुख्य भूमिका साकारणाऱ्या सागर शांताराम चौगुले (वय ३८) या हरहुन्नरी कलाकाराचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला.पुणे येथील टिळक स्मारक रंगमंदिर येथे शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. सागर यांच्यासारख्या उमद्या कलाकाराच्या अशा अचानक जाण्याने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सागर हे चित्रपट निर्माते-दिग्दर्शक शांताराम चौगुले यांचे चिरंजीव व ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचे भाचे होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दीड वर्षाची मुलगी, आई, भाऊ, भावजय असा परिवार आहे. पुण्यातील टिळक स्मारक रंगमंदिरामध्ये शुक्रवारी राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी सुरु होती. काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील हनुमान तरुण मंडळाच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांंच्या जीवनावर आधारित ‘अग्निदिव्य’हे नाटक अंतिम फेरीत होते. सुनील माने यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. कोल्हापूर संघाचा ४० कलाकारांसह ‘अग्निदिव्य’ या नाटकाचा प्रयोग सुरू होता. नाटकाच्या सुरुवातीपासून शाहू महाराजांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या सागर यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. मात्र, नाटकाचे मध्यांतर होण्याआधीच नाटकातील आपले संवाद म्हणतानाच सागर यांना हृदयविकाराचा तीव झटका आला आणि तो रंगमंचावर कोसळला. सहकलाकारांनी तातडीने त्यांंना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्याला पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले ; परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सागर हे मूळचे कोल्हापूरचे असून चित्रपट निर्माते शांताराम चौगुले यांचे चिरंजीव होत. त्यांचा कोल्हापूरमध्ये जाहिरात क्षेत्राशी निगडित व्यवसाय आहे. मात्र, अभिनयाच्या आवडीमुळे महाविद्यालयीन जीवनापासूनच ते नाटकांमध्ये भाग घेत असत. सहा महिन्यांपूर्र्वीच ‘अग्निदिव्य’ हे नाटक बसविण्यात आले होते. त्यामध्ये त्यांनी साकारलेल्या शाहू महाराजांच्या भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होऊन त्यांना वाहवा मिळत होती. शुक्रवारीही पुण्यात नाटक सादर करताना त्यांनी सर्वच रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली होती. सागर यांनी नाटकाबरोबर काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. लवकरच त्यांचा ‘सासू आली, अडचण झाली’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. (प्रतिनिधी)शाहू महाराजांची हुबेहूब भूमिकाराजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची भूमिका सागर हा अत्यंत ताकदीने उभा करणारा कलावंत होता. नाटकातील मध्यवर्ती भूमिका त्याची होती. साक्षात शाहू महाराज आपल्यासमोर उभे आहेत, असे वाटे. तो बोलताना अंगावर शहारे यायचे... इतका जिवंतपणा त्याने भूमिकेत ओतला होता. शाहू महाराज जिवंत असते तर त्याचा अभिनय पाहून त्यांनी या कलावंताला गळ्यातील मोत्याचा हार काढून दिला असता.