शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाहू कारखाना बिनविरोधच्या मार्गावर

By admin | Updated: September 6, 2016 23:48 IST

पंचवार्षिक निवडणूक : शाहू पॅनेलची १५ नावे जाहीर; आज अर्ज माघारीची अंतिम तारीख

कागल : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक जवळपास बिनविरोध होण्याच्या मार्गावर असून, १५ जागांसाठी १७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. या १५ जागा स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलने अधिकृत केलेल्या आहेत. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज, बुधवारी अंतिम तारीख आहे. दरम्यान, मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी १५ जणांची यादी जाहीर केली.सत्ताधारी स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू पॅनेलचे अधिकृत उमेदवार पुढीलप्रमाणे - श्रीमंत सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे (महिला गट), समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे (कागल), वीरकुमार आप्पासो पाटील (कोगनोळी, ता. चिकोडी), अमरसिंह गोपाळराव घोरपडे (माद्याळ), यशवंत जयवंत माने (कागल), युवराज अर्जुनराव पाटील (मौ. सांगाव), धनंजय सदाशिव पाटील (केनवडे), बाबूराव ज्ञानू पाटील (गोकुळ शिरगाव), भूपाल विष्णू पाटील (कोगील बुद्रुक), मारुती दादू निगवे (नंदगाव), सचिन सदाशिव मगदूम (पिंपळगाव खुर्द, सर्व ऊस उत्पादक गट), रुक्मिणी बंडा पाटील (दिंडनेर्ली, महिला गट), तुकाराम अमृता कांबळे (व्हन्नूर, मागासवर्गीय राखीव गट).मंगळवारअखेर जे १७ अर्ज शिल्लक आहेत, त्यामधील ही १५ नावे आहेत. दोन उमेदवारांचे ऊस उत्पादक गटातून अर्ज शिल्लक आहेत. हे दोघे आज माघार घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर शुक्रवारी (दि. ९) अधिकृतपणे आता बिनविरोध झालेल्या १३ जागांसह एकूण १५ जागा बिनविरोध झाल्याची घोषणा केली जाईल. (प्रतिनिधी)परंपरा जपण्याचा प्रयत्न : समरजितसिंहकागल : छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आमच्या गटाच्या कार्यकर्त्यांसह अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एक-दोघांचा अपवाद वगळता सर्वांनी बिनशर्त माघार घेऊन स्वर्गीय राजेंच्या पश्चातही बिनविरोध निवडणुकीची परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे, असे उद्गार समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत काढले.स्वर्गीय विक्रमसिंहराजे श्री शाहू शेतकरी पॅनेलच्या अधिकृत १५ जणांच्या उमेदवारीची यादी त्यांनी जाहीर केली. त्यावेळी ते बोलत होते. माजी आमदार वीरकुमार पाटील, वीरेंद्रसिंह घाटगे आणि सर्व उमेदवार उपस्थित होते. उमेदवारांच्या यादीचे वाचन वीरकुमार पाटील यांनी केले.समरजितसिंह घाटगे म्हणाले की, कागल तालुक्यातीलच नव्हे, तर कोल्हापूर जिल्ह्यातून शाहू साखर कारखाना बिनविरोध करावा, यासाठी विविध नेतेमंडळींनी आवाहन केले. पाठिंबा मागण्यासाठी मी फोन करणार होतो, त्यापूर्वीच या सर्वांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. याची सुरुवात तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. त्यानंतर संजयदादा मंडलिक, बाबासाहेब पाटील, माजी आमदार संजयबाबा घाटगे, रणजितसिंह पाटील यांच्यासह विविध पक्ष, संघटनांनी पाठिंबा जाहीर केला. तालुक्याबाहेरही आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील, गणपतराव पाटील, संग्रामसिंह नलवडे, आदींनीही असे आवाहन केले. सोमवारपर्यंत नऊ अपक्षांचे अर्ज शिल्लक होते. त्यापैकी ७ अर्ज माघार घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रयत्न केले, तर खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांनीदेखील फोनवर संपर्क साधत पाठिंबा व्यक्त केला आहे. चिकोडी तालुक्यातील सर्वच पक्षांच्या नेतेमंडळींनी हीच भूमिका घेतल्याने आता बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अजून दोघांचे अर्ज शिल्लक आहेत, पण तेदेखील माघार घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यास सहकार्य करतील, असा मला विश्वास आहे. (प्रतिनिधी)नव्या-जुन्यांचा मेळसत्ताधारी गटाच्या पॅनेलची घोषणा म्हणजे नूतन संचालकांचीच घोषणा असल्याने पत्रकार परिषदेच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांसह कागल, करवीर, चिकोडी (कर्नाटक) तालुक्यांतही उमेदवारांच्या यादीबद्दल उत्सुकता होती. मात्र, समरजितसिंह घाटगे यांनी नव्या-जुन्यांचा सुरेख मेळ घातला आहे. सात विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देत सात नवे चेहरे घेतले आहेत, तर पाच वर्षांच्या खंडानंतर मारुती ज्ञानदेव पाटील यांना संधी दिली आहे. करवीरमधील चारही चेहरे बदलण्यात आले आहेत.